शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

समन्यायी पाणीवाटप धोरणावर होणार फेरविचार

By admin | Updated: November 8, 2015 00:01 IST

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : भाजपा आमदारांनी घेतली भेट

नाशिक : समन्यायी पाणीवाटपाचे धोरण हे नाशिककरांवर अन्याय करणारे आहे, त्यामुळे त्यात बदल करावा, अशी मागणी भाजपा आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. फडणवीस यांनीही या विषयावर अधिवेशनात चर्चा करू, असे आश्वासन दिले आहे.मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणानुसार नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्यात आले आहे; परंतु त्यामुळे नाशिकमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपावगळता सर्वपक्षीयांनी आंदोलन केले. भाजपाची सत्ता असताना त्यांनी मौन बाळगल्याने अन्य पक्षांनी भाजपा आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले होते. त्यामुळे भाजपाचे आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, डॉ. राहुल अहेर आणि दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी पाणी सोडताना नाशिकचा विचार योग्य पद्धतीने झालेला नाही. नाशिक जिल्'ासाठीच पुरेसे पाणी नसतानादेखील मराठवाड्यासाठी सोडण्यात आले. नाशिकमध्ये द्राक्षबागा लावलेला भाग मोठा असून, त्यांना पाणी न दिल्यास हजारो कोटी रुपयांचे नुकसान होईल, अशी तक्रार आमदारांनी केली. उच्च न्यायालयाने पिण्यासाठीच पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर हे पाणी पिण्यासाठीच सोडले जात असताना प्रत्यक्षात मात्र हे पाणी मद्याचे कारखान्यांसाठी वापरले जात आहे, त्यामुळे त्याचे नियंत्रण करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी एका समितीमार्फत पाण्याचा वापरावर देखरेख केली जाईल, असे सांगितले. तसेच समन्यायी पाणीवाटप धोरणात नाशिकवर अन्याय होत असल्याने या धोरणाचा फेरविचार करावा त्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा करावी, अशी आमदारांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे सांगण्यात आले.