शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांचे निराकरण करण्यासाठी भक्ती करा :  नरेंद्राचार्य महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:25 IST

भक्तीने प्रेम निर्माण होत असते. जशी भक्ती तसे फळ मिळते. काही लोक प्रचिती आल्यानंतर भक्ती बंद करतात तर काही भाविक भक्तीत सातत्य ठेवतात. भक्ती केली तर अनुभव मिळेल. कोणाचेही वाईट होऊ नये ही भक्तीमार्गाची मुख्य शिकवण आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.

पंचवटी : भक्तीने प्रेम निर्माण होत असते. जशी भक्ती तसे फळ मिळते. काही लोक प्रचिती आल्यानंतर भक्ती बंद करतात तर काही भाविक भक्तीत सातत्य ठेवतात. भक्ती केली तर अनुभव मिळेल. कोणाचेही वाईट होऊ नये ही भक्तीमार्गाची मुख्य शिकवण आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी जनम संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ येथे दोनदिवसीय समस्या मार्गदर्शन, प्रवचन व दर्शन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सोहळ्यास नाशिकसह अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील हजारो भक्तांनी हजेरी लावली. यावेळी भक्तांना मार्गदर्शन करताना स्वामी पुढे म्हणाले की, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, कोणाबद्दल वाईट विचार करू नका, प्रत्येकाने परमेश्वराचे नामस्मरण करावे मात्र त्यात शुद्धता असावी. नामस्मरण करताना कोणाबद्दल वाईट विचार मनात येता कामा नये. खाण्याच्या पथ्यासोबत बोलण्याचे पथ्यजर पाळले तर जीवन सुखी  होते.जीवनात दोन मार्ग आहेत. एक प्रपंच आणि दुसरा परमार्थ. प्रपंचात आनंदी जीवन जगायचे असेल तर परमार्थ करा. जीवनातला कमीपणा काढून टाका व्यक्तीने स्वत:ला कमी लेखू नये. नावात सामर्थ्य निर्माण होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. देव प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक माणसातदेखील देव असल्याचे सांगून स्वामींनी यावेळी अंधश्रद्धेवर प्रहार केले. भानामती, करणी केलेली आहे असे मनातून काढून टाका, हे थोतांड आहे. यात काही सत्यता नसून ही एक अंधश्रद्धा आहे. जीवनातून अंधश्रद्धा समूळ नष्ट करा, असेही ते शेवटी म्हणाले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक