शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस निष्कलंक, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांचेही काैतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 10:39 IST

ते उपमुख्यमंत्री असणे हा त्यांचा मोठेपणा आहे, विराेधकांनी वज्रमूठ बांधण्याचा प्रयत्न केला; ती वज्रझूठ झाली 

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सत्तेवर असलेल्या ट्रिपल इंजिनच्या सरकारची नाळ जनतेशी जोडलेली आहे, आम्ही समजुतदार आहोत, अजितदादा यांनी यापूर्वीही उपमुख्यंमत्रीपद भूषविले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून मोठ्या मनाने स्वीकारले. उपमुख्यमंत्री फडणवीस हे मोठ्या मनाचे आहेत तसेच ते निष्कलंक आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात केले. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मी मंत्रिमंडळात होतो. आता मी मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री आहेत. हा त्यांचा मोठेपणा आहे. मात्र, कद्रूपणा असलेल्या व्यक्तींकडून मनाचा मोठेपणा कसा येईल, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. विराेधकांनी वज्रमूठ बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती वज्रझूठ झाली. आता तर बोटेही गळून पडली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी टीका केली. 

पोट दुखत असेल, तर दोन डॉक्टर आहेत...‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून गरिबांना लाभ मिळत असेल तर काहींना पोटदुखी हाेते. अशांसाठी आमच्याकडे डॉ. एकनाथ शिंदे आहेत आणि त्यानंतरही गरज पडली तर अजित पवारदेखील आहेत, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना दिवसा बारा तास वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजनेत मोठा प्रकल्प राबविला जात असून, तीन वर्षांत सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू शकेल, असे ते म्हणाले.

मोदी यांच्यामुळे झपाट्याने विकासपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास झपाट्याने होत असून मोदी यांच्या नेतृत्वामुळे देशाची पत जगात वाढलेली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या मदतीनेच आपल्या राज्याला आर्थिक मदतीचा ओघ होत असल्याने विकासासाठी राज्य कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शासन आपल्या दरबारी कार्यक्रमात बोलताना सांगितले.

‘कलंक’ला भाजप देणार पत्रांद्वारे उत्तरनागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली ‘नागपूरला लागलेला कलंक’ अशी टीका भाजपने चांगलीच मनावर घेतली आहे. आता याला भाजपतर्फे ‘देवेंद्र फडणवीस केवळ नागपूरचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा अभिमान आहे’, असे लिहिलेले ३० हजार पोस्टकार्ड मातोश्रीवर पाठविण्यात येणार आहेत. भाजपचे युवा वॉरियर्स यांनी शनिवारपासून हे अभियान सुरू केले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना