शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती विभागाचे फोन लागलीच खणाणले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST

नाशिक: कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याच्या वृत्तानंतर नाशिक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात याबाबतची विचारणा ...

नाशिक: कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याच्या वृत्तानंतर नाशिक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात याबाबतची विचारणा सुरू झाली आहे. मागील महिन्यात सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे आपत्ती विभागाकडे तब्बल १८ हजार इतके अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे येत्या काही दिवसांत आपत्ती विभागाचे काम वाढणार असल्याचे दिसते.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले असून राज्य शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून ही मदत दिली जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आता अशाप्रकारची मदत मिळणे दृष्टिपथात आल्यामुळे जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात अनेकांनी याबाबतची विचारणा सुरू केली आहे.

केंद्र सरकारने याबाबतचे प्रतिज्ञापत्रच सादर केल्यामुळे आर्थिक मदत मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, मात्र ही मदत नेमकी कधी मिळेल याबाबत विचारणा करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील फोन खणखणत आहेत. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून याबाबतची अधिक माहिती जाणून घेतली आहे. माध्यमांमध्ये आर्थिम मदतीसंदर्भातील माहिती आली असली तरी शासनाकडून अद्याप कोणता आदेश निघालेला नाही. ही मोहीम जिल्ह्यात एकाच ठिकाणी की तालुकास्तरावर राबवावी याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे संभ्रमावस्था कायम आहे.

मृताच्या कुटुंबीयांना मदतीची रक्कम मिळण्यासाठी सरकारी छापील अर्ज करावा लागणार आहे. मात्र हा अर्ज कसा असेल, कुठून मिळेल याबाबतची स्पष्टता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत. याचे उत्तर देण्याचे काम तूर्तास आपत्ती व्यवस्थापन विभागालाच करावे लागणार आहे. योजना कशी असेल आणि कालावधी तसेच नियोजन कसे असे याबाबतच्या कोणत्याही गाइडलाइन्स जिल्हा आपत्ती विभागाला नसल्याने नागरिकांचे समाधान करण्यासही अडचणी येत आहेत.

--कोट--

येणाऱ्या नागरिकांना माहिती देण्याचे काम आपत्ती विभागाकडून केले जात आहे. फार गर्दी होत नसली तरी विचारणा मात्र होत आहे. शासनाकडून याबाबतच्या स्पष्ट सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांचे समाधान होईल या दृष्टीने त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आलेल्या नागरिकांची नोंद ठेवली जात असून, त्यांचे संपर्क क्रमांक घेतले जात आहेत. त्यामुळे अधिकची काही माहिती नंतर मिळाली तर त्यांना कळवता येऊ शकेल.

- अर्जुन कुऱ्हाडे, आपत्ती व्यवस्थापन विभाग, प्रमुख

-