शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

आपल्या अन्नपदार्थात भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:20 IST

सातपूर : ‘अन्न सुरक्षित तर आरोग्य सुरक्षित’ या उक्तीनुसार अन्न उत्पादक व व्यावसायिकांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. कोणी ...

सातपूर : ‘अन्न सुरक्षित तर आरोग्य सुरक्षित’ या उक्तीनुसार अन्न उत्पादक व व्यावसायिकांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. कोणी भेसळ करून सदोष अन्नपदार्थ विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाते. अन्न व औषध प्रशासन विभागाची यावर करडी नजर असते. गेल्या आठ महिन्यांत टाकलेल्या छाप्यात घेतलेल्या शंभर नमुन्यांमध्ये दोन ठिकाणी भेसळ आणि कमी दर्जा आढळला. ३४ नमुने प्रमाणित आढळून आले असून, ६४ नमुने लॅबकडे प्रलंबित आहेत. अन्नपदार्थांतील भेसळीमुळे त्याचा थेट आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून त्यावर अंकुश ठेवण्यासाठी अन्न औषध प्रशासनाकडून वर्षभर छापे टाकून ते रोखण्याचे काम केले जाते. अन्न उत्पादक किंवा विक्रेत्याकडून लहानशा चुकीमुळे, दुर्लक्षामुळे असो अथवा हेतुपुरस्सर किंवा अनवधानाने असो त्याला कायद्यात माफी नाही.

इन्फो :-

भेसळ किती?

महिना नमुने भेसळ प्रमाणित प्रलंबित

जानेवारी- ०३ ०० ०१ ०१

फेब्रुवारी २६ ०१ २५ ००

मार्च ३४ ०० ०८ २६

एप्रिल ०० ०० ०० ००

मे ०० ०० ०० ००

जून १७ ०१ ०० १६

जुलै १२ ०० ०० १२

ऑगस्ट ०९ ०० ०० ०९

---------------------------------------------------------------------

१०० ०२ ३४ ६४

इन्फो :- खरेदी करताय, अशी घ्या काळजी

अन्न व औषध प्रशासन जागरुक आहे; पण प्रशासनाचेच काम आहे, असे म्हणून चालणार नाही. ग्राहकानेदेखील जागरूक राहणे आवश्यक आहे. बाजारात खरेदीसाठी प्रामुख्याने कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याचे पॅकिंग व्यवस्थित आहे का? एक्स्पायरी डेट कोणती आहे. प्रमाणित केल्याचे नमूद आहे का? याबाबी तपासून घेणे गरजेचे आहे; अन्यथा त्याचा आरोग्यावर अनुचित परिणाम होऊ शकतो. कुठे काही चुकीचे घडत असेल? चुकीचे वाटत असेल तर प्रशासनाला कळविणे आणि खरेदी करताना चोखंदळपणे पाहणे आवश्यक असल्याचे आवाहन वेळोवेळी प्रशासनाकडून केले जाते.

इन्फो : सणासुदीच्या काळात होते अधिक भेसळ

साधारणपणे श्रावण महिन्यापासून सणांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते. नागपंचमी, रक्षाबंधन, पोळा, गणेश चतुर्दशी, गौरी गणपती, दसरा, दिवाळी, अशा सणांमध्ये दुग्धजन्य मिठाईचे पदार्थ, लाडू, चकल्या, गूळ, बेसन, अशा अनेक पदार्थांना मागणी असते. ग्राहकांची खरेदीसाठी असणारी गर्दी लक्षात घेऊन भेसळ मोठ्या प्रमाणात होते. ग्राहक नेमका इथेच फसतो. या काळात अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

इन्फो :- आपल्याकडे प्रामुख्याने दूध, पेढा, खवा, गोडेतेल, दुग्धजन्य मिठाई, यामध्ये भेसळ आढळते. दूध व खव्यातील भेसळ शरीराला अपायकारक आहे. त्यामुळे यावर लक्ष देऊन धडक कारवाई केली जाते. तक्रार आल्यास किंवा भेटी देताना नियमबाह्य आढळल्यास अन्नपदार्थांचे नमुने घेतले जातात. अहवाल आल्यावर कारवाई केली जाते.

-चंद्रशेखर साळुंखे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (अन्न)