शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसच्या अभियानात धुळ्याच्या तिकिटाचीच चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 17:58 IST

सटाण्यात शुभारंभ : शेवाळेंना डावलल्यास बंडाचा इशारा

ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्र प्रभारी रेड्डी यांनी मात्र धुळ्याच्या उमेदवारी बद्दल आपल्या भाषणातून बगल देण्याचा प्रयत्न केला.

सटाणा : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाशवभूमीवर कॉंग्रेसच्या जनसंपर्कअभियानचा उत्तर महाराष्ट्रचे प्रभारी चेल्लार वामसी चांद रेड्डी यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.७) सटाण्यापासून शुभारंभ करण्यात आला. मात्र या कार्यक्र मात अभियानावर चर्चा होणे अपेक्षित असतांना धुळे लोकसभा मतदार संघाच्या तिकीटाभोवतीच चर्चा रंगली. यावेळी इच्छुक उमेदवार तथा मविप्रचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनाच तिकीट द्या अन्यथा बंड करू असा सज्जड दमच काही वक्त्यांनी दिल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.कॉँग्रेस सरकारने राज्यात गेल्या साठ वर्षात राबविलेल्या विकास योजना आणि मोदी सरकारने जनतेचा केलेला घोर विश्वासघात,राज्यात युती सरकारने जनतेची केलेली घोर फसवणूक प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी कॉंग्रेसने जनसंपर्कअभियान सुरू केले आहे. या अभियानचा शुभारंभ सटाणा येथून झाला. यावेळी कार्यक्र माच्या निमित्ताने आयोजित पदाधिकारी ,कार्यकर्त्यांच्या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये जिंकण्याच्या दृष्टीने व्यूहरचना व अभियानाच्या मूळ उद्देशावर चर्चा होणे सर्वांना अपेक्षित असतांना धुळे लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरच चर्चा रंगली. कॉंग्रेसचे नगरसेवक दिनकर सोनवणे यांनी थेट पक्षाच्या तालुका नेतृत्वावरच हल्लाबोल करत कार्यकारिणी बदलल्याशिवाय कोणतीही निवडणूक जिंकणे अशक्य असल्याचे सांगून धुळ्याचे तिकीट डॉ.तुषार शेवळे यांना असेल तरच प्रचार करू असा इशारा दिला. नगरसेवक सोनवणे यांच्या सुरात सूर मिसळत जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रा.अनिल पाटील यांनी देखील डॉ.शेवाळेच योग्य उमेदवार असल्याची शिफारस केली. जेष्ठ पदाधिकारी भिका रौंदळ ,गुलाबराव मगर,वीरेंद्र अहिरे यांनी तर थेट धुळे लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक असलेले माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नावालाच विरोध केला. डॉ.शेवाळे यांना डावलून पाटलांना उमेदवारी दिल्यास आम्ही बंड करू असाही इशारा देण्यात आला. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी तर डॉ.शेवाळे यांच्या तिकिटासाठी उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी रेड्डी यांनाच साकडे घातले. कॉँग्रेस प्रभारींची मात्र चुप्पीउत्तर महाराष्ट्र प्रभारी रेड्डी यांनी मात्र धुळ्याच्या उमेदवारी बद्दल आपल्या भाषणातून बगल देण्याचा प्रयत्न केला. रेड्डी म्हणाले, बूथ रचनेचे काम योग्य पद्धतीने केल्यास उमेदवार कोणताही असल्यास विजय कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सूक्ष्म नियोजन करून जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून घराघरात पोहचून भावी पंतप्रधान राहुल गांधी यांचे हात बळकट करावे असे आवाहन केले.

टॅग्स :Nashikनाशिकcongressकाँग्रेस