शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

अंजनेरी तीर्थक्षेत्राचा लवकरच विकास

By admin | Updated: September 25, 2016 23:44 IST

विविध विकासकामांचा शुभारंभ : हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला विश्वास

त्र्यंबकेश्वर : अंजनेरी गाव दत्तक घेतल्यानंतर गावाच्या विकासाकरीता निधी मिळण्यास विलंब झाला. त्यात अधिकाऱ्यांचेही थोडे दुर्लक्ष झाले. मात्र आता सर्व अधिकारी कामाला लागले असल्याने येत्या वर्षभरात अंजनेरी तीर्थक्षेत्राचा चेहरा-मोहरा बदललेला असेल, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला.अंजनेरी संसद आदर्शग्राम योजनेअंतर्गत कृती आराखड्यानुसार विविध विकासकामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारत बांधकामाचा शुभारंभ खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, गावाच्या सर्वांगीण विकासाकरीता सर्वप्रथम लोकसहभाग महत्त्वाचा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून गावागावांतील तीर्थक्षेत्रांचा विकास होत आहे. मोदी यांच्या संकल्पनेतील ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत देशातील आठ तीर्थक्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव श्री त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्राचा समावेश झाला आहे. या योजनेत अंजनेरीचाही समावेश व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे गोडसे यांनी सांगितले. यावेळी माजी सरपंच कमळू कडाळी, राजेंद्र बराडे, प्रभाकर शिंदे, उपसरपंच पंडितराव चव्हाण आदिंनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अंजनेरीच्या सरपंच पुष्पा बराडे, सदस्य दिलीप चव्हाण, गणेश चव्हाण, सोमनाथ बराडे, एकनाथ श्ािंदे, बापू बराडे, कौसाबाई कामडी, रत्ना शिंदे, सुषमा चव्हाण, भागीरथी सोनवणे, गंगूबाई कडाळे, सविता कडाळी आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)