शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

भातपिकावर रोगांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 19:15 IST

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील खरीप हंगामातील भातपिकावर दिवसेंदिवस विविध रोगांचे आक्रमण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भातावर मावा, करपा पडला असून, विमा कंपन्यांनी याची दखल घेऊन तत्काळ विमे मंजूर करून भरपाईची रक्कम देण्याची मागणी इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : विमा कंपन्यांनी भरपाई देण्याची मागणी

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील खरीप हंगामातील भातपिकावर दिवसेंदिवस विविध रोगांचे आक्रमण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भातावर मावा, करपा पडला असून, विमा कंपन्यांनी याची दखल घेऊन तत्काळ विमे मंजूर करून भरपाईची रक्कम देण्याची मागणी इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.मागील वर्षीच्या आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात म्हणजेच भात सोंगणीचा हंगाम संपल्यानंतरही परतीचा अवकाळी पाऊस बरसतच होता. मागील वर्षीच्या सुरुवातीलाही भातरोपांची दुबार पेरणी करावी लागली होती. अतिवृष्टीचे प्रमाण इतके होते की, शेतात लावणी केलेले भातपीक अक्षरश: वाहून गेले. या अतिवृष्टीच्या तडाख्यातून बचावलेले भातपीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी अपार मेहनत घेतली; मात्र ऐन निसवण्याच्या कालावधीपासूनच भातावर करपा, मावा, तुडतुडे आदी रोगांनी आक्र मण केले व त्यातून भातपिकाची मोठी नासाडी झाली होती. २००९ मध्ये बिगरमोसमी पावसाने १७ हजार ३४३ शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यात सर्वाधिक नुकसान भाताचेच होते. २०१० मध्येही अवकाळी पाऊस झाला. त्यात एकूण दहा हजार ८६३.६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यातही सर्वाधिक नऊ हजार ८६१.७६ हेक्टर इतके भाताचे क्षेत्र होते, तर २०११ मध्ये करपा रोगाने चार हजार हेक्टर भातपिकाचेच नुकसान झाले होते. याहीवर्षी वेळेत पाऊस न झाल्याने भातपिकांचे रोपे वाया गेल्याने दुबार पेरणी करून, कोरोनाच्या महामारीत दुप्पट लागवड खर्च करून भातपिकांची लागवड केली. आता ऐन निसवण्याच्या मोसमातच करपा, मावा, तुडतुडे या रोगांसह भेसळयुक्त बियाणं यामुळे भाताचे उत्पन्न घटण्याची भीती शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. विमा कंपन्यांनी याची दखल घेत शासनाने रोगराईला बळी पडलेल्या पिकांचा पंचनामा करावा व विमे मंजूर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.महागडे बियाणे, खते, लागवड खर्च व मेहनत करूनही भातपिकावर गंडांतर येत आहे. शासनाने रोगाला बळी पडलेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन रोगाला बळी पडलेल्या भातपिकांची विमा कंपन्यांनीही दखल घेत पिकविमे मंजूर करावे.- विठोबा दिवटे, शेतकरी, नांदूरवैद्य. 

 

 

 

 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी