शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावी निकालात धुळे जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:14 IST

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नोव्हेंबर/डिसेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि ...

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नोव्हेंबर/डिसेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल विभागीय मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी जाहीर केला. विभागात दोन्ही परीक्षेत धुळे जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीचा विभागाचा निकाल ३७.४२, तर बारावीचा निकाल २३.६३ टक्के इतका लागला. नाशिक विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेत ३८८० पैकी १४५२ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.४२ टक्के इतकी आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातून १७६६ पैकी ५५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ३१.४८ टक्के इतकी आहे. धुळे जिल्ह्यातील ३७० पैकी २१३ विद्यार्थी (५७.५७ टक्के), उत्तीर्ण झाले. जळगावमधील १०३४ पैकी ४९४ (४७.७८ टक्के), तर नंदुरबारमधील ७१० पैकी १८९ (२६.६२टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

इयत्ता बारावीची परीक्षा विभागात एकूण २९ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी ७५०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७४९२ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले असून, १७७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी २३.६३ इतकी आहे. नाशिक जिल्ह्यातील ३९५२ पैकी ७४२ (१८.७८ टक्के) धुळे जिल्ह्यातील ७७७ पैकी २६१(३३.५९ टक्के), जळगाव जिल्ह्यातील १२६६ पैकी ३६८ २९.०७ टक्के), तर नंदुरबार जिल्ह्यातून १४९७ पैकी ३९९ (२६.६५) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागातील उत्तीर्णतेची टक्केवारी २३.६३ इतकी आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी दिली. यावेळी विभागीय सचिव राजेंद्र अहिरे उपस्थित होते.

--इन्फो--

दहावीत तीन कॉपी प्रकरणे आढळून आली, तर बारावीत मात्र एकही कॉपी प्रकरण समोर आले नाही. दहावीतील ३ प्रकरणांपैकी दोन विद्यार्थ्यांचा गैरमार्गाशी थेट संबंध नसल्याने त्यांचे निकाल जाहीर करण्याचे प्रस्तावित आहे. एका विद्यार्थ्याने गुन्हा कबूल केल्याने मंडळ शिक्षासूचीनुसार त्यांचे संबंधित विषयाचे गुण रद्द करण्यात आले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण पडताळणी तसेच छायांकित प्रतींसाठी नियमानुसार संधी देण्यात आली आहे. गुण पडताळणीसाठी २४ तारखेपासून २ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यंना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनदेखील करता येणार आहे.