शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

पाणीटंचाईचे निमित्त करून जलतरण तलावांवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:06 IST

शहरात दररोज किमान १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचा हिशेब लागत नसताना त्याचा शोध घेऊन ती गळती रोखण्याचे सोडून महापालिकेने जलतरण तलावच बंद केला आहे. गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या या तलावामुळे नियमित सभासद आणि मुलांची गैरसोय तर झाली आहेच, शिवाय शासनाच्या आंतरशालेय जलतरण स्पर्धाच स्थगित कराव्या लागल्या आहेत.

नाशिक : शहरात दररोज किमान १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचा हिशेब लागत नसताना त्याचा शोध घेऊन ती गळती रोखण्याचे सोडून महापालिकेने जलतरण तलावच बंद केला आहे. गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या या तलावामुळे नियमित सभासद आणि मुलांची गैरसोय तर झाली आहेच, शिवाय शासनाच्या आंतरशालेय जलतरण स्पर्धाच स्थगित कराव्या लागल्या आहेत.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर तसेच अन्य धरणात पुरेसा साठा नाही, त्याचप्रमाणे पावसाने ओढ दिली अशा स्थितीत महापालिकेने पाणीकपातीची अपरिहार्यता व्यक्त केली आणि गेल्या ३० जूनपासून शहरात सर्वत्र एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर शहरातील २२१ ठिकाणचा पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. यात उद्यान विभागाचा ठीक, परंतु महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावासह एकूण सात तरणतलावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तरणतलावांवर नियमित सरावासाठी जाणाºया नागरिक आणि युवकांची गैरसोय होत आहे.अनेकांनी तर महापालिकेकडून नियमित पैसे भरून पास घेतले आहेत. परंतु त्यांनादेखील पोहण्यास बंदी घालण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्तकेली आहे. विशेष म्हणजेच शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने दि. ४ व ५ जुलैस आंतरशालेय जलतरण स्पर्धा होत्या त्याची तयारी सुरू झाली होती. परंतु टंचाईच्या नावाखाली जलतरण तलाव बंद करण्यात आल्याने या स्पर्धा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.नळजोडणीतून बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय सर्रास सुरूपाणीकपात आहे म्हणून जलतरण तलाव बंद करण्यात आल्याचे प्रशासन सांगत असले तरी शहरातील अनेक तारांकित हॉटेल्स तसेच मोठ्या लक्झरियस गृहनिर्माण संस्थांमध्ये तरणतलाव सुरूच आहेत. सर्व्हिस स्टेशन्स तसेच महापालिकेच्या नळजोडणीतून बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांचे उद्योगदेखील सर्रास सुरू आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनपाकडून पाण्याची गळती ही चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तर धरणातून होणाºया पाण्याच्या उपशापैकी १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचा प्रतिदिन हिशेबच लागत नाही. त्यामुळे त्यात लक्ष घालणे सोडून केवळ तरणतलाव बंद करून काय होणार, असा प्रश्न जाणकार करीत आहेत.शहरातील पाण्याची गळती रोखण्याचे सोडून महापालिकेने जलतरण तलावच बंद केला आहे. गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या या तलावामुळे नियमित सभासद आणि मुलांची गैरसोय झाली आहे.महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावासह एकूण सात तरणतलावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.सावरकर तरणतलावाला वीस हजार लिटर्स पाणी रोज लागते. इतके पाणी वीस फ्लॅट्सला रोज लागते. तरण तलावात रोज हजारो नागरिक पोहण्यासाठी येतात. महापालिकेनेच हे तरणतलाव आरोग्याच्या दृष्टिकोनातून बांधले असून, त्याचा सर्वसामान्य नागरिकच वापर करतात. त्यामुळे महापालिकेने योग्य तो विचार करावा.- अरुण काबरे, वास्तुविशारद

टॅग्स :water shortageपाणीकपातSwimmingपोहणे