शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

आहारमासात उपासमारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:36 AM

सरकारी यंत्रणांतील बेफिकिरीचा मुद्दा तर वारंवार चर्चेत येत असतोच; पण त्यांच्या या बेफिकिरीमुळे पुरवठादार अगर ठेकेदारही किती बेगुमान होत चालले आहेत व त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे, याची प्रचिती जिल्हा परिषदेत येत आहे.

ठळक मुद्देकारवाईचे कागदी घोडे नाचविण्यापेक्षा अशा प्रश्नांची उत्तरे शोधायला हवी.

सरकारी यंत्रणांतील बेफिकिरीचा मुद्दा तर वारंवार चर्चेत येत असतोच; पण त्यांच्या या बेफिकिरीमुळे पुरवठादार अगर ठेकेदारही किती बेगुमान होत चालले आहेत व त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे, याची प्रचिती जिल्हा परिषदेत येत आहे.खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी शिक्षण खात्याकडून पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत खिचडीसाठी तांदुळाचा पुरवठा करण्यात येत असतो. या खिचडीत निकृष्टता असते, अशा तक्रारी आजवर नित्याच्याच ठरल्या होत्या; परंतु आता या खिचडीसाठीचा तांदूळ गेल्या दीड-दोन महिन्यांपासून मिळालेलाच नसल्याची ओरड होऊ लागली आहे. हा तांदूळ पुरवठ्यासंबंधातील खर्चाशी निगडित काही मागण्या ठेकेदारांच्या असूही शकतील; परंतु त्याचा निर्णय होत नाही म्हणून शाळा-शाळांना तांदूळ पुरवण्याचेच रोखून धरले जात आहे हे पूर्णत: गैर व अडवणुकीचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपासमार घडून येत असून, त्यामागील शासनाच्या हेतूलाच हरताळ फासला जात आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराबाबतची जाणीव जागृती करून देण्यासाठी शासनातर्फे सप्टेंबर महिना हा खास आहारमास म्हणून साजरा केला जात असताना त्यातच जणू अडचणीचा फाल्गुनमास ओढवला आहे. यात संबंधित ठेकेदारांवर काय कारवाई व्हायची ती होईलही, परंतु विद्यार्थ्यांना आहारापासून वंचित राहावे लागल्याची जी वेळ निघून गेली आहे तिची भरपाई कशी होणार? आता विलंबाने तांदूळ पुरवठा केला तरी, जे दिवस निघून गेले त्या दिवसांच्या हिशेबाने विद्यार्थ्यांना घरीच तांदूळ देणार का असेही प्रश्न उपस्थित होणारे आहेत. तेव्हा कारवाईचे कागदी घोडे नाचविण्यापेक्षा अशा प्रश्नांची उत्तरे शोधायला हवी.