शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

जलसंपदावरून भाजप मंत्री- आमदारांमध्येच मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:18 IST

नाशिक येथील जलसंपदा विभागाचे काय इतर कोणतेही कार्यालय नाशिक जिल्हा बाहेर हलवू देणार नाही, अशी भूमिका आमदार देवयानी फरांदे ...

नाशिक येथील जलसंपदा विभागाचे काय इतर कोणतेही कार्यालय नाशिक जिल्हा बाहेर हलवू देणार नाही, अशी भूमिका आमदार देवयानी फरांदे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर नाशिकचे पळवलेले पाणी बीअर कंपन्यांसाठी वापरत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, जलसंपदा आणि पाणी या विषयावरून पुन्हा एकदा भाजपाचे केंद्रीय मंत्री आणि नाशिकच्या स्थानिक आमदारांमध्ये असलेले मतभेद उघड झाले आहे.

औरंगाबादसह मराठवाड्याला पाणीपुरवठा करण्यावरून यापूर्वी आमदार देवयानी फरांदे आणि आमदार प्रशांत बंब यांच्यात अशाप्रकारे मतभेद होते. बंब यांनी पाणी पुरवठ्यासाठी गंगापूर धरण उडवून देण्याचे विधान कुंभमेळ्याच्या दरम्यान केले होते, त्यावरून बराच वाद झाला होता. नाशिकमध्ये आंदोलनेही झाले हेाती. आता नाशिकमधील धरणांचे नियोजन औरंगाबादच्या कब्जात घेण्यावरून वादाला सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत औरंगाबाद व मराठवाडा येथील लोकप्रतिनिधींकडून नाशिक येथील जलसंपदा विभागाचे कार्यालय औरंगाबाद येथे हलविणेबाबत मागणी केली. या मागणीचा समाचार घेताना आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक जिल्ह्यातील पिण्याचे पाणी शेतीसाठी वापरले जात असल्या असल्याच्या आरोपाचे खंडन केले व हे आरोप खोटे असल्याचे स्पष्ट करताना उलटपक्षी जायकवाडी धरणातील पाणी मात्र उसाच्या शेतीसाठी व बीयर कंपन्यांसाठी वापरले जात असल्याचे आपण एमडब्ल्यूआरआरएच्या सुनावणीदरम्यान सिद्ध केले असल्याची बाब त्यांनी विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. नांदूर मध्यमेश्वर, भाम, भावली, वाकी, किंवा नार पार प्रकल्प, वैतरणा प्रकल्प ही सर्व प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील असून त्यासाठी नाशिकच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी दिलेल्या आहेत. तसेच या धरणाची बांधणी ही नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी करण्यात आलेली होती व इंग्रजांच्या काळापासून नाशिक पाटबंधारे विभाग याचे सनियंत्रण करत असल्याची बाब देखील त्यांनी विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.

इन्फो.

समुद्रात वाहून जाणारे ३२५दलघफू पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याची योजना नाशिक जिल्ह्यात होत असताना त्यावर सनियंत्रण करणारी कार्यालये ५० किलोमीटरवरून हलवून २०० किलोमीटरवरील औरंगाबाद येथे नेणे व्यवहार्य होणार नाही, असे स्पष्ट करतानाच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यालय नाशिक येथे हलविण्यात यावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.