शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

समन्यायी पाणीवाटप धोरणावर होणार फेरविचार

By admin | Updated: November 8, 2015 00:01 IST

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : भाजपा आमदारांनी घेतली भेट

नाशिक : समन्यायी पाणीवाटपाचे धोरण हे नाशिककरांवर अन्याय करणारे आहे, त्यामुळे त्यात बदल करावा, अशी मागणी भाजपा आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. फडणवीस यांनीही या विषयावर अधिवेशनात चर्चा करू, असे आश्वासन दिले आहे.मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणानुसार नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्यात आले आहे; परंतु त्यामुळे नाशिकमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपावगळता सर्वपक्षीयांनी आंदोलन केले. भाजपाची सत्ता असताना त्यांनी मौन बाळगल्याने अन्य पक्षांनी भाजपा आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले होते. त्यामुळे भाजपाचे आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, डॉ. राहुल अहेर आणि दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी पाणी सोडताना नाशिकचा विचार योग्य पद्धतीने झालेला नाही. नाशिक जिल्'ासाठीच पुरेसे पाणी नसतानादेखील मराठवाड्यासाठी सोडण्यात आले. नाशिकमध्ये द्राक्षबागा लावलेला भाग मोठा असून, त्यांना पाणी न दिल्यास हजारो कोटी रुपयांचे नुकसान होईल, अशी तक्रार आमदारांनी केली. उच्च न्यायालयाने पिण्यासाठीच पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर हे पाणी पिण्यासाठीच सोडले जात असताना प्रत्यक्षात मात्र हे पाणी मद्याचे कारखान्यांसाठी वापरले जात आहे, त्यामुळे त्याचे नियंत्रण करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी एका समितीमार्फत पाण्याचा वापरावर देखरेख केली जाईल, असे सांगितले. तसेच समन्यायी पाणीवाटप धोरणात नाशिकवर अन्याय होत असल्याने या धोरणाचा फेरविचार करावा त्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा करावी, अशी आमदारांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे सांगण्यात आले.