शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

सावरकर स्मारकात नळ असूनही पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 4:06 PM

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भगुरला शासकीय स्मारक होऊन २० वर्षे झाले असून, या ठिकाणी भगुर नगर पालिकेने गेल्या अनेक वर्षापासून स्मारकाच्या पुढील भागात एक व मागच्या खोलीत एक असे दोन नळ कनेक्शन दिले आहे. तसेच पुरातन विभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी एक शौचालय बांधून त्यावर पाण्याची टाकी बसविली

ठळक मुद्देपुरातत्व खात्याची उदासिनता : परदेशी पर्यटकांचे हाल

भगुर : भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पवित्र जन्मस्थान स्मारकात येणाऱ्या पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याचे दोन कार्यान्वित असतानाही निव्वळ व्यवस्थापकांच्या उदासिनतेमुळे सावरकर भक्त आणि देश विदेशी पर्यटकांना पाणी पिण्यासाठी वणवण करावी लागत असून, विकतचे पाणी घेवून तहान भागवावी लागत आहे.स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भगुरला शासकीय स्मारक होऊन २० वर्षे झाले असून, या ठिकाणी भगुर नगर पालिकेने गेल्या अनेक वर्षापासून स्मारकाच्या पुढील भागात एक व मागच्या खोलीत एक असे दोन नळ कनेक्शन दिले आहे. तसेच पुरातन विभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी एक शौचालय बांधून त्यावर पाण्याची टाकी बसविली तसेच नळाला मोटार लावून पाणी भरण्याची सोय केलेली आहे. शिवाय पर्यटकांना पाण्यासाठी पुढील बाजूने एक हजार लीटरची दानशूरांनी टाकी ठेवली आहे. यापूर्वी स्मारकात व्यवस्थापन म्हणून पुरातन विभागाचे सचिव कुलकर्णी काम पाहात होते ते स्वत: या स्मारकात कुटुंबासह राहत होते. त्यावेळी ते सकाळी नगर पालिकेच्या नळाला पाणी आल्यावर भरून ठेवत असे तेव्हा पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची शौचालय अडचण येत नसे. परंतु त्यांची कोपरगाव येथे बदली झाली आणि त्याच्या जागी नवीन व्यवस्थापक सोमनाथ बोराडे आले. ते नाशिकरोड येथे राहतात व स्मारकाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ असल्याने ते सकाळी १० वाजेला स्मारकात येतात. मात्र भगुर नगरपालिकेकडून संपूर्ण गावाला दिवसातून एक वेळेस भरपूर पाणी पुरवठा पहाटे ४ ते सकाळी ९ वाजेपर्यंत होत असल्याने स्मारकात पिण्यासाठी पाणी कोणी भरून ठेवावे असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून पर्यटकांनाच नव्हे तर पुरातन विभागाला देखील विविध कार्यक्रमाच्या दिवशी बाहेरून विकतचे पाण्याचे जार आणावे लागते. वेळप्रसंगी नैसर्गिक विधीसाठी दारणा नदीच्या काठी जावे लागते. स्मारकात १३ खोल्या आहे यापैकी सर्व सुविधा युक्त राहण्यासाठी दोन खोल्या असुन यापुर्वीचे व्यवस्थापक कुटुंबासह राहून पर्यटकाना सुविधा देत होते. त्याप्रमाणे नवीन व्यवस्थापकाने स्मारकात राहून लक्ष घालावे मागणी सावरकर भक्त, पर्यटकांनी केली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक