शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर महापालिकेतच मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 14:52 IST

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे, वाढीव मोबदला मिळावा आदी मागण्याच्या पूर्ततेसाठी प्रकल्पग्रस्तांनी १५ आॅगस्ट रोजी कश्यपी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला असून, त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देप्रशासनाचा नकार : लोकप्रतिनिधी भरतीसाठी अनुकूल ३६ प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्याचा ठराव मंजूर केला

नाशिक : कश्यपी धरणग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याच्या प्रश्नावर महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातच मतभेद असल्याचे उघड झाले असून, गेल्या आठवड्यात प्रकल्पग्रस्तांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेतले जाणार नाही, अशी भूमिका आयुक्तांनी घेतलेली असताना, तत्पूर्वीच २०१७ मध्ये महासभेने कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर ठराव करून शासनाच्या अनुमतीने ३६ प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामवून घेण्याचा ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठविण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न पुन्हा महापालिकेच्या कोर्टात गेला आहे.प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे, वाढीव मोबदला मिळावा आदी मागण्याच्या पूर्ततेसाठी प्रकल्पग्रस्तांनी १५ आॅगस्ट रोजी कश्यपी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला असून, त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात आली. त्यात महापालिकेने प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्याचा ठराव करावा, अशी भूमिका जिल्हाधिका-यांनी मांडली असता, महापालिकेच्या वतीने जिल्हाधिका-यांना पत्र देऊन कश्यपी धरणाच्या पाण्याचा कोणताही लाभ पाटबंधारे खात्याकडून मिळत नसल्याने धरणग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात येणार नसल्याचे आयुक्तांच्या पत्रान्वये स्पष्ट करण्यात आले होते. महापालिकेच्या या पत्रामुळे धरणग्रस्तांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक चंद्रकांत खाडे यांनी महापालिकेच्या महासभेचा दि. २० सप्टेंबर २०१७ रोजीचा ठराव क्रमांक ७५९ची प्रत मिळविली असता, त्यात महासभेने ३६ प्रकल्पग्रस्तांच्या यादीतून पात्र व्यक्तींची निवड करण्याची कार्यवाही करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या नियुक्त्या जाहिरातीशिवाय व त्यांची सेवा प्रवेश अर्हता, गुणवत्ता न डावलता करता येणार नाही, असे नमूद करून महापालिकेचा आस्थापना खर्चाची मर्यादा ३५ टक्के ठेवण्यात आली असल्यामुळे नवीन पदांची भरती करता येत नसली तरी, शासनाकडून त्याबाबत सूट घेऊन मान्यता दिल्यास ३६ प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. सदर ठराव नगरसचिवांच्या स्वाक्षरीनिशी शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. असे असताना आयुक्तांनी थेट कश्यपी प्रकल्पग्रस्तांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींची परस्पर विरोधी भूमिका समोर आली आहे.या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन यासंदर्भातील माहिती दिली असून, आता मागण्यांच्या पूर्ततेसाठी महापालिकेवरच मोर्चा नेण्याची तयारी चालविली आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाNashikनाशिक