शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

आपत्ती विभागाचे फोन लागलीच खणाणले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST

नाशिक: कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याच्या वृत्तानंतर नाशिक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात याबाबतची विचारणा ...

नाशिक: कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याच्या वृत्तानंतर नाशिक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात याबाबतची विचारणा सुरू झाली आहे. मागील महिन्यात सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे आपत्ती विभागाकडे तब्बल १८ हजार इतके अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे येत्या काही दिवसांत आपत्ती विभागाचे काम वाढणार असल्याचे दिसते.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले असून राज्य शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून ही मदत दिली जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आता अशाप्रकारची मदत मिळणे दृष्टिपथात आल्यामुळे जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात अनेकांनी याबाबतची विचारणा सुरू केली आहे.

केंद्र सरकारने याबाबतचे प्रतिज्ञापत्रच सादर केल्यामुळे आर्थिक मदत मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, मात्र ही मदत नेमकी कधी मिळेल याबाबत विचारणा करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील फोन खणखणत आहेत. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून याबाबतची अधिक माहिती जाणून घेतली आहे. माध्यमांमध्ये आर्थिम मदतीसंदर्भातील माहिती आली असली तरी शासनाकडून अद्याप कोणता आदेश निघालेला नाही. ही मोहीम जिल्ह्यात एकाच ठिकाणी की तालुकास्तरावर राबवावी याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे संभ्रमावस्था कायम आहे.

मृताच्या कुटुंबीयांना मदतीची रक्कम मिळण्यासाठी सरकारी छापील अर्ज करावा लागणार आहे. मात्र हा अर्ज कसा असेल, कुठून मिळेल याबाबतची स्पष्टता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत. याचे उत्तर देण्याचे काम तूर्तास आपत्ती व्यवस्थापन विभागालाच करावे लागणार आहे. योजना कशी असेल आणि कालावधी तसेच नियोजन कसे असे याबाबतच्या कोणत्याही गाइडलाइन्स जिल्हा आपत्ती विभागाला नसल्याने नागरिकांचे समाधान करण्यासही अडचणी येत आहेत.

--कोट--

येणाऱ्या नागरिकांना माहिती देण्याचे काम आपत्ती विभागाकडून केले जात आहे. फार गर्दी होत नसली तरी विचारणा मात्र होत आहे. शासनाकडून याबाबतच्या स्पष्ट सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांचे समाधान होईल या दृष्टीने त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आलेल्या नागरिकांची नोंद ठेवली जात असून, त्यांचे संपर्क क्रमांक घेतले जात आहेत. त्यामुळे अधिकची काही माहिती नंतर मिळाली तर त्यांना कळवता येऊ शकेल.

- अर्जुन कुऱ्हाडे, आपत्ती व्यवस्थापन विभाग, प्रमुख

-