शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात लावणी कामांचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:10 IST

त्र्यंबकेश्वर/ देवगाव : पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात पावसाने दडी मारल्याने भातासह नागलींच्या रोपांची लावणी खोळंबली आहे. ...

त्र्यंबकेश्वर/ देवगाव : पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात पावसाने दडी मारल्याने भातासह नागलींच्या रोपांची लावणी खोळंबली आहे. रोपे तयार झाली असून, पावसाअभावी लावणी करता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून देवगाव परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला असून, भात लावणी करण्यासाठी आवणांत चिखल नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे.

दरवर्षीप्रमाणे जून महिन्याच्या उत्तरार्धात भात, नागली व वरईच्या लावणीला सुरुवात करण्याचा कल शेतकऱ्यांचा असतो. परंतु, पाऊस योग्यवेळी न पडल्याने नाईलाजाने शेतीची कामे थांबवावी लागली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने माघार घेतल्यामुळे देवगाव परिसरातील भात, वरई नागलीची रोपे उन्हांच्या तडाख्यामूळे करपू लागली आहेत. पावसाअभावी आवणांमध्ये चिखल होत नसल्याने आवणांच्या बांधावर मूठ बांधून ठेवण्याची वेळ बळीराज्यावर आली असून भात,वरई व नागलीची रोपे उन्हांमुळे पिवळी पडून संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावसह वावीहर्षे, टाकेदेवगाव, येल्याचीमेट, श्रीघाट, चंद्राचीमेट, आव्हाटे, डहाळेवाडी, टाकेहर्षे या दक्षिण भागात तुरळक पाऊस पडत असला तरी उन्हाच्या तडाख्यामुळे तो भातशेतीसाठी किंवा नागली वरईसाठी फायदेशीर नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी इंजन,विहीर, शेततळ्याच्या पाण्यावर भाताची लागवड करून पर्याय शोधला होता. परंतू, पाऊस पडत नसल्याने देवगाव परिसरातील शेतकरी आजही भात, नागली,वरईला पूरक असलेल्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बळीराज्याला दमदार पावसाची प्रतीक्षा असताना आतापर्यंत १० टक्के सुद्धा पाऊस पडला नाही. मृग नक्षत्र संपले तरी या नक्षत्रात हवा असलेला पाऊस पडला नाही.

--------------------------------

खरिप हंगाम वाया जाण्याची भीती

त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात,नागली व वरईचे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, मजुरीचा खर्च, लागवडीचा खर्च करून या पिकांची लागवड केली आहे. भात,नागलींच्या रोपांची बऱ्यापैकी वाढ झाल्याने त्यांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे. मात्र, पाऊस नसल्याने भात रोपांना खतेसुद्धा देत येत नसल्यामुळे देवगाव परिसरात शेतकऱ्यांना खरिप हंगाम वाया जाण्याची भीती वाटत आहे. तालुक्यातील दक्षिण भागात भात, नागली व वरई या पिकांचे रोप तयार करून नंतर लावणी केली जात असल्यामुळे एकदा रोप खराब झाल्यावर दुबार लावणी करणे शक्य नसते.त्यामुळे बळीराज्याला वर्षभराच्या पिकांवर पाणी सोडून द्यायची वेळ आली आहे.

-------------------------------

पावसाची दडी

निसर्गाच्या पावसाने लहरीपणाचा साथ देत बळीराज्याबरोबर शेतीच्या नुकसानीचा खेळ खेळावयास घेतला आहे. मध्येच दोन दिवसाला सुरुवात होत नाही तोच पाऊस दडी मारून बसतो.यामुळे लावणीबरोबर इतर शेतीची कामेही रखडली आहेत. शेतकऱ्यांना मेघा पाणी दे अशी म्हणण्याची वेळ आली असून आद्रा नक्षत्रांच्या सरी तरी कोसळतील का असा प्रश्न पडला आहे. तर पावसाने दडी मारल्याने कामे रखडल्याने आता शेतकरी निसर्गाच्या लहरीपणावर नाराजी व्यक्त करून पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा करत आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊन महिना होत आहे. पूर्वी वेळेवर पाऊस पडत असल्याने वेळेस पेरणी व लावणी झाल्यानंतर भाताचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत होते. परंतु, आता पावसाचा लहरीपणाचा सुरू असून ज्या वेळेस पावसाची आवश्यकता असते तेव्हा तो पडत नाही. ज्यावेळेस पाऊस नको असतो, त्यावेळेस पडतो. यामुळे दिवसेंदिवस भात उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे.

------------------

पावसाअभावी भात पिकाची खोळंबलेली आवणी. (०१ देवगाव लावणी)

010721\01nsk_8_01072021_13.jpg

०१ देवगाव लावणी