शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

नैराश्यमुक्तीसाठी चर्चा आवश्यक : चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:50 IST

काही वेळा एखादे आजारपण झाले की आजारपणानंतर आलेल्या शारीरिक दुर्बलतेतून मानसिक स्वास्थ्यही बिघडते. स्वत:च्या शक्तीवरचा, क्षमतेवरचा विश्वास उडतो. भीती वाटते, वेदनांची, मृत्यूची भीती आणि मनातल्या मनात कुढणे, जगाशी संपर्क नकोसा वाटणे, कोणाशी संवाद साधणे नकोसे होणे, व्यायामाबाबत व योग्य आहाराबाबत उदासीनता, स्वत:च्या परावलंबी असण्याबद्दलची खंत, त्रास, चिंता आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याबद्दल निरुत्साह यासाठी नैराश्य आलेल्या व्यक्तीने आपल्या जवळच्या व्यक्त्ािंसोबत चर्चा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. धनंजय चव्हाण यांनी केले.

नाशिक : काही वेळा एखादे आजारपण झाले की आजारपणानंतर आलेल्या शारीरिक दुर्बलतेतून मानसिक स्वास्थ्यही बिघडते. स्वत:च्या शक्तीवरचा, क्षमतेवरचा विश्वास उडतो. भीती वाटते, वेदनांची, मृत्यूची भीती आणि मनातल्या मनात कुढणे, जगाशी संपर्क नकोसा वाटणे, कोणाशी संवाद साधणे नकोसे होणे, व्यायामाबाबत व योग्य आहाराबाबत उदासीनता, स्वत:च्या परावलंबी असण्याबद्दलची खंत, त्रास, चिंता आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याबद्दल निरुत्साह यासाठी नैराश्य आलेल्या व्यक्तीने आपल्या जवळच्या व्यक्त्ािंसोबत चर्चा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. धनंजय चव्हाण यांनी केले.नाशिक सायक्रियास्ट्रिक सोसायटीतर्फे शनिवारी (दि.२३) कुसुमाग्रज स्मारकात ‘डिप्रेशन : समज व गैरसमज’ याविषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी नैराश्य येण्याची कारणे व त्याविषयी करण्यात येणाऱ्या उपायांविषयी मार्गदर्शन केले. नेहमी ज्या गोष्टी करतो त्याविषयी रुची नसणे, मनात आत्महत्येचे विचार येणे यामुळे नैराश्य अजूनच बळावतो. तसेच नैराश्य आलेल्या व्यक्ंितनी आपल्या जवळच्या व्यक्तिंच्या सहवासात राहणे आवश्यक आहे. लहानसहान घटना मनाला लावून घेणे, बदलत्या काळासोबत स्वत:ला बदलण्याची तयारी नसणे व त्यातून आलेले वैफल्य, रिकाम्या वेळाचा वापर कसा करायचा हे न कळल्यामुळे मनाचा हट्टीपणा या आणि अशा अनेक गोष्टी नैराश्याची भावना घट्ट करत जाऊ शकतात. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी अशा व्यक्तीने बोलून मनमोकळे करणे आवश्यक आहे.तसेच त्या व्यक्ंितच्या जवळच्या माणसांनीही त्याला आधार देऊन त्याला समजून घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमप्रसंगी आयोजक गिरीश पगारे, राजीव ठाकरे, अभिजीत पाटील, शिरीष सहस्त्रबुद्धे, अशोक पवार, पा. भा. करंजकर आदी उपस्थित होते.ही आहेत लक्षणेएखाद्याला नैराश्य येण्याचे प्रमुख लक्षणांमध्ये त्या व्यक्तीला थकवा येणे, निरुत्साह वाटणे, भूक कमी किंवा जास्त लागणे, उदास वाटणे, चिडचिड होणे, झोप कमी किंवा जास्त येणे, आत्मविश्वास गमावणे, चुका करण्याची भीती वाटणे, कामात लक्ष न लागणे, निर्णयक्षमता गमावणे तसेच प्रमुख लक्षणे म्हणजे मनात आत्महत्येचा विचार येणे असे लक्षणे नैराश्य आलेल्या व्यक्तीला येत असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक