शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

पाणीटंचाईचे निमित्त करून जलतरण तलावांवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:06 IST

शहरात दररोज किमान १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचा हिशेब लागत नसताना त्याचा शोध घेऊन ती गळती रोखण्याचे सोडून महापालिकेने जलतरण तलावच बंद केला आहे. गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या या तलावामुळे नियमित सभासद आणि मुलांची गैरसोय तर झाली आहेच, शिवाय शासनाच्या आंतरशालेय जलतरण स्पर्धाच स्थगित कराव्या लागल्या आहेत.

नाशिक : शहरात दररोज किमान १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचा हिशेब लागत नसताना त्याचा शोध घेऊन ती गळती रोखण्याचे सोडून महापालिकेने जलतरण तलावच बंद केला आहे. गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या या तलावामुळे नियमित सभासद आणि मुलांची गैरसोय तर झाली आहेच, शिवाय शासनाच्या आंतरशालेय जलतरण स्पर्धाच स्थगित कराव्या लागल्या आहेत.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर तसेच अन्य धरणात पुरेसा साठा नाही, त्याचप्रमाणे पावसाने ओढ दिली अशा स्थितीत महापालिकेने पाणीकपातीची अपरिहार्यता व्यक्त केली आणि गेल्या ३० जूनपासून शहरात सर्वत्र एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर शहरातील २२१ ठिकाणचा पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. यात उद्यान विभागाचा ठीक, परंतु महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावासह एकूण सात तरणतलावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तरणतलावांवर नियमित सरावासाठी जाणाºया नागरिक आणि युवकांची गैरसोय होत आहे.अनेकांनी तर महापालिकेकडून नियमित पैसे भरून पास घेतले आहेत. परंतु त्यांनादेखील पोहण्यास बंदी घालण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्तकेली आहे. विशेष म्हणजेच शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने दि. ४ व ५ जुलैस आंतरशालेय जलतरण स्पर्धा होत्या त्याची तयारी सुरू झाली होती. परंतु टंचाईच्या नावाखाली जलतरण तलाव बंद करण्यात आल्याने या स्पर्धा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.नळजोडणीतून बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय सर्रास सुरूपाणीकपात आहे म्हणून जलतरण तलाव बंद करण्यात आल्याचे प्रशासन सांगत असले तरी शहरातील अनेक तारांकित हॉटेल्स तसेच मोठ्या लक्झरियस गृहनिर्माण संस्थांमध्ये तरणतलाव सुरूच आहेत. सर्व्हिस स्टेशन्स तसेच महापालिकेच्या नळजोडणीतून बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांचे उद्योगदेखील सर्रास सुरू आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनपाकडून पाण्याची गळती ही चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तर धरणातून होणाºया पाण्याच्या उपशापैकी १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचा प्रतिदिन हिशेबच लागत नाही. त्यामुळे त्यात लक्ष घालणे सोडून केवळ तरणतलाव बंद करून काय होणार, असा प्रश्न जाणकार करीत आहेत.शहरातील पाण्याची गळती रोखण्याचे सोडून महापालिकेने जलतरण तलावच बंद केला आहे. गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या या तलावामुळे नियमित सभासद आणि मुलांची गैरसोय झाली आहे.महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावासह एकूण सात तरणतलावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.सावरकर तरणतलावाला वीस हजार लिटर्स पाणी रोज लागते. इतके पाणी वीस फ्लॅट्सला रोज लागते. तरण तलावात रोज हजारो नागरिक पोहण्यासाठी येतात. महापालिकेनेच हे तरणतलाव आरोग्याच्या दृष्टिकोनातून बांधले असून, त्याचा सर्वसामान्य नागरिकच वापर करतात. त्यामुळे महापालिकेने योग्य तो विचार करावा.- अरुण काबरे, वास्तुविशारद

टॅग्स :water shortageपाणीकपातSwimmingपोहणे