शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

२७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

By admin | Updated: March 6, 2017 00:27 IST

येवला : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील पाच गट व दहा गणांत निवडणूक लढवीत असलेल्या ६४ पैकी २७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

येवला : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील पाच गट व दहा गणांत निवडणूक लढवीत असलेल्या ६४ पैकी २७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. गटाच्या पाच जागांसाठी १९ उमेदवार, तर पंचायत समिती गणांच्या दहा जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. यात अनेकांचा धक्कादायक पराभव झाला असून, काहीना तर अपेक्षेपेक्षा खूपच कमी मते मिळाली. तब्बल ४२ टक्के उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याने त्यांना आपली अनामत रक्कमदेखील वाचवता आलेली नाही. ज्याचा पक्षाशी संबंध नाही अशा उमेदवारांना कुठलाही प्रवेश न करता भाजपा व कॉँग्रेसने उसनवारीने उमेदवारी दिली होती. त्यामुळे निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या कमी होती. हे सगळेच मुख्य उमेदवार नसल्याने मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे मतदानाच्या आकडेवारीत समजते. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडून उमेदवारी करत अंदरसूल गटातील बाबासाहेब डमाळे, नागडे गणातील दादा मोरे व मुखेड गणातील सोनाली शिंदे या भाजपाच्या तीन तर पाटोदा गणातील आशालता पाटील व चिचोंडी गणातील लक्ष्मी गोसावी या कॉँग्रेसच्या उमेदवारांनी अधिक मते मिळवत आपली अनामत रक्कम वाचवण्यात यश मिळविले आहे. मात्र बाकींची अनामत रक्कम शासन तिजोरीत जमा झाली आहे.कॉँग्रेसचे अनामत रक्कम जप्त झालेले उमेदवार व त्यांना मिळालेले मते पुढीलप्रमाणे- पाटोदा गटातील उस्मान शेख (२४५७), राजापूर गट- भारती पुणे (४६१), अंदरसूल गट-रावसाहेब लासुरे (४४९), मुखेड गट- संगीता अहेर (१३२१), तर गणांतील उमेदवार पुढीलप्रमाणे- धुळगाव गणातील सूर्यकांत गोसावी (६२९), राजापूर गण- आशा झाल्टे (२५५), अंदरसूल गण- शिवाजी धनगे (८४८), नागडे गण- मीरा माळी (१९०), मुखेड गण- छाया दिवटे (३३०) यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. मागेल त्याला उमेदवारी हा अजेंडा वापरला; मात्र प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रि येत पक्षाकडे कोणीही लक्ष न दिल्याने तालुक्यात कॉँग्रेसला एकही जागा मिळविात आली नाही. मात्र बऱ्याच उमेदवारांवर अनामत जप्तीची नामुष्की ओढवली. बसपाचे अनामत जप्त झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात मिळालेले मते)े -धुळगाव गणातून विक्रांत गायकवाड (२०९), नगरसूल गण- धर्मा पगारे (१७२), राजापूर गण- कांताबाई पगारे (३०२), चिचोंडी गण- अर्चना सोनवणे (३०४) या उमेदवारांचा समावेश आहे. अनामत जप्त झालेले अपक्ष उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात मिळालेली मते) राजापूर गट- रेन्ना तांबोळी (१४७), तर गणातून धुळगाव गण- बाबासाहेब पवार (२७५), सायगाव गण- तान्हुबाई गायकवाड (३०९), नागडे गण- संतोष निकम (२३४), मुखेड गण- वैशाली वेळंजकर (१३७) यांच्यावर अनामत जप्तीची नामुष्की ओढावली आहे. (वार्ताहर)