शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

मालेगावच्या विकासाची कवाडे होणार खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:52 IST

मालेगावचे अर्थकारण बदलून टाकणारी आणि बकालपण घालविणारी महत्त्वपूर्ण घटना शुक्रवारी (दि.१४) घडत असून, बहुप्रतीक्षित औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ होत आहे. या वसाहतीमुळे मालेगावच्या विकासाची कवाडे खुली होणार असून, अनेकांच्या हातांना काम उपलब्ध होणार आहे. या औद्योगिक वसाहतीला शासनाने डी प्लस झोनचा दर्जा दिल्यामुळे मालेगावच्या दृष्टीने औद्योगिक विकासासाठी हा एक मोठा टप्पा मानला जात आहे.

ठळक मुद्देआज औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ अर्थकारणाला मिळणार चालना; बेरोजगारीचा प्रश्नही निघणार निकाली

अतुल शेवाळे । लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगावचे अर्थकारण बदलून टाकणारी आणि बकालपण घालविणारी महत्त्वपूर्ण घटना शुक्रवारी (दि.१४) घडत असून, बहुप्रतीक्षित औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ होत आहे. या वसाहतीमुळे मालेगावच्या विकासाची कवाडे खुली होणार असून, अनेकांच्या हातांना काम उपलब्ध होणार आहे. या औद्योगिक वसाहतीला शासनाने डी प्लस झोनचा दर्जा दिल्यामुळे मालेगावच्या दृष्टीने औद्योगिक विकासासाठी हा एक मोठा टप्पा मानला जात आहे.मालेगाव शहराच्या बकालपणाबाबत नेहमीच चर्चा होत असते. इतिहासात झालेल्या काही दंगलींमुळे मालेगाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून येथील नागरिकांनी सामंजस्याचा परिचय देत दंगलीचा डाग पुसून काढला असून, नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्यानंतर शहराच्या रंगरुपानेही कात टाकण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येत आहे. याचसोबत मालेगावचा औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने येथे औद्योगिक वसाहत उभारण्याबाबतची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. याविषयी वेळोवेळी निर्णयही घेण्यात येत होते. परंतु, जागेची उपलब्धता व वीज-पाणी आदी सुविधांची कमतरता यामुळे उद्योजक उद्योग उभारणीसाठी पुढे येताना कचरत होते.शेती महामंडळाच्या ५ हजार एकर पैकी पहिल्या टप्प्यात ८६३ एकर जमीन ३८ कोटी रुपयात औद्योगिक वसाहतीला मिळाली असून, ५०० चौरस मीटर पासून ४५ एकरपर्यंतचे भूखंड तयार करण्यात आलेले आहेत.मूलभूत सेवा सुविधांसाठी शासनाने ३५ कोटी रु पयांचा निधी मंजूर केला आहे.या वसाहतीत पॉवरलुम, प्लास्टिक रिसायकल युनिट, प्लॅस्टिक रियुज युनिट असून यासह इंजिनिअरिंग उद्योग यावेत अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी आणखी १ हजार एकर जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे.दरम्यान, मालेगाव आद्योगिक क्षेत्र टप्पा २ सायने (२८३ एकर) आणि टप्पा ३ अजंग-रावळगाव (८६३ एकर) औद्योगिक वसाहतीसाठीच्या भूखंड नोंदणीचा शुभारंभ तसेच उद्योजक परिषद शुक्रवारी (दि.१४) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजिण्यात आली आहे.यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार सुभाष भामरे, महापौर शेख रशीद, आमदार शेख आसीफ व एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.शेती महामंडळाची जमीनजुलै २०१७ मध्ये अजंग येथील शेती महामंडळाची ३४५.२५ हेक्टर जमिन एमआयडीसीसाठी देण्यास शासनाने मंजुरी दिली होती तसेच या जमिनीस उद्योग विभागाने औद्योगिक क्षेत्र म्हणूनही जाहीर केल्याने या प्रक्रियेला चालना मिळाली होती. याशिवाय, मालेगाव व परिसरातील ३०० पेक्षा अधिक लघुउद्योजकांची यादीही शासनाकडे सुपुर्द करण्यात आली होती.वसाहतीसाठीच्या पाण्याची समस्या सोडविताना चणकापुर आणि पुनद धरणातून पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. याशिवाय गिरणा धरणातून शाश्वत पाणी पुरवठा केला जाणार आहे.सुरु वातीला शासनाने दीड हजार रु पये दर ठेवला होता. परंतु पाठपुरावा करु न आता फक्त ८०० रूपये दर ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवMIDCएमआयडीसी