शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

समस्यांचे निराकरण करण्यासाठी भक्ती करा :  नरेंद्राचार्य महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:25 IST

भक्तीने प्रेम निर्माण होत असते. जशी भक्ती तसे फळ मिळते. काही लोक प्रचिती आल्यानंतर भक्ती बंद करतात तर काही भाविक भक्तीत सातत्य ठेवतात. भक्ती केली तर अनुभव मिळेल. कोणाचेही वाईट होऊ नये ही भक्तीमार्गाची मुख्य शिकवण आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.

पंचवटी : भक्तीने प्रेम निर्माण होत असते. जशी भक्ती तसे फळ मिळते. काही लोक प्रचिती आल्यानंतर भक्ती बंद करतात तर काही भाविक भक्तीत सातत्य ठेवतात. भक्ती केली तर अनुभव मिळेल. कोणाचेही वाईट होऊ नये ही भक्तीमार्गाची मुख्य शिकवण आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी जनम संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ येथे दोनदिवसीय समस्या मार्गदर्शन, प्रवचन व दर्शन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सोहळ्यास नाशिकसह अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील हजारो भक्तांनी हजेरी लावली. यावेळी भक्तांना मार्गदर्शन करताना स्वामी पुढे म्हणाले की, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, कोणाबद्दल वाईट विचार करू नका, प्रत्येकाने परमेश्वराचे नामस्मरण करावे मात्र त्यात शुद्धता असावी. नामस्मरण करताना कोणाबद्दल वाईट विचार मनात येता कामा नये. खाण्याच्या पथ्यासोबत बोलण्याचे पथ्यजर पाळले तर जीवन सुखी  होते.जीवनात दोन मार्ग आहेत. एक प्रपंच आणि दुसरा परमार्थ. प्रपंचात आनंदी जीवन जगायचे असेल तर परमार्थ करा. जीवनातला कमीपणा काढून टाका व्यक्तीने स्वत:ला कमी लेखू नये. नावात सामर्थ्य निर्माण होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. देव प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक माणसातदेखील देव असल्याचे सांगून स्वामींनी यावेळी अंधश्रद्धेवर प्रहार केले. भानामती, करणी केलेली आहे असे मनातून काढून टाका, हे थोतांड आहे. यात काही सत्यता नसून ही एक अंधश्रद्धा आहे. जीवनातून अंधश्रद्धा समूळ नष्ट करा, असेही ते शेवटी म्हणाले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक