शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

जलसंपदावरून भाजप मंत्री- आमदारांमध्येच मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:18 IST

नाशिक येथील जलसंपदा विभागाचे काय इतर कोणतेही कार्यालय नाशिक जिल्हा बाहेर हलवू देणार नाही, अशी भूमिका आमदार देवयानी फरांदे ...

नाशिक येथील जलसंपदा विभागाचे काय इतर कोणतेही कार्यालय नाशिक जिल्हा बाहेर हलवू देणार नाही, अशी भूमिका आमदार देवयानी फरांदे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर नाशिकचे पळवलेले पाणी बीअर कंपन्यांसाठी वापरत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, जलसंपदा आणि पाणी या विषयावरून पुन्हा एकदा भाजपाचे केंद्रीय मंत्री आणि नाशिकच्या स्थानिक आमदारांमध्ये असलेले मतभेद उघड झाले आहे.

औरंगाबादसह मराठवाड्याला पाणीपुरवठा करण्यावरून यापूर्वी आमदार देवयानी फरांदे आणि आमदार प्रशांत बंब यांच्यात अशाप्रकारे मतभेद होते. बंब यांनी पाणी पुरवठ्यासाठी गंगापूर धरण उडवून देण्याचे विधान कुंभमेळ्याच्या दरम्यान केले होते, त्यावरून बराच वाद झाला होता. नाशिकमध्ये आंदोलनेही झाले हेाती. आता नाशिकमधील धरणांचे नियोजन औरंगाबादच्या कब्जात घेण्यावरून वादाला सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत औरंगाबाद व मराठवाडा येथील लोकप्रतिनिधींकडून नाशिक येथील जलसंपदा विभागाचे कार्यालय औरंगाबाद येथे हलविणेबाबत मागणी केली. या मागणीचा समाचार घेताना आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक जिल्ह्यातील पिण्याचे पाणी शेतीसाठी वापरले जात असल्या असल्याच्या आरोपाचे खंडन केले व हे आरोप खोटे असल्याचे स्पष्ट करताना उलटपक्षी जायकवाडी धरणातील पाणी मात्र उसाच्या शेतीसाठी व बीयर कंपन्यांसाठी वापरले जात असल्याचे आपण एमडब्ल्यूआरआरएच्या सुनावणीदरम्यान सिद्ध केले असल्याची बाब त्यांनी विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. नांदूर मध्यमेश्वर, भाम, भावली, वाकी, किंवा नार पार प्रकल्प, वैतरणा प्रकल्प ही सर्व प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील असून त्यासाठी नाशिकच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी दिलेल्या आहेत. तसेच या धरणाची बांधणी ही नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी करण्यात आलेली होती व इंग्रजांच्या काळापासून नाशिक पाटबंधारे विभाग याचे सनियंत्रण करत असल्याची बाब देखील त्यांनी विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.

इन्फो.

समुद्रात वाहून जाणारे ३२५दलघफू पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याची योजना नाशिक जिल्ह्यात होत असताना त्यावर सनियंत्रण करणारी कार्यालये ५० किलोमीटरवरून हलवून २०० किलोमीटरवरील औरंगाबाद येथे नेणे व्यवहार्य होणार नाही, असे स्पष्ट करतानाच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यालय नाशिक येथे हलविण्यात यावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.