शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त चर्चासत्र

By admin | Updated: December 13, 2015 22:04 IST

संयुक्त उपक्रम : अनेक मान्यवरांचा सहभाग

नाशिक : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभाग, एनबीटी लॉ कॉलेज आणि दिशा फाउंडेशनच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव व वरिष्ठ न्यायाधीश व्ही. आर. अग्रवाल, एन.बी.टी. लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य, दिशा फाउंडेशनचे हेड आॅपरेशन अ‍ॅड. मिलिंद बाबर उपस्थित होते. याप्रसंगी अस्मिता वैद्य म्हणाल्या की, दिवसेंदिवस लोकांच्या समस्या वाढतच असून, न्यायालयात मोठ्या संख्येने खटले येत आहेत. त्यामुळे हजारोंच्या संख्येने प्रलंबित खटल्यांचे निकाल लागण्यासाठी खूप मोठा अवधी लागतो. जे दाखल होण्यापूर्वीच सामोपचाराने मिटविले जाऊ शकतात. यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे, तसेच सुरक्षित आयुष्य म्हणजे सुरक्षित मानवाधिकार होय. यावेळी अ‍ॅड. मिलिंद बाबर यांनी मानव अधिकार दिनाचे महत्त्व, तसेच मानव अधिकार दिन का साजरा केला जातो, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.अ‍ॅड. सुवर्णा चिखलकर यांनी सांगितले की, मानव म्हणून जन्म घेतो त्यावेळेस त्याचे त्याला अधिकार मिळतात. स्वातंत्र, समता, विचार, व्यवसाय, नोकरी करण्याचा अधिकार प्रत्येकालाच दिलेला आहे. प्रत्येकाने आपले मूलभूत अधिकार जाणून घेणे असंघटित क्षेत्रातील लोकांनी एकत्रित होऊन न्याय मिळण्यासाठी दबाव आणणे गरजेचे आहे, असे विचार त्यांनी मांडले. प्रा. सुनंदा काळे यांनी स्थलांतरित कामगार महिलांचे अधिकार यासंदर्भात माहिती दिली. तसेच हे अधिकार मिळवण्यासाठी जनजागृती कार्यक्रम घेणे आवश्यक आहे व त्याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करणे, तसेच राज्य पातळीवर कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. कमिटी स्थापन करणे व असे करणे ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सुचविले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाचे सचिव व वरिष्ठ न्यायाधीश अग्रवाल यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कशा प्रकारे सुरू करण्यात आले, यासंदर्भात माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण काळे यांनी केले. प्रा. एस. के. मांडवकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण काळे, रेखा साबळे, वैशाली तुंगार, किरण माळेकर, अमुल जोशी, प्रल्हाद जयकर, अजय खलाने, चंद्रकांत वाघेरे, संजय गवळी यांनी सहकार्य केले.