शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावी निकालात धुळे जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:14 IST

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नोव्हेंबर/डिसेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि ...

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नोव्हेंबर/डिसेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल विभागीय मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी जाहीर केला. विभागात दोन्ही परीक्षेत धुळे जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीचा विभागाचा निकाल ३७.४२, तर बारावीचा निकाल २३.६३ टक्के इतका लागला. नाशिक विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेत ३८८० पैकी १४५२ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.४२ टक्के इतकी आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातून १७६६ पैकी ५५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ३१.४८ टक्के इतकी आहे. धुळे जिल्ह्यातील ३७० पैकी २१३ विद्यार्थी (५७.५७ टक्के), उत्तीर्ण झाले. जळगावमधील १०३४ पैकी ४९४ (४७.७८ टक्के), तर नंदुरबारमधील ७१० पैकी १८९ (२६.६२टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

इयत्ता बारावीची परीक्षा विभागात एकूण २९ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी ७५०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७४९२ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले असून, १७७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी २३.६३ इतकी आहे. नाशिक जिल्ह्यातील ३९५२ पैकी ७४२ (१८.७८ टक्के) धुळे जिल्ह्यातील ७७७ पैकी २६१(३३.५९ टक्के), जळगाव जिल्ह्यातील १२६६ पैकी ३६८ २९.०७ टक्के), तर नंदुरबार जिल्ह्यातून १४९७ पैकी ३९९ (२६.६५) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागातील उत्तीर्णतेची टक्केवारी २३.६३ इतकी आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी दिली. यावेळी विभागीय सचिव राजेंद्र अहिरे उपस्थित होते.

--इन्फो--

दहावीत तीन कॉपी प्रकरणे आढळून आली, तर बारावीत मात्र एकही कॉपी प्रकरण समोर आले नाही. दहावीतील ३ प्रकरणांपैकी दोन विद्यार्थ्यांचा गैरमार्गाशी थेट संबंध नसल्याने त्यांचे निकाल जाहीर करण्याचे प्रस्तावित आहे. एका विद्यार्थ्याने गुन्हा कबूल केल्याने मंडळ शिक्षासूचीनुसार त्यांचे संबंधित विषयाचे गुण रद्द करण्यात आले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण पडताळणी तसेच छायांकित प्रतींसाठी नियमानुसार संधी देण्यात आली आहे. गुण पडताळणीसाठी २४ तारखेपासून २ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यंना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनदेखील करता येणार आहे.