शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

दिंडोरी : ११३ गावे टंचाईच्या फेऱ्यात

By admin | Updated: May 10, 2016 22:11 IST

दिंडोरी : ११३ गावे टंचाईच्या फेऱ्यात

भगवान गायकवाड दिंडोरीदिंडोरी तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून कमी होत असलेल्या पर्जन्यमानाने अगोदरच धरणे भरत नसताना व जमिनीची पातळी वर्षागणिक घटत असताना, यंदा जेमतेम पाऊस व त्यातच तालुक्याच्या ज्या पश्चिम भागात धरणे आहेत तेथे अत्यल्प पाऊस पडल्याने यंदा सारीच धरणे निम्मीच भरली. त्यामुळे कालव्याचे आवर्तन न सुटल्याने यंदा अभूतपूर्व अशी पाणीटंचाई तालुक्यात निर्माण झाली असून, शेकडो कूपनलिका आटल्या, तर विहिरींनीही तळ गाठला आहे. कधीही पाणीटंचाई न जाणवलेल्या नद्यालगतच्या गावांना यंदा नुसत्या टंचाईच्या झळाच पोहचल्या नाहीत, तर टँकर मागविण्याची वेळ आली असून, टँकरमुक्त ख्याती असलेल्या दिंडोरी तालुक्यातील २२ गावांना टँकर मागणीची वेळ आली आहे. पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर तब्बल ११३ गावे यंदा पाणीटंचाईच्या फेऱ्यात आली असून, त्यात अजून वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. इतर तालुक्यांची तहान भागविणाऱ्या दिंडोरी तालुक्याला यंदा प्रथमच तहानलेला राहण्याची वेळ आली आहे.दिंडोरी तालुक्यातील १५५ गावे व पाड्यांना यापूर्वीच विविध योजनांमधून नळपाणीपुरवठा योजना राबविल्या गेल्या आहेत. गावोगावी असलेल्या शेकडो कूपनलिकांचे पाणी यंदा मात्र प्रथमच आटले आहे, तर फेब्रुवारीतच अनेक विहिरींनी तळ गाठल्याने विविध गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पंचायत समितीतर्फेआॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून या तिमाही पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा बनविण्यात आला असून, त्यात मार्चपर्यंत आठ गावांना टँकर देण्याची, तर जूनपर्यंत पुन्हा दहा गावांना टँकर देण्याची वेळ येण्याचा अंदाज बांधला जात आहे. प्राथमिक टप्प्यात ज्या गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे तेथे आवश्यक उपाययोजना सुरू झाल्या आहेत. विहिरींचे खोलीकरण, खासगी विहिरींचे अधिग्रहण आदि कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विविध गावांतील नादुरुस्त पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. कूपनलिका खोदण्यात येत आहेत. मात्र अनेक कूपनलिका कोरड्या जात असल्याने मोठी अडचण झाली आहे. टंचाई आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात पाच गावे व एक वाडी येथे उपाययोजना करण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात ६५ गावे व आठ पाडे येथे उपाययोजना करण्यात येत आहे, तर तिसऱ्या टप्प्यात ३३ गावे व एक पाडा येथे उपाययोजना करण्यात येणार आहे. असे यंदा तब्बल एकूण १०३ गावे १० वाड्या-पाडे यांना टंचाईच्या झळा पोहचल्या असून, यात अजून गावांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उर्वरित गावांत मोठ्या प्रमाणात पाणीकपात करावी लागत आहे.