शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पाणीटंचाईचे निमित्त करून जलतरण तलावांवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:06 IST

शहरात दररोज किमान १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचा हिशेब लागत नसताना त्याचा शोध घेऊन ती गळती रोखण्याचे सोडून महापालिकेने जलतरण तलावच बंद केला आहे. गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या या तलावामुळे नियमित सभासद आणि मुलांची गैरसोय तर झाली आहेच, शिवाय शासनाच्या आंतरशालेय जलतरण स्पर्धाच स्थगित कराव्या लागल्या आहेत.

नाशिक : शहरात दररोज किमान १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचा हिशेब लागत नसताना त्याचा शोध घेऊन ती गळती रोखण्याचे सोडून महापालिकेने जलतरण तलावच बंद केला आहे. गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या या तलावामुळे नियमित सभासद आणि मुलांची गैरसोय तर झाली आहेच, शिवाय शासनाच्या आंतरशालेय जलतरण स्पर्धाच स्थगित कराव्या लागल्या आहेत.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर तसेच अन्य धरणात पुरेसा साठा नाही, त्याचप्रमाणे पावसाने ओढ दिली अशा स्थितीत महापालिकेने पाणीकपातीची अपरिहार्यता व्यक्त केली आणि गेल्या ३० जूनपासून शहरात सर्वत्र एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर शहरातील २२१ ठिकाणचा पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. यात उद्यान विभागाचा ठीक, परंतु महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावासह एकूण सात तरणतलावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तरणतलावांवर नियमित सरावासाठी जाणाºया नागरिक आणि युवकांची गैरसोय होत आहे.अनेकांनी तर महापालिकेकडून नियमित पैसे भरून पास घेतले आहेत. परंतु त्यांनादेखील पोहण्यास बंदी घालण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्तकेली आहे. विशेष म्हणजेच शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने दि. ४ व ५ जुलैस आंतरशालेय जलतरण स्पर्धा होत्या त्याची तयारी सुरू झाली होती. परंतु टंचाईच्या नावाखाली जलतरण तलाव बंद करण्यात आल्याने या स्पर्धा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.नळजोडणीतून बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय सर्रास सुरूपाणीकपात आहे म्हणून जलतरण तलाव बंद करण्यात आल्याचे प्रशासन सांगत असले तरी शहरातील अनेक तारांकित हॉटेल्स तसेच मोठ्या लक्झरियस गृहनिर्माण संस्थांमध्ये तरणतलाव सुरूच आहेत. सर्व्हिस स्टेशन्स तसेच महापालिकेच्या नळजोडणीतून बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांचे उद्योगदेखील सर्रास सुरू आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनपाकडून पाण्याची गळती ही चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तर धरणातून होणाºया पाण्याच्या उपशापैकी १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचा प्रतिदिन हिशेबच लागत नाही. त्यामुळे त्यात लक्ष घालणे सोडून केवळ तरणतलाव बंद करून काय होणार, असा प्रश्न जाणकार करीत आहेत.शहरातील पाण्याची गळती रोखण्याचे सोडून महापालिकेने जलतरण तलावच बंद केला आहे. गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या या तलावामुळे नियमित सभासद आणि मुलांची गैरसोय झाली आहे.महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावासह एकूण सात तरणतलावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.सावरकर तरणतलावाला वीस हजार लिटर्स पाणी रोज लागते. इतके पाणी वीस फ्लॅट्सला रोज लागते. तरण तलावात रोज हजारो नागरिक पोहण्यासाठी येतात. महापालिकेनेच हे तरणतलाव आरोग्याच्या दृष्टिकोनातून बांधले असून, त्याचा सर्वसामान्य नागरिकच वापर करतात. त्यामुळे महापालिकेने योग्य तो विचार करावा.- अरुण काबरे, वास्तुविशारद

टॅग्स :water shortageपाणीकपातSwimmingपोहणे