शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कॉँग्रेसच्या अभियानात धुळ्याच्या तिकिटाचीच चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 17:58 IST

सटाण्यात शुभारंभ : शेवाळेंना डावलल्यास बंडाचा इशारा

ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्र प्रभारी रेड्डी यांनी मात्र धुळ्याच्या उमेदवारी बद्दल आपल्या भाषणातून बगल देण्याचा प्रयत्न केला.

सटाणा : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाशवभूमीवर कॉंग्रेसच्या जनसंपर्कअभियानचा उत्तर महाराष्ट्रचे प्रभारी चेल्लार वामसी चांद रेड्डी यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.७) सटाण्यापासून शुभारंभ करण्यात आला. मात्र या कार्यक्र मात अभियानावर चर्चा होणे अपेक्षित असतांना धुळे लोकसभा मतदार संघाच्या तिकीटाभोवतीच चर्चा रंगली. यावेळी इच्छुक उमेदवार तथा मविप्रचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनाच तिकीट द्या अन्यथा बंड करू असा सज्जड दमच काही वक्त्यांनी दिल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.कॉँग्रेस सरकारने राज्यात गेल्या साठ वर्षात राबविलेल्या विकास योजना आणि मोदी सरकारने जनतेचा केलेला घोर विश्वासघात,राज्यात युती सरकारने जनतेची केलेली घोर फसवणूक प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी कॉंग्रेसने जनसंपर्कअभियान सुरू केले आहे. या अभियानचा शुभारंभ सटाणा येथून झाला. यावेळी कार्यक्र माच्या निमित्ताने आयोजित पदाधिकारी ,कार्यकर्त्यांच्या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये जिंकण्याच्या दृष्टीने व्यूहरचना व अभियानाच्या मूळ उद्देशावर चर्चा होणे सर्वांना अपेक्षित असतांना धुळे लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरच चर्चा रंगली. कॉंग्रेसचे नगरसेवक दिनकर सोनवणे यांनी थेट पक्षाच्या तालुका नेतृत्वावरच हल्लाबोल करत कार्यकारिणी बदलल्याशिवाय कोणतीही निवडणूक जिंकणे अशक्य असल्याचे सांगून धुळ्याचे तिकीट डॉ.तुषार शेवळे यांना असेल तरच प्रचार करू असा इशारा दिला. नगरसेवक सोनवणे यांच्या सुरात सूर मिसळत जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रा.अनिल पाटील यांनी देखील डॉ.शेवाळेच योग्य उमेदवार असल्याची शिफारस केली. जेष्ठ पदाधिकारी भिका रौंदळ ,गुलाबराव मगर,वीरेंद्र अहिरे यांनी तर थेट धुळे लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक असलेले माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नावालाच विरोध केला. डॉ.शेवाळे यांना डावलून पाटलांना उमेदवारी दिल्यास आम्ही बंड करू असाही इशारा देण्यात आला. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी तर डॉ.शेवाळे यांच्या तिकिटासाठी उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी रेड्डी यांनाच साकडे घातले. कॉँग्रेस प्रभारींची मात्र चुप्पीउत्तर महाराष्ट्र प्रभारी रेड्डी यांनी मात्र धुळ्याच्या उमेदवारी बद्दल आपल्या भाषणातून बगल देण्याचा प्रयत्न केला. रेड्डी म्हणाले, बूथ रचनेचे काम योग्य पद्धतीने केल्यास उमेदवार कोणताही असल्यास विजय कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सूक्ष्म नियोजन करून जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून घराघरात पोहचून भावी पंतप्रधान राहुल गांधी यांचे हात बळकट करावे असे आवाहन केले.

टॅग्स :Nashikनाशिकcongressकाँग्रेस