शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

समस्यांचे निराकरण करण्यासाठी भक्ती करा :  नरेंद्राचार्य महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:25 IST

भक्तीने प्रेम निर्माण होत असते. जशी भक्ती तसे फळ मिळते. काही लोक प्रचिती आल्यानंतर भक्ती बंद करतात तर काही भाविक भक्तीत सातत्य ठेवतात. भक्ती केली तर अनुभव मिळेल. कोणाचेही वाईट होऊ नये ही भक्तीमार्गाची मुख्य शिकवण आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.

पंचवटी : भक्तीने प्रेम निर्माण होत असते. जशी भक्ती तसे फळ मिळते. काही लोक प्रचिती आल्यानंतर भक्ती बंद करतात तर काही भाविक भक्तीत सातत्य ठेवतात. भक्ती केली तर अनुभव मिळेल. कोणाचेही वाईट होऊ नये ही भक्तीमार्गाची मुख्य शिकवण आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी जनम संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ येथे दोनदिवसीय समस्या मार्गदर्शन, प्रवचन व दर्शन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सोहळ्यास नाशिकसह अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील हजारो भक्तांनी हजेरी लावली. यावेळी भक्तांना मार्गदर्शन करताना स्वामी पुढे म्हणाले की, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, कोणाबद्दल वाईट विचार करू नका, प्रत्येकाने परमेश्वराचे नामस्मरण करावे मात्र त्यात शुद्धता असावी. नामस्मरण करताना कोणाबद्दल वाईट विचार मनात येता कामा नये. खाण्याच्या पथ्यासोबत बोलण्याचे पथ्यजर पाळले तर जीवन सुखी  होते.जीवनात दोन मार्ग आहेत. एक प्रपंच आणि दुसरा परमार्थ. प्रपंचात आनंदी जीवन जगायचे असेल तर परमार्थ करा. जीवनातला कमीपणा काढून टाका व्यक्तीने स्वत:ला कमी लेखू नये. नावात सामर्थ्य निर्माण होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. देव प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक माणसातदेखील देव असल्याचे सांगून स्वामींनी यावेळी अंधश्रद्धेवर प्रहार केले. भानामती, करणी केलेली आहे असे मनातून काढून टाका, हे थोतांड आहे. यात काही सत्यता नसून ही एक अंधश्रद्धा आहे. जीवनातून अंधश्रद्धा समूळ नष्ट करा, असेही ते शेवटी म्हणाले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक