शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

कामगार गेल्याने स्थानिकांना प्राधान्य द्यावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:28 IST

सिन्नर : कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून, वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे परप्रांतीय मजुरांनी आपापल्या गावाकडे जाणे पसंत केले आहे. गेल्या दोन महिन्यापासून शेकडोंच्या संख्येने या कामगारांच्या झुंडी मिळेल त्या वाहनाने आणि अगदी पायीसुद्धा रवाना झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात उद्योग-व्यवसाय क्षेत्रात या कामगारांची कमतरता जाणवणार आहे.

सिन्नर : कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यातआला असून, वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे परप्रांतीय मजुरांनी आपापल्या गावाकडे जाणे पसंत केले आहे. गेल्या दोन महिन्यापासून शेकडोंच्या संख्येने या कामगारांच्या झुंडी मिळेल त्या वाहनाने आणि अगदी पायीसुद्धा रवाना झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात उद्योग-व्यवसाय क्षेत्रात या कामगारांची कमतरता जाणवणार आहे.राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या समृद्धी महामार्गालादेखील कामगारांच्याया स्थलांतराची मोठी झळ बसणार आहे. सिन्नर तालुक्यात दोनटप्प्यात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावरील शेकडो कामगार, मजूर आपल्या मूळगावी परतल्यामुळे आगामी काळात ठेकेदार कंपन्यांना स्थानिकांना प्राधान्य देऊन कामे पूर्ण करावी लागणार आहेत.सिन्नर तालुक्यात दोन टप्प्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरूआहे. यासाठी दोन वेगवेगळ्या कंपन्यांची नियुक्ती करण्यातआली आहे. या कंपन्या उत्तर भारतातील असून, त्यांनी कामासाठी आवश्यक असणाºया तांत्रिक व अकुशल कामगारांचा संपूर्ण लवाजमा आपापल्या राज्यातून याठिकाणी आणला आहे.मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे यातील बहुसंख्य कामगारांनी आपल्या मूळगावी जाणे पसंत केले आहे. नोकरीला सोडचिठ्ठी देत हे कामगार आपल्या गावाकडे परतले असून, अशा कामगारांची संख्या दखल घेण्याजोगी आहे. या कामगारांच्या स्थलांतरामुळे साहजिकच समृद्धी महामार्गाचे काम मंदावले आहे.-------------------------------सिन्नरमधील कारखान्यांमध्ये कामे पूर्ण करण्यासाठी दमछाक होणार सिन्नरमध्ये काम करणाºया दोन्ही कंपन्यांकडे हजारो कामगार असून, त्यात ट्रक ड्रायव्हर व मशीन आॅपरेटरची संख्या अधिक आहे. या सर्व कामगारांना मासिक पगारावर व राहणे, जेवण मोफत देण्याच्या अटीवर आणण्यात आले होते. कोरोना संसर्ग वाढल्याने व महाराष्ट्र राज्यात त्याची झळ सर्वाधिक असल्याने या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या कुटुंबाकडून गावी परत येण्याचे बजावण्यात आले. त्यामुळे हातात असणाºया नोकरीवर लाथ मारून या कामगारांनी भीतीपोटी घर जवळ केले आहे. ४गेल्या दोन आठवड्यात या दोन्ही कंपन्यांमधून शेकडोच्या संख्येने कामगार एकाच वेळी बाहेर पडल्याचे समजते. मिळेल त्या वाहनांनी किंवा अगदी पायीसुद्धा प्रवास या कामगारांनी केला असून बहुतेक जण आपापल्या गावी परतले आहेत. स्थलांतरामुळे या दोन्ही कंपन्यांना भविष्याची चिंता आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होणे शक्य नसले तरी हाती असलेली कामे पूर्ण करण्यासाठी या कंपन्यांची दमछाक होणार आहे. अर्थात त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ आता स्थानिक पातळीवर उपलब्ध करून घेण्याचा निर्णय झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक