शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
4
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
5
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
6
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
7
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
8
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
9
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
10
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
11
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
13
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
14
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
15
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
16
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
17
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
18
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
19
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
20
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती विभागाचे फोन लागलीच खणाणले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST

नाशिक: कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याच्या वृत्तानंतर नाशिक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात याबाबतची विचारणा ...

नाशिक: कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याच्या वृत्तानंतर नाशिक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात याबाबतची विचारणा सुरू झाली आहे. मागील महिन्यात सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे आपत्ती विभागाकडे तब्बल १८ हजार इतके अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे येत्या काही दिवसांत आपत्ती विभागाचे काम वाढणार असल्याचे दिसते.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले असून राज्य शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून ही मदत दिली जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आता अशाप्रकारची मदत मिळणे दृष्टिपथात आल्यामुळे जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात अनेकांनी याबाबतची विचारणा सुरू केली आहे.

केंद्र सरकारने याबाबतचे प्रतिज्ञापत्रच सादर केल्यामुळे आर्थिक मदत मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, मात्र ही मदत नेमकी कधी मिळेल याबाबत विचारणा करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील फोन खणखणत आहेत. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून याबाबतची अधिक माहिती जाणून घेतली आहे. माध्यमांमध्ये आर्थिम मदतीसंदर्भातील माहिती आली असली तरी शासनाकडून अद्याप कोणता आदेश निघालेला नाही. ही मोहीम जिल्ह्यात एकाच ठिकाणी की तालुकास्तरावर राबवावी याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे संभ्रमावस्था कायम आहे.

मृताच्या कुटुंबीयांना मदतीची रक्कम मिळण्यासाठी सरकारी छापील अर्ज करावा लागणार आहे. मात्र हा अर्ज कसा असेल, कुठून मिळेल याबाबतची स्पष्टता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत. याचे उत्तर देण्याचे काम तूर्तास आपत्ती व्यवस्थापन विभागालाच करावे लागणार आहे. योजना कशी असेल आणि कालावधी तसेच नियोजन कसे असे याबाबतच्या कोणत्याही गाइडलाइन्स जिल्हा आपत्ती विभागाला नसल्याने नागरिकांचे समाधान करण्यासही अडचणी येत आहेत.

--कोट--

येणाऱ्या नागरिकांना माहिती देण्याचे काम आपत्ती विभागाकडून केले जात आहे. फार गर्दी होत नसली तरी विचारणा मात्र होत आहे. शासनाकडून याबाबतच्या स्पष्ट सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांचे समाधान होईल या दृष्टीने त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आलेल्या नागरिकांची नोंद ठेवली जात असून, त्यांचे संपर्क क्रमांक घेतले जात आहेत. त्यामुळे अधिकची काही माहिती नंतर मिळाली तर त्यांना कळवता येऊ शकेल.

- अर्जुन कुऱ्हाडे, आपत्ती व्यवस्थापन विभाग, प्रमुख

-