शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना बरखास्त नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:01 IST

मालेगाव, देवळा, उमराणे, मनमाड व येवला या पाच बाजार समित्यांमध्ये कार्यरत व्यापा-यांनी गेल्या तीन महिन्यात बाजार समितीत लिलावासाठी शेतमाल घेवून आलेल्या शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी केली व त्याबदल्यात शेतक-यांना धनादेश किंवा आरटीजीएस करण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देबरखास्तीच्या नोटीशीने बाजार समिती संचालकांची धावाधाव१५ दिवसांची मुदत : व्यापाऱ्यांच्या परवान्यामध्ये कायद्याचे उल्लंघन

नाशिक : शेतक-यांकडून माल खरेदी करूनही त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणा-या व्यापा-यांना पाठीशी घालणा-या जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना बरखास्त करून त्याजागी प्रशासक नेमण्याच्या जिल्हा उपनिबंधकांच्या नोटीशीमुळे संचालकांची धावपळ उडाली असून, शेतक-यांचे पैसे थकविणा-या व्यापा-यांचा शोध घेवून त्यांच्यावर पैसे अदा करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरूवात झाली आहे. दुसरीकडे बाजार समितीच्या संचालकांचे राजकीय लागेबांधे पाहता, लोकप्रतिनिधींकडून उपनिबंधकांना सबुरीचा सल्लाही देण्याच्या प्रयत्नांना गती देण्यात आली आहे.मालेगाव, देवळा, उमराणे, मनमाड व येवला या पाच बाजार समित्यांमध्ये कार्यरत व्यापा-यांनी गेल्या तीन महिन्यात बाजार समितीत लिलावासाठी शेतमाल घेवून आलेल्या शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी केली व त्याबदल्यात शेतक-यांना धनादेश किंवा आरटीजीएस करण्याचे आश्वासन दिले. परंतु मुदत उलटूनही व्यापा-यांनी शेतक-यांचे पैसे अदा न केल्याच्या तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात साधारणत: २० व्यापा-यांनी १४१९ शेतक-यांचे ४ कोटी ९५ लाख रूपये थकविले असून, अशा व्यापाºयांवर कारवाई करण्याचे आदेश बाजार समित्यांना देवूनही त्यांनी त्याची दखल न घेता उलट त्यांना अभय दिल्याचा मुख्य आक्षेप आहे. या संदर्भात जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी दहा दिवसांपुर्वी बाजार समित्या व व्यापा-यांची बैठक घेवून शेतक-यांचे पैसे तात्काळ अदा करण्याच्या सुचनाही दिल्या होत्या मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने अखेर व्यापा-यांना परवाने देतांना बाजार समित्यांनी कायदा व नियमांना हरताळ फासल्याचा आक्षेप जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समित्यांना बजावलेल्या नोटीसीत नोंदविला आहे. बाजार समितीतील व्यापा-यांना परवाने अदा करताना नियमभंग केल्याप्रकरणी संचालकांना दोषी का ठरविण्यात येवू नये व बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक का नेमण्यात येवू नये अशी विचारणा या नोटीसीत करण्यात आली असून, त्यावर संचालकांना लेखी म्हणणे मांडण्यासाठी येत्या ११ मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे.सहकार विभागाच्या या नोटीशीने पाचही बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची धावपळ उडाली असून, ज्या व्यापा-यांनी शेतक-यांचे पैसे थकविले त्यांचा शोध घेवून शेतक-यांचे थकीत पैसे परत करण्यासाठी तगादा लावण्यास सुरूवात केली आहे तर व्यापा-यांचेही सहकार खात्याच्या नोटीशीने धाबे दणाणले असून, कारवाई रोखण्यासाठी राजकीय लागेबांध्यांचाही प्रयत्न वेगाने सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक