शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:31 IST

नाशिक : दिल्लीत गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी ...

नाशिक : दिल्लीत गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर एकत्रित येऊन केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन केले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिकांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला असून, दिल्लीतील आंदोलनाचे लोण आता नाशिकमध्येही पसरू लागल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातीलउत्पादन, व्यापार व विपणनविषयक आणलेले तिन्ही सुधारणा कायदे हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत जनआंदोलन संघर्ष समितीसह किसान सभा, संगीनी महिला संघटना, माकप, काँग्रेस, भाकप, आप, वंचित आघाडी, आरपीआय, बसपा, छात्रभरती, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, आयटक, जनवादी महिला संघटना, नागपंथीय सामाजिक संस्था आदी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या आंदोलनात सहभाग घेत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत हे नवीन तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. पंजाब व हरियाणासह देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला घेराव घातला असून, जवळपास गेल्या २० दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी दिल्लीच्या भोवती महामार्गांवर ठिय्या मांडून बसले असताना केंद्र सरकार या आंदोलन फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला आहे. केंद्र सरकारचे हे तिन्ही नवीन कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्द करण्याची या शेतकऱ्यांची मागणी असून, त्यांना पाठिंबा देत केंद्र सरकारने हे कायदे त्वरित मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, डॉ. डी. एल. राड, राजू देसले, शरद आहेर, डॉ. शोभा बच्चव, अनिता पगारे, गणेश उनवणे, प्रभाकर वायचळे, गिरीश उगले, जगमीर सिंग खालसा, सुनील मालुसरे, बी. जी. वाघ, डॉ. हेमलता पाटील, ॲड. तान्हाजी जायभावे, बाळासाहेब शिंदे, ऊर्मिला गायकवाड, अरुण काळे, विजय पाटील, दीपक डोखे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात सकहभाग घेत केंद्र सरकारच्या शेती व शेतीवषयक धोरणांविरोधात निषेध नोंदविला.

शेतकऱ्यांचे आंदोलन हाताळले नाही तर अराजकता - डॉ. रावसाहेब कसबे

राजधानी दिल्लीत शेतकर्यांचे ऐतिहासिक आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार हे आंदोलन बदनाम करीत आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. ही कोणतेही आंदोलन हाताळण्याची योग्य पद्धत नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन व त्यांचे आंदोलन योग्य पद्धतीने हाताळले गेले नाही तर देशात अराजकता माजेल आणि त्यास केंद्र सरकार जबाबदार राहील, असा इशारा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व त्यासाठी सकारात्मक बोलणी करावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी केंद्र सरकारला दिला आहे.

(फोटो-१४पीएचडीसी६१) दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर निदर्शने करताना डॉ. डी. एल. कराड, शरद अहेर, शाहू खैरे, ॲड. तानाजी जायभावे, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, नीलेश खैरे, ज्ञानेश्वर काळे, दीपक डोखे, विजय पाटील, शशिकांत उनवणे आदी.