शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

भातपिकावर रोगांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 19:15 IST

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील खरीप हंगामातील भातपिकावर दिवसेंदिवस विविध रोगांचे आक्रमण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भातावर मावा, करपा पडला असून, विमा कंपन्यांनी याची दखल घेऊन तत्काळ विमे मंजूर करून भरपाईची रक्कम देण्याची मागणी इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : विमा कंपन्यांनी भरपाई देण्याची मागणी

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील खरीप हंगामातील भातपिकावर दिवसेंदिवस विविध रोगांचे आक्रमण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भातावर मावा, करपा पडला असून, विमा कंपन्यांनी याची दखल घेऊन तत्काळ विमे मंजूर करून भरपाईची रक्कम देण्याची मागणी इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.मागील वर्षीच्या आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात म्हणजेच भात सोंगणीचा हंगाम संपल्यानंतरही परतीचा अवकाळी पाऊस बरसतच होता. मागील वर्षीच्या सुरुवातीलाही भातरोपांची दुबार पेरणी करावी लागली होती. अतिवृष्टीचे प्रमाण इतके होते की, शेतात लावणी केलेले भातपीक अक्षरश: वाहून गेले. या अतिवृष्टीच्या तडाख्यातून बचावलेले भातपीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी अपार मेहनत घेतली; मात्र ऐन निसवण्याच्या कालावधीपासूनच भातावर करपा, मावा, तुडतुडे आदी रोगांनी आक्र मण केले व त्यातून भातपिकाची मोठी नासाडी झाली होती. २००९ मध्ये बिगरमोसमी पावसाने १७ हजार ३४३ शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यात सर्वाधिक नुकसान भाताचेच होते. २०१० मध्येही अवकाळी पाऊस झाला. त्यात एकूण दहा हजार ८६३.६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यातही सर्वाधिक नऊ हजार ८६१.७६ हेक्टर इतके भाताचे क्षेत्र होते, तर २०११ मध्ये करपा रोगाने चार हजार हेक्टर भातपिकाचेच नुकसान झाले होते. याहीवर्षी वेळेत पाऊस न झाल्याने भातपिकांचे रोपे वाया गेल्याने दुबार पेरणी करून, कोरोनाच्या महामारीत दुप्पट लागवड खर्च करून भातपिकांची लागवड केली. आता ऐन निसवण्याच्या मोसमातच करपा, मावा, तुडतुडे या रोगांसह भेसळयुक्त बियाणं यामुळे भाताचे उत्पन्न घटण्याची भीती शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. विमा कंपन्यांनी याची दखल घेत शासनाने रोगराईला बळी पडलेल्या पिकांचा पंचनामा करावा व विमे मंजूर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.महागडे बियाणे, खते, लागवड खर्च व मेहनत करूनही भातपिकावर गंडांतर येत आहे. शासनाने रोगाला बळी पडलेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन रोगाला बळी पडलेल्या भातपिकांची विमा कंपन्यांनीही दखल घेत पिकविमे मंजूर करावे.- विठोबा दिवटे, शेतकरी, नांदूरवैद्य. 

 

 

 

 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी