शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:31 IST

नाशिक : दिल्लीत गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी ...

नाशिक : दिल्लीत गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर एकत्रित येऊन केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन केले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिकांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला असून, दिल्लीतील आंदोलनाचे लोण आता नाशिकमध्येही पसरू लागल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातीलउत्पादन, व्यापार व विपणनविषयक आणलेले तिन्ही सुधारणा कायदे हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत जनआंदोलन संघर्ष समितीसह किसान सभा, संगीनी महिला संघटना, माकप, काँग्रेस, भाकप, आप, वंचित आघाडी, आरपीआय, बसपा, छात्रभरती, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, आयटक, जनवादी महिला संघटना, नागपंथीय सामाजिक संस्था आदी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या आंदोलनात सहभाग घेत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत हे नवीन तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. पंजाब व हरियाणासह देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला घेराव घातला असून, जवळपास गेल्या २० दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी दिल्लीच्या भोवती महामार्गांवर ठिय्या मांडून बसले असताना केंद्र सरकार या आंदोलन फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला आहे. केंद्र सरकारचे हे तिन्ही नवीन कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्द करण्याची या शेतकऱ्यांची मागणी असून, त्यांना पाठिंबा देत केंद्र सरकारने हे कायदे त्वरित मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, डॉ. डी. एल. राड, राजू देसले, शरद आहेर, डॉ. शोभा बच्चव, अनिता पगारे, गणेश उनवणे, प्रभाकर वायचळे, गिरीश उगले, जगमीर सिंग खालसा, सुनील मालुसरे, बी. जी. वाघ, डॉ. हेमलता पाटील, ॲड. तान्हाजी जायभावे, बाळासाहेब शिंदे, ऊर्मिला गायकवाड, अरुण काळे, विजय पाटील, दीपक डोखे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात सकहभाग घेत केंद्र सरकारच्या शेती व शेतीवषयक धोरणांविरोधात निषेध नोंदविला.

शेतकऱ्यांचे आंदोलन हाताळले नाही तर अराजकता - डॉ. रावसाहेब कसबे

राजधानी दिल्लीत शेतकर्यांचे ऐतिहासिक आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार हे आंदोलन बदनाम करीत आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. ही कोणतेही आंदोलन हाताळण्याची योग्य पद्धत नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन व त्यांचे आंदोलन योग्य पद्धतीने हाताळले गेले नाही तर देशात अराजकता माजेल आणि त्यास केंद्र सरकार जबाबदार राहील, असा इशारा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व त्यासाठी सकारात्मक बोलणी करावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी केंद्र सरकारला दिला आहे.

(फोटो-१४पीएचडीसी६१) दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर निदर्शने करताना डॉ. डी. एल. कराड, शरद अहेर, शाहू खैरे, ॲड. तानाजी जायभावे, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, नीलेश खैरे, ज्ञानेश्वर काळे, दीपक डोखे, विजय पाटील, शशिकांत उनवणे आदी.