शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

परीक्षा उत्तीर्ण होऊनही ते नोकरीपासून आहे वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 16:44 IST

कवडदरा : महाराष्ट्र शासनाने महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पाच हजार व उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता उमेदवारांचे अर्ज बोलावण्यात आले होते, यासाठी परीक्षा देखील घेण्यात आली. आता याचा निकाल लागला असून, कागदपत्रे पडताळणीची तारीख वारंवार रद्द होत असल्याने उत्तीर्ण उमेदवारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देकवडदरा : महावितरण कंपनीतील भरतीचा प्रश्न

कवडदरा : महाराष्ट्र शासनाने महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पाच हजार व उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता उमेदवारांचे अर्ज बोलावण्यात आले होते, यासाठी परीक्षा देखील घेण्यात आली. आता याचा निकाल लागला असून, कागदपत्रे पडताळणीची तारीख वारंवार रद्द होत असल्याने उत्तीर्ण उमेदवारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.महावितरणतर्फे जुलै २०१९ मध्ये काढण्यात आलेल्या नोकर भरतीत आयटीआय धारकांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरले होते. आॅगस्ट २०१९ रोजी चाचणी परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षा देऊनही वर्षभरानंतर विद्यार्थ्यांना निकाल मिळाला नव्हता त्यामळे महाराष्ट्रातील आयटीआयधारकामध्ये संतापाची लाट पसरली होती.सदर परिक्षाचा निकाल एक वर्षांपासून स्थगित होता. तो निकाल तीन महिन्यापूर्वी जून २०२० मध्ये जाहीर झाला असून, आता कागदपत्रे पडताळणीसाठी वारंवार तारखेत बदल होत असल्याने परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अद्यापही नोकरीपासून वंचित आहेत.महावितरण कंपनीतील जुलै २०१९ मध्ये उपकेंद्र सहायक, विद्युत सहायक भर्तीचे आयोजन केले होते. आॅगस्ट २०१९ रोजी चाचणी परीक्षा घेण्यात आली सदर परिक्षाचा निकाल एक वर्षांपासून स्थगित होता. उपकेंद्र सहायक पदाची निवड व अतिरिक्त यादी लावुन कागद पडताळणीसाठी अगोदर १६, १७ आॅगस्ट तारिख दिली. मात्र ही तारीख रद्द करून पुन्हा १५ आणि १६ सप्टेंबर तारीख देण्यात आली, सोबत जिल्हा रु ग्णालयात वैद्यकीय चाचणी घेण्यात सांगितले होते. परंतु महावितरण प्रशासनाने ही कागदपत्र पडताळणी प्रक्रि या स्थगित करण्याचे जाहीर केले.आताची परिस्थिती लक्षात घेता, कोरोना महामारीमुळे बऱ्याच मुलांचा रोजगार हिरावला गेला आहे. वारंवार भर्तीवर स्थगिती येत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे. लाखो विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. आयटीआयधारकांच्या हाताला काम नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही प्रक्रि या त्वरीत पूर्ण करून भरतीला प्राधान्य द्यावे. तसेच बेरोजगारांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीGovernmentसरकार