शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त चर्चासत्र

By admin | Updated: December 13, 2015 22:04 IST

संयुक्त उपक्रम : अनेक मान्यवरांचा सहभाग

नाशिक : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभाग, एनबीटी लॉ कॉलेज आणि दिशा फाउंडेशनच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव व वरिष्ठ न्यायाधीश व्ही. आर. अग्रवाल, एन.बी.टी. लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य, दिशा फाउंडेशनचे हेड आॅपरेशन अ‍ॅड. मिलिंद बाबर उपस्थित होते. याप्रसंगी अस्मिता वैद्य म्हणाल्या की, दिवसेंदिवस लोकांच्या समस्या वाढतच असून, न्यायालयात मोठ्या संख्येने खटले येत आहेत. त्यामुळे हजारोंच्या संख्येने प्रलंबित खटल्यांचे निकाल लागण्यासाठी खूप मोठा अवधी लागतो. जे दाखल होण्यापूर्वीच सामोपचाराने मिटविले जाऊ शकतात. यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे, तसेच सुरक्षित आयुष्य म्हणजे सुरक्षित मानवाधिकार होय. यावेळी अ‍ॅड. मिलिंद बाबर यांनी मानव अधिकार दिनाचे महत्त्व, तसेच मानव अधिकार दिन का साजरा केला जातो, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.अ‍ॅड. सुवर्णा चिखलकर यांनी सांगितले की, मानव म्हणून जन्म घेतो त्यावेळेस त्याचे त्याला अधिकार मिळतात. स्वातंत्र, समता, विचार, व्यवसाय, नोकरी करण्याचा अधिकार प्रत्येकालाच दिलेला आहे. प्रत्येकाने आपले मूलभूत अधिकार जाणून घेणे असंघटित क्षेत्रातील लोकांनी एकत्रित होऊन न्याय मिळण्यासाठी दबाव आणणे गरजेचे आहे, असे विचार त्यांनी मांडले. प्रा. सुनंदा काळे यांनी स्थलांतरित कामगार महिलांचे अधिकार यासंदर्भात माहिती दिली. तसेच हे अधिकार मिळवण्यासाठी जनजागृती कार्यक्रम घेणे आवश्यक आहे व त्याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करणे, तसेच राज्य पातळीवर कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. कमिटी स्थापन करणे व असे करणे ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सुचविले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाचे सचिव व वरिष्ठ न्यायाधीश अग्रवाल यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कशा प्रकारे सुरू करण्यात आले, यासंदर्भात माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण काळे यांनी केले. प्रा. एस. के. मांडवकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण काळे, रेखा साबळे, वैशाली तुंगार, किरण माळेकर, अमुल जोशी, प्रल्हाद जयकर, अजय खलाने, चंद्रकांत वाघेरे, संजय गवळी यांनी सहकार्य केले.