शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

निफाड तालुक्यात डेंग्यूचा कहर

By admin | Updated: November 13, 2016 22:43 IST

वीस रु ग्ण : आरोग्य विभागाची बैठक

निफाड : तालुक्यात डेंग्यूचे २० रुग्ण आढळले असून या पार्श्वभूमीवर निफाड पंचायत समितीत शनिवारी बत्तीस वर्षात प्रथमच पंचायत समितीचे पदाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक होऊन तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांची वाढत चाललेली संख्या, दूषित पाणी तसेच दिंडोरी तास येथील बालकाच्या मृत्यू प्रकरणी वादळी चर्चा झाली.निफाड पंचायत समितीच्या झालेल्या या बैठकीस निफाड पंचायत समितीचे सभापती सुभाष कराड, गटविकास अधिकारी वैशाली रसाळ पं.स. सदस्य प्रकाश पाटील, बाळू हिले, तालुका वैद्यकीय अधिकारी चव्हाण, दिंडोरीतासचे सरपंच संदीप तासकर यांच्यासह तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दिंडोरीतास येथील प्रसाद लहांगे बालकाचा झालेल्या मृत्यू प्रकरणाबद्दल सरपंच संदीप तासकर यांनी वैद्यकीय अधिकारी आणि नर्स यांच्या विसंवादातून बालकाला आपला जीव गमवावा लागल्याचे सांगत दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली.तर निफाड तालुक्यात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, तालुक्यात डेंग्यूचा कहर वाढत आहे. आरोग्य यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगत कर्मचारीवर्गाला धारेवर  धरले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी चव्हाण यांनी याप्रसंगी सांगितले की, तालुक्यात डेंग्यूचे जवळपास वीस रुग्ण आहेत, तर काही रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार करतात. तेव्हा त्या दवाखान्याच्या डॉक्टरचे कर्तव्य आहे की, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राला डेंग्यू रुग्णाबद्दल सूचित करणे परंतु सदर डॉक्टर तशी माहिती देत नाही़ यापुढे डेंग्यूबाबत डॉक्टर वा दवाखान्याने सूचित केले नाही तर संबंधित डॉक्टरला आरोग्य विभागाकडून नोटीस काढण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला. याप्रसंगी गटविकास आधिकारी वैशाली रसाळ म्हणाल्या की, आरोग्य संदर्भातील तक्रारी वाढल्यामुळे आजची बैठक बोलविली आहे. आरोग्य विभाग आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय असला पाहिजे़तालुक्यात पाणी दूषित असल्यामुळे अनेक प्रश्न उभे राहतात. या बाबतीत गावातील पाणी नमुने घेऊन ग्रामपंचायतीने त्या संदर्भात आरोग्य विभागाला कळवावे. त्यानंतरही दखल घेतली नाही तर पंचायत समिती त्याबाबत कारवाई करेल. (वार्ताहर)