शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी : ११३ गावे टंचाईच्या फेऱ्यात

By admin | Updated: May 10, 2016 22:11 IST

दिंडोरी : ११३ गावे टंचाईच्या फेऱ्यात

भगवान गायकवाड दिंडोरीदिंडोरी तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून कमी होत असलेल्या पर्जन्यमानाने अगोदरच धरणे भरत नसताना व जमिनीची पातळी वर्षागणिक घटत असताना, यंदा जेमतेम पाऊस व त्यातच तालुक्याच्या ज्या पश्चिम भागात धरणे आहेत तेथे अत्यल्प पाऊस पडल्याने यंदा सारीच धरणे निम्मीच भरली. त्यामुळे कालव्याचे आवर्तन न सुटल्याने यंदा अभूतपूर्व अशी पाणीटंचाई तालुक्यात निर्माण झाली असून, शेकडो कूपनलिका आटल्या, तर विहिरींनीही तळ गाठला आहे. कधीही पाणीटंचाई न जाणवलेल्या नद्यालगतच्या गावांना यंदा नुसत्या टंचाईच्या झळाच पोहचल्या नाहीत, तर टँकर मागविण्याची वेळ आली असून, टँकरमुक्त ख्याती असलेल्या दिंडोरी तालुक्यातील २२ गावांना टँकर मागणीची वेळ आली आहे. पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर तब्बल ११३ गावे यंदा पाणीटंचाईच्या फेऱ्यात आली असून, त्यात अजून वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. इतर तालुक्यांची तहान भागविणाऱ्या दिंडोरी तालुक्याला यंदा प्रथमच तहानलेला राहण्याची वेळ आली आहे.दिंडोरी तालुक्यातील १५५ गावे व पाड्यांना यापूर्वीच विविध योजनांमधून नळपाणीपुरवठा योजना राबविल्या गेल्या आहेत. गावोगावी असलेल्या शेकडो कूपनलिकांचे पाणी यंदा मात्र प्रथमच आटले आहे, तर फेब्रुवारीतच अनेक विहिरींनी तळ गाठल्याने विविध गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पंचायत समितीतर्फेआॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून या तिमाही पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा बनविण्यात आला असून, त्यात मार्चपर्यंत आठ गावांना टँकर देण्याची, तर जूनपर्यंत पुन्हा दहा गावांना टँकर देण्याची वेळ येण्याचा अंदाज बांधला जात आहे. प्राथमिक टप्प्यात ज्या गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे तेथे आवश्यक उपाययोजना सुरू झाल्या आहेत. विहिरींचे खोलीकरण, खासगी विहिरींचे अधिग्रहण आदि कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विविध गावांतील नादुरुस्त पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. कूपनलिका खोदण्यात येत आहेत. मात्र अनेक कूपनलिका कोरड्या जात असल्याने मोठी अडचण झाली आहे. टंचाई आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात पाच गावे व एक वाडी येथे उपाययोजना करण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात ६५ गावे व आठ पाडे येथे उपाययोजना करण्यात येत आहे, तर तिसऱ्या टप्प्यात ३३ गावे व एक पाडा येथे उपाययोजना करण्यात येणार आहे. असे यंदा तब्बल एकूण १०३ गावे १० वाड्या-पाडे यांना टंचाईच्या झळा पोहचल्या असून, यात अजून गावांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उर्वरित गावांत मोठ्या प्रमाणात पाणीकपात करावी लागत आहे.