शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना बरखास्त नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:01 IST

मालेगाव, देवळा, उमराणे, मनमाड व येवला या पाच बाजार समित्यांमध्ये कार्यरत व्यापा-यांनी गेल्या तीन महिन्यात बाजार समितीत लिलावासाठी शेतमाल घेवून आलेल्या शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी केली व त्याबदल्यात शेतक-यांना धनादेश किंवा आरटीजीएस करण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देबरखास्तीच्या नोटीशीने बाजार समिती संचालकांची धावाधाव१५ दिवसांची मुदत : व्यापाऱ्यांच्या परवान्यामध्ये कायद्याचे उल्लंघन

नाशिक : शेतक-यांकडून माल खरेदी करूनही त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणा-या व्यापा-यांना पाठीशी घालणा-या जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना बरखास्त करून त्याजागी प्रशासक नेमण्याच्या जिल्हा उपनिबंधकांच्या नोटीशीमुळे संचालकांची धावपळ उडाली असून, शेतक-यांचे पैसे थकविणा-या व्यापा-यांचा शोध घेवून त्यांच्यावर पैसे अदा करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरूवात झाली आहे. दुसरीकडे बाजार समितीच्या संचालकांचे राजकीय लागेबांधे पाहता, लोकप्रतिनिधींकडून उपनिबंधकांना सबुरीचा सल्लाही देण्याच्या प्रयत्नांना गती देण्यात आली आहे.मालेगाव, देवळा, उमराणे, मनमाड व येवला या पाच बाजार समित्यांमध्ये कार्यरत व्यापा-यांनी गेल्या तीन महिन्यात बाजार समितीत लिलावासाठी शेतमाल घेवून आलेल्या शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी केली व त्याबदल्यात शेतक-यांना धनादेश किंवा आरटीजीएस करण्याचे आश्वासन दिले. परंतु मुदत उलटूनही व्यापा-यांनी शेतक-यांचे पैसे अदा न केल्याच्या तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात साधारणत: २० व्यापा-यांनी १४१९ शेतक-यांचे ४ कोटी ९५ लाख रूपये थकविले असून, अशा व्यापाºयांवर कारवाई करण्याचे आदेश बाजार समित्यांना देवूनही त्यांनी त्याची दखल न घेता उलट त्यांना अभय दिल्याचा मुख्य आक्षेप आहे. या संदर्भात जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी दहा दिवसांपुर्वी बाजार समित्या व व्यापा-यांची बैठक घेवून शेतक-यांचे पैसे तात्काळ अदा करण्याच्या सुचनाही दिल्या होत्या मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने अखेर व्यापा-यांना परवाने देतांना बाजार समित्यांनी कायदा व नियमांना हरताळ फासल्याचा आक्षेप जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समित्यांना बजावलेल्या नोटीसीत नोंदविला आहे. बाजार समितीतील व्यापा-यांना परवाने अदा करताना नियमभंग केल्याप्रकरणी संचालकांना दोषी का ठरविण्यात येवू नये व बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक का नेमण्यात येवू नये अशी विचारणा या नोटीसीत करण्यात आली असून, त्यावर संचालकांना लेखी म्हणणे मांडण्यासाठी येत्या ११ मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे.सहकार विभागाच्या या नोटीशीने पाचही बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची धावपळ उडाली असून, ज्या व्यापा-यांनी शेतक-यांचे पैसे थकविले त्यांचा शोध घेवून शेतक-यांचे थकीत पैसे परत करण्यासाठी तगादा लावण्यास सुरूवात केली आहे तर व्यापा-यांचेही सहकार खात्याच्या नोटीशीने धाबे दणाणले असून, कारवाई रोखण्यासाठी राजकीय लागेबांध्यांचाही प्रयत्न वेगाने सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक