शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

दिंडोरी : ११३ गावे टंचाईच्या फेऱ्यात

By admin | Updated: May 10, 2016 22:11 IST

दिंडोरी : ११३ गावे टंचाईच्या फेऱ्यात

भगवान गायकवाड दिंडोरीदिंडोरी तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून कमी होत असलेल्या पर्जन्यमानाने अगोदरच धरणे भरत नसताना व जमिनीची पातळी वर्षागणिक घटत असताना, यंदा जेमतेम पाऊस व त्यातच तालुक्याच्या ज्या पश्चिम भागात धरणे आहेत तेथे अत्यल्प पाऊस पडल्याने यंदा सारीच धरणे निम्मीच भरली. त्यामुळे कालव्याचे आवर्तन न सुटल्याने यंदा अभूतपूर्व अशी पाणीटंचाई तालुक्यात निर्माण झाली असून, शेकडो कूपनलिका आटल्या, तर विहिरींनीही तळ गाठला आहे. कधीही पाणीटंचाई न जाणवलेल्या नद्यालगतच्या गावांना यंदा नुसत्या टंचाईच्या झळाच पोहचल्या नाहीत, तर टँकर मागविण्याची वेळ आली असून, टँकरमुक्त ख्याती असलेल्या दिंडोरी तालुक्यातील २२ गावांना टँकर मागणीची वेळ आली आहे. पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर तब्बल ११३ गावे यंदा पाणीटंचाईच्या फेऱ्यात आली असून, त्यात अजून वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. इतर तालुक्यांची तहान भागविणाऱ्या दिंडोरी तालुक्याला यंदा प्रथमच तहानलेला राहण्याची वेळ आली आहे.दिंडोरी तालुक्यातील १५५ गावे व पाड्यांना यापूर्वीच विविध योजनांमधून नळपाणीपुरवठा योजना राबविल्या गेल्या आहेत. गावोगावी असलेल्या शेकडो कूपनलिकांचे पाणी यंदा मात्र प्रथमच आटले आहे, तर फेब्रुवारीतच अनेक विहिरींनी तळ गाठल्याने विविध गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पंचायत समितीतर्फेआॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून या तिमाही पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा बनविण्यात आला असून, त्यात मार्चपर्यंत आठ गावांना टँकर देण्याची, तर जूनपर्यंत पुन्हा दहा गावांना टँकर देण्याची वेळ येण्याचा अंदाज बांधला जात आहे. प्राथमिक टप्प्यात ज्या गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे तेथे आवश्यक उपाययोजना सुरू झाल्या आहेत. विहिरींचे खोलीकरण, खासगी विहिरींचे अधिग्रहण आदि कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विविध गावांतील नादुरुस्त पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. कूपनलिका खोदण्यात येत आहेत. मात्र अनेक कूपनलिका कोरड्या जात असल्याने मोठी अडचण झाली आहे. टंचाई आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात पाच गावे व एक वाडी येथे उपाययोजना करण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात ६५ गावे व आठ पाडे येथे उपाययोजना करण्यात येत आहे, तर तिसऱ्या टप्प्यात ३३ गावे व एक पाडा येथे उपाययोजना करण्यात येणार आहे. असे यंदा तब्बल एकूण १०३ गावे १० वाड्या-पाडे यांना टंचाईच्या झळा पोहचल्या असून, यात अजून गावांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उर्वरित गावांत मोठ्या प्रमाणात पाणीकपात करावी लागत आहे.