शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

धनगर समाज कृती समितीची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:14 PM

नाशिक: धनगर समाजाला एस.टी संवर्गातील आरक्षण लागू करण्यात यावे तसेच मागील सरकारने दिलेल्या सर्व योजना पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशा मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

नाशिक: धनगर समाजाला एस.टी संवर्गातील आरक्षण लागू करण्यात यावे तसेच मागील सरकारने दिलेल्या सर्व योजना पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशा मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.धनगड आणि धनगर हा एकच आहे असा अद्यादेश काढून धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सवलती जाहिर करण्याच्या मागणीसाठी समाजाच्यावतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्य सरकराचे लक्ष वेधण्यासाठी शाुक्रवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकायांना निवेदन सादर करण्यात आले.धनगर समाजाला एस.टीचे दाखले देण्यात यावेत, मागील फडणवीस सरकारने दिलेल्या सवलती कायम करण्यात याव्यात, धनगर समाजासाठी एक हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात यावी, मेंढपाळ कुटूंबियांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, ग्रामीण भागातील समाजातील कुटूंबियांना घरकुले मिळावीत, सारथी संस्थेप्रमाणेच समाजातील विद्यार्थ्यांसाठी संस्था इथापन करण्यात यावी, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे बांधण्यात यावीत, सन २०१९-२० या आर्थिक वर्षात धनगर समाजासाठी ५०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते त्यांचा समाजाच्या विकासासाठी वापर करण्यात यावा, नवउद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करून दयावे, युवकांना पोलीस, लष्कर भरतीचे प्रशिक्षण मिळावे, चराई अनुदान देण्यात यावे आदि मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.राज्य सरकारकडून कोणतीही सकारामत्क भूमिका घेतली जात नसल्याने समाजाकडून यापुढे तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल असा इशाराही निवेदनात देण्यात आलेला आहे. 

 

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणGovernmentसरकार