शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:31 IST

नाशिक : दिल्लीत गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी ...

नाशिक : दिल्लीत गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर एकत्रित येऊन केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन केले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिकांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला असून, दिल्लीतील आंदोलनाचे लोण आता नाशिकमध्येही पसरू लागल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातीलउत्पादन, व्यापार व विपणनविषयक आणलेले तिन्ही सुधारणा कायदे हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत जनआंदोलन संघर्ष समितीसह किसान सभा, संगीनी महिला संघटना, माकप, काँग्रेस, भाकप, आप, वंचित आघाडी, आरपीआय, बसपा, छात्रभरती, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, आयटक, जनवादी महिला संघटना, नागपंथीय सामाजिक संस्था आदी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या आंदोलनात सहभाग घेत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत हे नवीन तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. पंजाब व हरियाणासह देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला घेराव घातला असून, जवळपास गेल्या २० दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी दिल्लीच्या भोवती महामार्गांवर ठिय्या मांडून बसले असताना केंद्र सरकार या आंदोलन फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला आहे. केंद्र सरकारचे हे तिन्ही नवीन कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्द करण्याची या शेतकऱ्यांची मागणी असून, त्यांना पाठिंबा देत केंद्र सरकारने हे कायदे त्वरित मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, डॉ. डी. एल. राड, राजू देसले, शरद आहेर, डॉ. शोभा बच्चव, अनिता पगारे, गणेश उनवणे, प्रभाकर वायचळे, गिरीश उगले, जगमीर सिंग खालसा, सुनील मालुसरे, बी. जी. वाघ, डॉ. हेमलता पाटील, ॲड. तान्हाजी जायभावे, बाळासाहेब शिंदे, ऊर्मिला गायकवाड, अरुण काळे, विजय पाटील, दीपक डोखे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात सकहभाग घेत केंद्र सरकारच्या शेती व शेतीवषयक धोरणांविरोधात निषेध नोंदविला.

शेतकऱ्यांचे आंदोलन हाताळले नाही तर अराजकता - डॉ. रावसाहेब कसबे

राजधानी दिल्लीत शेतकर्यांचे ऐतिहासिक आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार हे आंदोलन बदनाम करीत आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. ही कोणतेही आंदोलन हाताळण्याची योग्य पद्धत नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन व त्यांचे आंदोलन योग्य पद्धतीने हाताळले गेले नाही तर देशात अराजकता माजेल आणि त्यास केंद्र सरकार जबाबदार राहील, असा इशारा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व त्यासाठी सकारात्मक बोलणी करावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी केंद्र सरकारला दिला आहे.

(फोटो-१४पीएचडीसी६१) दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर निदर्शने करताना डॉ. डी. एल. कराड, शरद अहेर, शाहू खैरे, ॲड. तानाजी जायभावे, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, नीलेश खैरे, ज्ञानेश्वर काळे, दीपक डोखे, विजय पाटील, शशिकांत उनवणे आदी.