शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

गंगापूररोडवर घाणीचे साम्राज्य; रोगराई पसरण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:38 IST

गोवर्धन-गिरणारे रस्त्यावर मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचले असून, यामुळे परिसरातील नागरिक, येणाºया-जाणाºया वाहनांना व त्यातील प्रवाशांना घाणीच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, परिसरातील नागरिकांना त्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

गंगापूर : गोवर्धन-गिरणारे रस्त्यावर मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचले असून, यामुळे परिसरातील नागरिक, येणाºया-जाणाºया वाहनांना व त्यातील प्रवाशांना घाणीच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, परिसरातील नागरिकांना त्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. विशेष बाब म्हणजे हे सर्व कचºयाचे ढीग ग्रामपंचायतीच्या कार्यालयाशेजारीच असल्याने ग्रामपंचायतीचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांनी सांगितले.नाशिक महापालिकेची हद्द संपताच गोवर्धन ग्रामपंचायतीची हद्द सुरू होते. गोवर्धन ग्रामपंचायत हद्दीत मोठमोठ्या शिक्षण संस्था तसेच वाइन उद्योग असल्याने येथील ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे मोठे हातभार लागल्याचे दिसते. मात्र ग्रामपंचायतीच्या परिसरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात दिसून येते. गोवर्धन गिरणारेच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे कचºयाचे ढीग साचले असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना व येणाºया-जाणाºया नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच यामुळे गावात रोगराई पसरली असून, अनेक जणांना दवाखान्याच्या चकरा माराव्या लागत आहेत. ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मात्र हे सर्व व्यवस्थापनात संपूर्णपणे अयशस्वी ठरल्याचे दिसते. ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. कचºयाच्या ढिगाºयाच्या बाजूलाच उद्योगाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची राहण्याची इमारत असल्याने त्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गोवर्धन गावाला स्वच्छतेच्या बाबतीत मोठमोठे पुरस्कार मिळालेले आहेत, मात्र काही गावांतील व्यवस्थापन शून्य अनुभव असलेल्या ग्राम विकास अधिकाऱ्यांमुळे गावाचे नाव संपूर्णपणे बदनाम होताना दिसते. रोडवर घरातील ओला व सुका कचरा रस्त्यात पडलेला दिसतो. यामुळे नागरिकांना साथीच्या रोगाचा सामना करावा लागत असून, परिसरात साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरच परिसरातील नागरिक कचरा टाकतात त्याची दुर्गंधीचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो.कचºयाच्या ढिगांमुळे श्वान, वराह आदी जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर याठिकाणी वाढल्याने रोगराई वाढते त्यामुळे नको त्या आजाराने नागरिक त्रस्त होऊन दवाखान्याच्या चकरा मारतात. या संपूर्ण परिसराची नागरिकांनी स्वच्छतेची मागणी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य