शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

दुर्धर आजारही दिव्यांगांच्या श्रेणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:48 IST

महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमानुसार ५ टक्के निधी अपंगांसाठी राखून ठेवण्याची तरतूद आहे. एवढीच काय ती माहिती समाजाला, दिव्यांगांना आणि बहुतेक प्रशासकीय यंत्रणेला माहिती असावी, असेच दिसते. नवीन दिव्यांग कायद्यानुसार दिव्यांगांच्या कक्षेत दुर्धर आजारांचाही समावेश करण्यात आला आहे.

जागतिक अपंग दिन

नाशिक : महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमानुसार ५ टक्के निधी अपंगांसाठी राखून ठेवण्याची तरतूद आहे. एवढीच काय ती माहिती समाजाला, दिव्यांगांना आणि बहुतेक प्रशासकीय यंत्रणेला माहिती असावी, असेच दिसते. नवीन दिव्यांग कायद्यानुसार दिव्यांगांच्या कक्षेत दुर्धर आजारांचाही समावेश करण्यात आला आहे. याची माहिती समाजापर्यंत पोहोचलेलीच नाही.नव्या कॅटेगरीनुसार योजनांनी पुनर्रचना होणे अपेक्षित असताना प्रशासकीय यंत्रणेला मात्र याबाबतची कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या पाच टक्के निधीतून २५ प्रकारच्या योजना राबविता येतात हेच ज्या यंत्रणेला माहीत नाही तेथे दुर्धर आजारातील दिव्यांग कोणते? हे कसे माहीत असणार. आधी अंध, अपंग, मूकबधिर व मतिमंद यांचाच समावेश होता. परंतु आता कुष्ठरोग, अ‍ॅसिड अ‍ॅटक महिला, बुटकेपणा, लकवाग्रस्त आदींचा समावेश आहे. परंतु अशा रु ग्णांना त्यांचा दिव्यांग प्रवर्गात समावेश झाला आहे ही माहिती नसल्याने ते अपंगत्वाच्या लाभापासून आणि योजनांपासून वंचित आहेत. किंबहुना त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचविल्या जात नसल्याने असे असंख्य दिव्यांग अनभिज्ञ आहेत. जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींची संख्या सुमारे ६० हजारांच्या जवळपास आहेत. परंतु अजूनही दिव्यांगांच्या संदर्भातील हक्क आणि अधिकाराबाबत अपेक्षित जनजागृती झालेली नाही.शहरामध्ये यासाठी दिव्यांगबांधव एकत्र येऊन लढा देतात, परंतु ग्रामीण भागात तर परिस्थिती भीषण आहे. त्यामुळे दिव्यांग असणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी अतिशय बारकाईने सेवा सुविधा देण्यात आल्या पाहिजे.केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींच्या न्याय हक्कासाठी दिव्यांग कायदा २०१६ साली केला आहे. यात अनेक अधिकार बहाल केले आहेत. मात्र, हे अधिकार समाजातील दिव्यांगांपर्यंत पोहोचत नाही. ग्रामीण भागात तर दिव्यांग व्यक्ती खरोखर योजनांपासून वंचित असल्याचे दिसते. दिव्यांगांच्या तक्रारी सोडविण्यासाठी राज्य सरकारने परिपत्रक काढून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमले आहे. ज्या दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्यास ते ग्रामसेवकांच्या विरुद्ध तक्रारी करू शकतात.- बबलू मिर्झा, अध्यक्ष, दिव्यांग कल्याणकारी संघटना

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक