शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कामगार गेल्याने स्थानिकांना प्राधान्य द्यावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:28 IST

सिन्नर : कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून, वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे परप्रांतीय मजुरांनी आपापल्या गावाकडे जाणे पसंत केले आहे. गेल्या दोन महिन्यापासून शेकडोंच्या संख्येने या कामगारांच्या झुंडी मिळेल त्या वाहनाने आणि अगदी पायीसुद्धा रवाना झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात उद्योग-व्यवसाय क्षेत्रात या कामगारांची कमतरता जाणवणार आहे.

सिन्नर : कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यातआला असून, वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे परप्रांतीय मजुरांनी आपापल्या गावाकडे जाणे पसंत केले आहे. गेल्या दोन महिन्यापासून शेकडोंच्या संख्येने या कामगारांच्या झुंडी मिळेल त्या वाहनाने आणि अगदी पायीसुद्धा रवाना झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात उद्योग-व्यवसाय क्षेत्रात या कामगारांची कमतरता जाणवणार आहे.राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या समृद्धी महामार्गालादेखील कामगारांच्याया स्थलांतराची मोठी झळ बसणार आहे. सिन्नर तालुक्यात दोनटप्प्यात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावरील शेकडो कामगार, मजूर आपल्या मूळगावी परतल्यामुळे आगामी काळात ठेकेदार कंपन्यांना स्थानिकांना प्राधान्य देऊन कामे पूर्ण करावी लागणार आहेत.सिन्नर तालुक्यात दोन टप्प्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरूआहे. यासाठी दोन वेगवेगळ्या कंपन्यांची नियुक्ती करण्यातआली आहे. या कंपन्या उत्तर भारतातील असून, त्यांनी कामासाठी आवश्यक असणाºया तांत्रिक व अकुशल कामगारांचा संपूर्ण लवाजमा आपापल्या राज्यातून याठिकाणी आणला आहे.मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे यातील बहुसंख्य कामगारांनी आपल्या मूळगावी जाणे पसंत केले आहे. नोकरीला सोडचिठ्ठी देत हे कामगार आपल्या गावाकडे परतले असून, अशा कामगारांची संख्या दखल घेण्याजोगी आहे. या कामगारांच्या स्थलांतरामुळे साहजिकच समृद्धी महामार्गाचे काम मंदावले आहे.-------------------------------सिन्नरमधील कारखान्यांमध्ये कामे पूर्ण करण्यासाठी दमछाक होणार सिन्नरमध्ये काम करणाºया दोन्ही कंपन्यांकडे हजारो कामगार असून, त्यात ट्रक ड्रायव्हर व मशीन आॅपरेटरची संख्या अधिक आहे. या सर्व कामगारांना मासिक पगारावर व राहणे, जेवण मोफत देण्याच्या अटीवर आणण्यात आले होते. कोरोना संसर्ग वाढल्याने व महाराष्ट्र राज्यात त्याची झळ सर्वाधिक असल्याने या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या कुटुंबाकडून गावी परत येण्याचे बजावण्यात आले. त्यामुळे हातात असणाºया नोकरीवर लाथ मारून या कामगारांनी भीतीपोटी घर जवळ केले आहे. ४गेल्या दोन आठवड्यात या दोन्ही कंपन्यांमधून शेकडोच्या संख्येने कामगार एकाच वेळी बाहेर पडल्याचे समजते. मिळेल त्या वाहनांनी किंवा अगदी पायीसुद्धा प्रवास या कामगारांनी केला असून बहुतेक जण आपापल्या गावी परतले आहेत. स्थलांतरामुळे या दोन्ही कंपन्यांना भविष्याची चिंता आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होणे शक्य नसले तरी हाती असलेली कामे पूर्ण करण्यासाठी या कंपन्यांची दमछाक होणार आहे. अर्थात त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ आता स्थानिक पातळीवर उपलब्ध करून घेण्याचा निर्णय झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक