शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

कर्करोगासह अन्य आजारांवर माफक दरात उपचार शक्य नव्या आरोग्य केंद्राची मुहूर्तमेढ : धारिवाल धर्मार्थ रुग्णालयाने मिळणार दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 12:55 AM

नाशिक : वैद्यकीय उपचार दिवसेंदिवस महाग होत असताना आणि खासगी शासनाने कितीही सक्ती केली तरी दवाखान्यांकडून म्हणावे तितक्या प्रमाणात गरिबांवर सवलतीच्या दरात उपचार केले जात नसल्याने उपचाराअभावी आजार वाढण्याचे आणि उपचाराअभावी मृत्युमुखी पडणाºयांचे प्रमाण लक्षणीय आहे.

ठळक मुद्देरुग्णांना सवलतीच्या दरात उपचारराज्यभरातील गरजू रुग्णांना सेवा घेता येणार

नाशिक : वैद्यकीय उपचार दिवसेंदिवस महाग होत असताना आणि खासगी शासनाने कितीही सक्ती केली तरी दवाखान्यांकडून म्हणावे तितक्या प्रमाणात गरिबांवर सवलतीच्या दरात उपचार केले जात नसल्याने उपचाराअभावी आजार वाढण्याचे आणि उपचाराअभावी मृत्युमुखी पडणाºयांचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाची, समाजातील दीनदुबळ्यांची, गोरगरिबांची सेवा करून ऋण व्यक्त करण्याची मोठी कामगिरी करण्याचे कामही मूळ धरू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर पंचवटीतील पेठरोड परिसरात ‘रसिकलाल धारिवाल’ धर्मार्थ रुग्णालयाच्या रूपाने जिल्ह्यासह राज्यभरातील रुग्णांना सवलतीच्या दरात उपचाराच्या संधीची भेट नवीन वर्षात मिळणार आहे.जैन समाजातील सर्व संस्था, संघटनांच्या पुढाकाराने हा भव्य प्रकल्प साकारला जात असून, मध्यमवर्गीय, गोरगरीब रुग्णांना खासगी दवाखान्यांमधील दरांच्या तुलनेतील ७० टक्के सवलतीच्या दरात येथे उपचार केले जाणार आहेत. हा दवाखाना पुणे येथील प्रसिद्ध रूबी हॉस्पिटलशी संलग्न असणार आहे. या दवाखान्यात केवळ नाशिक शहरातील, जिल्ह्यातीलच नाही, तर राज्यभरातील गरजू रुग्णांना सेवा घेता येणार आहे. दवाखान्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. एप्रिलच्या दरम्यान हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. या दवाखान्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती कै. रसिकलाल माणिकलाल धारिवाल, शोभा धारिवाल यांनी ११ कोटी रुपयांची घसघशीत मदत केली असून, जैन समाजबांधव, सर्व जातीय समाजबांधवांनी ९ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. स्व. हुकूमचंद बागमार यांच्या कल्पनेतूनआणि प्रेरणेतून एक लाख स्क्वेअर फूट परिसरात आठ मजली सुसज्ज असे रुग्णालय साकारले जात असून, १६५ बेडच्या या रुग्णालयात एमआरआय, सीटीस्कॅन, लिनर थिएटर (कॅन्सर तपासणी व उपचार), आॅपरेशन थिएटर, आयसीयू, जरनल वॉर्ड आदींची सोय आहे. प्रारंभी अस्थिरोग, स्त्रीरोग, जनरल सर्जरी, नेत्र तपासणी व उपचार आदींची सेवा दिली जाणार आहे.देणगीदारांना मदतीचे आवाहनआर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय उपचार घेऊ न शकणाºया रुग्णांना सवलतीच्या दरात वा मोफत उपचार मिळण्यासाठी पुणे, मुंबई गाठावे लागते. तेथेही राज्यभरातील रुग्णांची गर्दी पाहता नंबर लागणे कठीण असते. शिवाय अशा मोठ्या शहरांमध्ये दवाखान्यांपर्यंत पोहोचणे, तेथील स्थितीचे आकलन करणे, उपचारासाठी तेथे मुक्काम करावा लागण्यास येणाºया अडचणी पाहता रुग्ण व नातेवाईक काहीसे गांगरलेले असतात. अशांसाठी नाशिकसारख्या शहरात हे रुग्णालय वरदान ठरणार आहे. सर्व जाती-धर्मांतील नागरिकांनी या दवाखान्याच्या कामासाठी देणगी द्यावी, असे आवाहन दवाखाना समितीने केले आहे. या देणगीद्वारे ते उपकरणांवर, खोल्यांवर नावे देऊ शकतील.