शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

डिझेल शवदाहिनी  तीन महिन्यांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:35 IST

पर्यावरण रक्षणाचा विचार करून महापालिकेने नाशिक अमरधाममध्ये सुरू केलेली डिझेल शवदाहिनी गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्तीअभावी बंद पडली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने आणखी दोन ठिकाणी डिझेल शवदाहिनी सुरू करण्यात येणार आहे.

नाशिक : पर्यावरण रक्षणाचा विचार करून महापालिकेने नाशिक अमरधाममध्ये सुरू केलेली डिझेल शवदाहिनी गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्तीअभावी बंद पडली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने आणखी दोन ठिकाणी डिझेल शवदाहिनी सुरू करण्यात येणार आहे. तथापि, एकमेव शवदाहिनीची दुरुस्ती होत नसताना नव्यांची तरी देखभाल दुरुस्ती होईल काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. नाशिक शहरातील सर्वच अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली जाते. अंत्यसंस्कारासाठी लाकूडही दिले जाते. त्यामुळे वृक्षतोड टळावी तसेच जलदगतीने अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी मनपाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर नाशिक अमरधाममध्ये डिझेल शवदाहिनी उभारण्यात आली होती. त्याला सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, नंतर प्रतिसाद वाढत गेला. परंतु महापालिकाच या शवदाहिनीकडे लक्ष पुरवत नाही. ती अनेकदा बंद असते. आताही गेल्या तीन महिन्यांपासून शवदाहिनी बंद असून, तिची दुरुस्तीच सुरू आहे.  नाशिकमध्ये या स्वरूपाचे काम करणारी कंपनी नसल्याने ठाणे येथील एका कंपनीला हे काम दिले जाते. त्यानुसार कंपनीने काम पूर्ण केले आहे. मात्र, चिमणीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार ठाण्याच्या ठेकेदाराने चिमणीच्या दुरुस्तीचे काम स्थानिक ठेकेदाराला दिले असून, त्याच्याकडून विलंब होत असल्याने अद्यापही शवदाहिनी कार्यान्वित होऊ शकलेली नाही. नाशिकमध्ये आता नागरिकांचा डिझेल शवदाहिनीकडे कल वाढला असून, महिन्याकाठी दोन ते तीन अंत्यसंस्कार डिझेल शवदाहिनीत होतात.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका