शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

देवेंद्र फडणवीस निष्कलंक, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांचेही काैतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 10:39 IST

ते उपमुख्यमंत्री असणे हा त्यांचा मोठेपणा आहे, विराेधकांनी वज्रमूठ बांधण्याचा प्रयत्न केला; ती वज्रझूठ झाली 

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सत्तेवर असलेल्या ट्रिपल इंजिनच्या सरकारची नाळ जनतेशी जोडलेली आहे, आम्ही समजुतदार आहोत, अजितदादा यांनी यापूर्वीही उपमुख्यंमत्रीपद भूषविले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून मोठ्या मनाने स्वीकारले. उपमुख्यमंत्री फडणवीस हे मोठ्या मनाचे आहेत तसेच ते निष्कलंक आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात केले. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मी मंत्रिमंडळात होतो. आता मी मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री आहेत. हा त्यांचा मोठेपणा आहे. मात्र, कद्रूपणा असलेल्या व्यक्तींकडून मनाचा मोठेपणा कसा येईल, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. विराेधकांनी वज्रमूठ बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती वज्रझूठ झाली. आता तर बोटेही गळून पडली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी टीका केली. 

पोट दुखत असेल, तर दोन डॉक्टर आहेत...‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून गरिबांना लाभ मिळत असेल तर काहींना पोटदुखी हाेते. अशांसाठी आमच्याकडे डॉ. एकनाथ शिंदे आहेत आणि त्यानंतरही गरज पडली तर अजित पवारदेखील आहेत, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना दिवसा बारा तास वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजनेत मोठा प्रकल्प राबविला जात असून, तीन वर्षांत सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू शकेल, असे ते म्हणाले.

मोदी यांच्यामुळे झपाट्याने विकासपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास झपाट्याने होत असून मोदी यांच्या नेतृत्वामुळे देशाची पत जगात वाढलेली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या मदतीनेच आपल्या राज्याला आर्थिक मदतीचा ओघ होत असल्याने विकासासाठी राज्य कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शासन आपल्या दरबारी कार्यक्रमात बोलताना सांगितले.

‘कलंक’ला भाजप देणार पत्रांद्वारे उत्तरनागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली ‘नागपूरला लागलेला कलंक’ अशी टीका भाजपने चांगलीच मनावर घेतली आहे. आता याला भाजपतर्फे ‘देवेंद्र फडणवीस केवळ नागपूरचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा अभिमान आहे’, असे लिहिलेले ३० हजार पोस्टकार्ड मातोश्रीवर पाठविण्यात येणार आहेत. भाजपचे युवा वॉरियर्स यांनी शनिवारपासून हे अभियान सुरू केले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना