शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

बागलाणमध्ये सातशे विहिरींचे खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 16:28 IST

शेतकऱ्यांचा जुगार : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाय

ठळक मुद्देतालुक्यातील एकूण पीक लागवडीचे क्षेत्र ६५ हजार ६४६ हेक्टर असून, त्यापैकी रब्बी हंगामाचे लागवड क्षेत्र केवळ १२ हजार १७० हेक्टर आहे.

खमताणे : दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणा-या बागलाण तालुक्यातील शेतीव्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे या क्षेत्रात नेहमीच पाण्याची आस लागलेली असते. दर वर्षीप्रमाणे यंदाही पाण्यासाठी शेतक-यांचा जुगार सुरू असून तालुक्यात सद्यस्थितीत सुमारे सातशे विहिरींचे खोदकाम सुरू आहे. त्यावर सुमारे सुमारे पंचवीस कोटी रुपये खर्ची पडत आहेत.तालुक्यातील एकूण पीक लागवडीचे क्षेत्र ६५ हजार ६४६ हेक्टर असून, त्यापैकी रब्बी हंगामाचे लागवड क्षेत्र केवळ १२ हजार १७० हेक्टर आहे. तालुक्यातील उत्तर-पूर्व भाग दुष्काळी तर पश्चिम-दक्षिण भाग हे कॅनाल क्षेत्राकाठी येतात. तालुक्यातील जमीन पाण्याचा निचरा होणारी असल्यामुळे भूजल पातळीही खोलवर गेली आहे. शेतातील पिकांना पाणी मिळावे, शेत बागायती झाले पाहिजे. यासाठी दरवर्षी पाण्याची टंचाई निर्माण झाली की, शेतक-यांचा विहिरीसाठी शोध सुरू होतो. गेल्या दहा -बारा वर्षात विहिरी आणि असंख्य कूपनलिका खोदल्या जातात. विहिरी व कूपनलिका खोदण्यासाठी कधी कष्टाने हंगामात मिळविलेली मिळकत टाकण्यात येते, तर कधी बँक, सोसायट्यांकडून कर्ज घेऊन पाण्याचा शोध घेतला जातो. पाणी लागले तर शेती बागायती होते. परंतु बाजारभाव धोका देऊन जातो . घेतलेल्या कर्जाचा आकडा वाढत असल्यामुळे आर्थिक स्थिती बिघडते आणि शेतकरी या दुष्टचक्र ात अडकत जातो.५ टक्केच विहिरींना पाणीतालुक्यात १७९ खेड्यांमधुन सुमारे ७०० नव्याने विहीरी खोदल्या जात आहेत. साठ फूट खोलीची विहिर खोदून बांधण्यासाठी सुमारे तीन लाख पन्नास हजार रूपयांचा खर्च लागतो. त्यामुळे दर वर्षी पाण्याच्या शोधासाठी बागलाण तालुक्यात सुमारे पंचवीस रूपयांचा जुगार खेळला जातो. यात राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत अनुदानित विहिरीची संख्या वेगळी आहे . यातील सरासरी ५ टक्के विहिरींना पाणी लागते, तर बाकी शेतक-यांचा खर्च व्यर्थच जात असल्याने कर्जाचा बोजा वाढतच जातो.

टॅग्स :Nashikनाशिक