शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांना शिस्त... वाहतूक पोलीस बेशिस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:42 IST

शहरातील वाहतूक व वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी कायद्याची विविध आयुधे उपसणाऱ्या शहर वाहतूक पोलिसांना आपल्याच कृतीचा विसर पडला असून, परिणामी वाहनचालकांची दिशाभूल होऊन त्यातून गोंधळ व बेशिस्त वाहतुकीला निमंत्रण मिळत आहे.

नाशिक : शहरातील वाहतूक व वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी कायद्याची विविध आयुधे उपसणाऱ्या शहर वाहतूक पोलिसांना आपल्याच कृतीचा विसर पडला असून, परिणामी वाहनचालकांची दिशाभूल होऊन त्यातून गोंधळ व बेशिस्त वाहतुकीला निमंत्रण मिळत आहे. पंडित कॉलनीतील रस्त्यावर एकेरी वाहतुकीचा निर्णय घेऊन त्याची काटेकोर अंमलबजावणीत अपयशी ठरलेल्या पोलीस खात्याने हा रस्ता पुन्हा दुहेरी वाहतुकीसाठी खुला केला, परंतु या रस्त्यावर जागोजागी लावलेले एकेरी वाहतुकीचे फलक तसेच कायम ठेवल्याने वाहनचालक संभ्रमात पडत आहेत. एरव्ही वाहनचालकाला नको ते कायद्याचे कलमाचा धाक दाखवून कारवाईसाठी धजावणाºया पोलीस खात्याला आपल्याच कृतीचा विसर पडल्याने त्यांच्या या प्रमादाबद्दल पोलीस आयुक्त काय शिक्षा करणार? असा प्रश्न वाहनचालक विचारू लागले आहेत.एकेरी मार्ग करण्याचा अनाकलनीय निर्णयटिळकवाडीकडून ठाकरे बंगल्याकडे पंडित कॉलनीमार्गे जाणारा रस्ता वाहतूक पोलीस विभागाने अचानक एकतर्फी वाहतुकीसाठी राखीव केल्याची अधिसूचना आठ महिन्यांपूर्वी काढून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. त्यामुळे ठाकरे बंगल्याकडून शरणपूररोड सिग्नलकडे वाहन नेण्यास बंदी घालण्यात आली होती.शहरातील गंगापूररोड व शरणपूर या दोन प्रमुख रस्त्यांना जोडणाºया पंडित कॉलनीत एकेरी वाहतूक करण्यामागचे कारण समजू शकले नसले तरी, या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असल्याचा शोध वाहतूक विभागाने लावला होता.या मार्गावर हॉस्पिटल्स, कपड्यांची दुकाने, शाळा, बॅँका, कार्यालये असून, एकही इमारत अथवा बंगल्यांना वाहनतळाची सोय नसल्यामुळे रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने रस्त्यावर वाहने उभी करणाºयांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी थेट वाहनचालकांनाच वाहतुकीसाठी रस्ता बंद केला. त्याचा फटका स्थानिक रहिवाशांनाच अधिक बसला.वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमटिळकवाडी ते ठाकरे बंगला हा रस्ता एकेरी करून पोलिसांनी त्यावरील वाहनाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला असला तरी, गंगापूररोडने टिळकवाडीकडे जाऊ पाहणाºया वाहनचालकांना पंडित कॉलनीतील महापालिकेच्या जुन्या कार्यालयाकडून जाण्याची मुभा दिली होती. परंतु या रस्त्यावरही दुतर्फा असलेली दुकाने, बॅँका, रुग्णालये, कार्यालये पाहता या रस्त्यावर वाहतूक कोंडीत भरच पडली. परिणामी एकेरी वाहतुकीचा केलेला प्रयत्न पोलिसांच्या अंगलट आल्याने आता दोन्ही मार्ग येण्या-जाण्यासाठी खुला केल्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला असून पोलिसांचा ताणही कमी झाला आहे. असे असतानाही ठाकरे बंगला ते टिळकवाडी हा रस्ता एकेरी करण्याचे कारण काय याचे उत्तर वाहतूक विभाग देवू शकले नाही. काही ठराविक दुकानदारांच्या सांगण्यावरून पोलिसांनी वाहनचालकांना सहा ते आठ महिने वेठीस धरले काय अशी विचारणाही आता स्थानिक नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस