शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भातपिकावर रोगांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 19:15 IST

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील खरीप हंगामातील भातपिकावर दिवसेंदिवस विविध रोगांचे आक्रमण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भातावर मावा, करपा पडला असून, विमा कंपन्यांनी याची दखल घेऊन तत्काळ विमे मंजूर करून भरपाईची रक्कम देण्याची मागणी इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : विमा कंपन्यांनी भरपाई देण्याची मागणी

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील खरीप हंगामातील भातपिकावर दिवसेंदिवस विविध रोगांचे आक्रमण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भातावर मावा, करपा पडला असून, विमा कंपन्यांनी याची दखल घेऊन तत्काळ विमे मंजूर करून भरपाईची रक्कम देण्याची मागणी इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.मागील वर्षीच्या आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात म्हणजेच भात सोंगणीचा हंगाम संपल्यानंतरही परतीचा अवकाळी पाऊस बरसतच होता. मागील वर्षीच्या सुरुवातीलाही भातरोपांची दुबार पेरणी करावी लागली होती. अतिवृष्टीचे प्रमाण इतके होते की, शेतात लावणी केलेले भातपीक अक्षरश: वाहून गेले. या अतिवृष्टीच्या तडाख्यातून बचावलेले भातपीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी अपार मेहनत घेतली; मात्र ऐन निसवण्याच्या कालावधीपासूनच भातावर करपा, मावा, तुडतुडे आदी रोगांनी आक्र मण केले व त्यातून भातपिकाची मोठी नासाडी झाली होती. २००९ मध्ये बिगरमोसमी पावसाने १७ हजार ३४३ शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यात सर्वाधिक नुकसान भाताचेच होते. २०१० मध्येही अवकाळी पाऊस झाला. त्यात एकूण दहा हजार ८६३.६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यातही सर्वाधिक नऊ हजार ८६१.७६ हेक्टर इतके भाताचे क्षेत्र होते, तर २०११ मध्ये करपा रोगाने चार हजार हेक्टर भातपिकाचेच नुकसान झाले होते. याहीवर्षी वेळेत पाऊस न झाल्याने भातपिकांचे रोपे वाया गेल्याने दुबार पेरणी करून, कोरोनाच्या महामारीत दुप्पट लागवड खर्च करून भातपिकांची लागवड केली. आता ऐन निसवण्याच्या मोसमातच करपा, मावा, तुडतुडे या रोगांसह भेसळयुक्त बियाणं यामुळे भाताचे उत्पन्न घटण्याची भीती शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. विमा कंपन्यांनी याची दखल घेत शासनाने रोगराईला बळी पडलेल्या पिकांचा पंचनामा करावा व विमे मंजूर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.महागडे बियाणे, खते, लागवड खर्च व मेहनत करूनही भातपिकावर गंडांतर येत आहे. शासनाने रोगाला बळी पडलेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन रोगाला बळी पडलेल्या भातपिकांची विमा कंपन्यांनीही दखल घेत पिकविमे मंजूर करावे.- विठोबा दिवटे, शेतकरी, नांदूरवैद्य. 

 

 

 

 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी