शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मिठाई दुकानांच्या भट्ट्यांमुळे वाढला धोका

By admin | Updated: November 21, 2015 23:46 IST

रहिवासी भयभीत : सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार

 इंदिरानगर :परिसरात नागरी वसाहतींमध्ये दिवसेंदिवस मिठाईची दुकाने वाढत असून, या दुकानांमध्ये असलेल्या भट्ट्या आणि गॅस सिलिंडर रहिवासी क्षेत्राला धोकादायक ठरत आहे. शहरात जलाराम आणि इंदिरानगर येथे राजसारथी सोसायटीत यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांनंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. परिणामी सुरक्षा नियम पायदळी तुडवले जात असल्याने कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.इंदिरानगर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती वाढल्या आहेत. इंदिरानगरसह विनयनगर, दीपालीनगर, समर्थनगर, साईनाथनगर, चेतनानगर, पांडवनगरी, राणेनगर, राजीवनगर अशा सर्वच भागात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था वाढल्या आहेत. त्यातील बहुतांशी इमारती या रहिवासी आणि व्यापारी स्वरूपाच्या आहेत. म्हणजेच इमारतींमध्येच तळमजल्यावर दुकाने काढण्यात आली आहेत. इमारतीत किराणा, इस्तरीचे दुकान, गॅरेज आणि अन्य इतर अनेक व्यवसाय वाढत आहेत. परंतु त्यातल्या त्यात सध्या चलनी ठरलेला मिठाईचा व्यवसाय फोफावत आहे. इमारतींमध्ये असलेल्या मिठाई विक्रीच्याच ठिकाणी मिठाई तयार करणारे अनेक व्यावसायिक आहेत. दुकानांतून ताजी मिठाई देण्यासाठी थेट विक्रीच्याच ठिकाणी ही व्यवस्था असल्याने त्याचा कदाचित दुकानदारांच्या व्यवसायाला लाभ होत असेल; परंतु अशी मिठाईची दुकाने अडचणीचीदेखील ठरत आहेत. मिठाई तयार करण्यासाठी व्यावसायिक भट्ट्या वापरल्या जातात. तसेच कमर्शियल सिलिंडर वापरले जातात. तेथेच तळण आणि अन्य प्रक्रिया केली जात असल्याने अनेकदा गरम वाफा आणि धूर निघत असतो. परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होतोच. परंतु दुकानाची विजेची व्यवस्था चांगली नसेल तर अंतर्गत केबल्स वितळून शॉट सर्किट होऊ शकतात किंवा तापलेल्या भट्टीमुळे सिलिंडरचा स्फोट होऊ शकतो. नाशिक शहरात यापूर्वी दुकानांना अशाप्रकारे शॉटसर्किटमुळे आग लागून दुर्घटना घडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शहरातील कॉलेजरोडवर जलाराम फरसाण मार्ट येथे अशा प्रकारची दुर्घटना घडल्यानंतर तेथेच विनापरवाना मिठाई तयार केली जात असल्याचा प्रकार महापालिकेच्या अग्निशमन दलाला आढळला होता. इंदिरानगरातील राजसारथी येथेही एका बेकरीच्या दुकानास भट्टीमुळेच आग लागली होती. त्यावेळी अग्निशमन दलाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली होती. परंतु हा प्रकार असाच सुरू राहिल्याने आता प्रशासन दुर्घटनेची वाट बघत आहे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.