शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 18:22 IST

खेडलेझुंगे : शासनाच्या कृषी विभागाकडुन सर्व शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु केल्याची माहीती देण्यात आलेली होती. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्ट्रर, ट्रॅक्टर चलीत औजारांमध्ये रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, गर, कापणी यंत्र, फवारणी यंत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ शेतकºयांना लॉटरी पध्दतीने मिळणार आहे.

ठळक मुद्देकृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत नोंदणीसाठी रीघ

खेडलेझुंगे : शासनाच्या कृषी विभागाकडुन सर्व शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु केल्याची माहीती देण्यात आलेली होती. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्ट्रर, ट्रॅक्टर चलीत औजारांमध्ये रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, गर, कापणी यंत्र, फवारणी यंत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ शेतकºयांना लॉटरी पध्दतीने मिळणार आहे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या आणि यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरलेल्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानासाठी लाभार्थी शेतकºयांची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.यंत्र आणि अवजारे खरेदीसाठी भरपूर अनुदान मिळत असल्याने शेतकºयांसाठी ही योजना वरदान ठरत आहे. ह्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करणे आवश्यक असते. त्यासाठी शासनाने पोर्टल सुरू केले आहे. मात्र हे पोर्टलच व्यवस्थित कार्यान्वीत न झाल्याने शेतकºयांची नोंदणी प्रक्रि या ठप्प झाली आहे. त्यातच शालेय विद्यार्थी आणि इतर योजनांची आॅनलाईन कामकाजाही लोड सीएससी सेंटर आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये आहे. त्यातच कृषी विभागाची साईट अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने सेंटर चालक वैतागलेले आहेत.सरकारने शेतकºयांसाठी कृषी विभागाकडून यांत्रिकीकरण योजना सुरू केल्यापासून अनेकवेळा पोर्टलच्या कनेक्टिव्हिटीत अडथळा उद्भवत असून अर्ज दाखल करून घेणे अशक्य ठरत असल्याने आम्ही सर्व केंद्र चालक अक्षरश: हैराण झालो आहोत. सेंटरवर / ग्रामपंचायतीमध्ये शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. सद्या सुरु असलेल्या कोरोनाच्या पाशर््वभुमीवर संबंधित विभागाने याची दखल घेऊन ही अडचण लवकर दूर करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.- विशाल घोटेकर, सीएससी केंद्र संचालक, खेडलेझुंगे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आॅनलाईन भरण्यासाठीची पध्दत शासनाकडुन खरोखरच कौतुकास्पद आहे. परंतु त्यासाठी जी काही यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे ती अत्यंत कुचकामी आहे. आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिवस-दिवस सीएससी सेंटरवर, ग्रामपंचायतीमध्ये बसुनही अर्ज आॅनलाईन होत नसल्याने शेतकरी त्रस्त होत आहे. कोरोनाची महामारी व सद्या पडत असलेल्या सततच्या पाऊसामुळे आधीच शेतकरी अडचणीत असताना ही शेतकरी हिताच्या योजनाच्या अंमलबजावणीबाबत सरकारची उदासीनता दिसून येते ही निश्चित खेदाची आणि चिंताजनक बाब आहे.- रामदास गोरडे, शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार