शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
3
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
4
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी, क्रिप्टो मार्केट आपटलं; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
6
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
7
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
8
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
9
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
10
IND vs SA 2nd Test Pitch Report: गुवाहाटीत ‘मुंबई पॅटर्न’? पिच ‘कोणाला’ देणार साथ?
11
Health Crisis: कितीही अँटिबायोटिक खाल्ले तरीही होईना काही परिणाम; जीवाणूंची शक्ती वाढली, आरोग्य धोक्यात!
12
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
13
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
14
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
15
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
16
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
17
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
18
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
19
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
20
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने हुलकावणी दिल्यामुळे निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 15:10 IST

देवळा : परतीच्या पावसाकडे डोळे लाउन बसलेल्या शेतकऱ्यांची, पावसाने हुलकावणी दिल्यामुळे निराशा झाली असून देवळा तालुक्यावर भिषण दुष्काळाच्या छाया पसरू लागल्या आहेत.सर्व तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देतालुक्याच्या पूर्व भागात खरीपाची पीके देखील हातातून गेल्यामुळे तेथील परिस्थिती गंभीर झाली असून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. रब्बीचा हंगाम घेण्याच्या आशा देखील आता मावळल्या आहेत. देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी नागरीक करीत आहेत.

देवळा : परतीच्या पावसाकडे डोळे लाउन बसलेल्या शेतकऱ्यांची, पावसाने हुलकावणी दिल्यामुळे निराशा झाली असून देवळा तालुक्यावर भिषण दुष्काळाच्या छाया पसरू लागल्या आहेत.सर्व तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.तालुक्यात पावसाळयाच्या पूर्वार्धात पडलेल्या थोड्याफार पावसावर शेतकº्यांनी खरिपाच्या पीकांची पेरणी केली. नंतर मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे पूर्व भागातील शेतकº्यांनी खरीपाची पीके सोडून दिली. या वर्षी चणकापूर उजव्या कालव्याला सोडलेल्या पूर पाण्यामुळे कालव्याच्या लाभक्षेत्रात येणार्या वरवंडी, मटाणे,वाजगाव, रामेश्वर आदी गावांना खरीपाच्या पीकांना लाभ झाला. तेच पाणी पुढे रामेश्वर धरणातून वाढीव कालव्याद्वारे उमराणा येथील परसूल धरणापर्यंत नेण्यात यश आले.या कालव्यालगत असलेल्या वाखारी, पिंपळगाव ( वा ), खुंटेवाडी,वाखारवाडी, सुभाषनगर, दहिवड, आदी गावातील छोटेमोठे बंधारे, धरण भरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. परंतु चणकापूर उजव्या कालव्याची कमी वहन क्षमता, पाण्याची होणारी गळती व चोरी, तसेच तालुक्यातील कमी पर्जन्यमानामुळे, पुरेसे पाणी कोणालाच मिळाले नाही.तालुक्यातील जनतेची पाण्याची मागणी पाहता हे पाणी अपुरे पडत आहे. चणकापूर उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढविणे, चणकापूर येथे म्हशाड नाल्याचे पाणी कालव्यात टाकणे, वाढीव कालव्याचे पाणी झाडी एरंड गावपर्यंत नेणे हि आश्वासनेनेत्यांनी पूर्ण करून जनतेला दिलासा द्यावा अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेने व्यक्त केली आहे.दुष्काळाचा सामना करण्यासाठी महसूल विभागाने आतापासूनच तालुक्यात गावागावातील पाणी पुरवठा योजना अवलंबून असलेल्या धरण, पाझर तलाव, बंधारे आदींमधील पाणी पिण्यासाठी आरिक्षत करून त्यात सुरू असलेले अवैध विजपंप वीज कंपनी, पोलिस यांची मदत घेउन बंद करावे अशी मागणी नागरीक करीत आहेत. शासनाने वेळीच योग्य ती उपाययोजना केली नाही तर फेबुवारी महीन्यातच पाण्याचे हे सर्व स्त्रोत कोरडे होउन जनतेला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे..दहिवड येथील चिंचलवण पाझरतलाववाढीव कालव्याद्वारे भरून देण्यात आला आहे. शेतकरीया तलावातील पाणी टँकरने भरून फळबागा वाचिवण्यासाठी प्रयत्न करीन आहेत. लगतचे शेतकरी यास विरोध करत असल्यामुळे पाण्यासाठी आतापासूनच वादाविवाद सुरू झाले आहेत. यावरून आगामी काळातील दुष्काळाबाबत वेळीच सावध होउन शासनाने आतापासूनच पाणी साठे आरक्षित करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.