शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एकजूट दाखवत रॅलीद्वारे महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन

By suyog.joshi | Updated: April 29, 2024 17:36 IST

महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी सोमवारी शहरातून रॅलीद्वारे एकजूट दाखवत शक्तीप्रदर्शन केले.

नाशिक: महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी सोमवारी शहरातून रॅलीद्वारे एकजूट दाखवत शक्तीप्रदर्शन केले. नाशिकच्या जागेसाठी राजाभाऊ वाजे यांनी तर दिंडोरीच्या जागेसाठी भास्कर भगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शालिमार येथील शिवसेना भवनपासून रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीसाठी सिन्नर, दिंडोरी, येवला, इगतपुरी, नांदगाव, कळवण, सुरगाणा, पेठ, देवळ्यासह जिल्ह्याच्या विविध भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  ही रॅली शालिमारमार्गे मेनरोड, गाडगे बाबा महाराज चौक, रविवार कारंजा, रेहक्रॉस, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. फलकांनी वेधले लक्षपक्ष कार्यालयापासून निघालेल्या रॅलीमध्ये ढोल ताशांचा गजर करण्यात आला. अन्यायाविरूद्ध लढणार, प्रस्थापितांना भिडणार अन आम्ही जनसेवा करणार, नाशिकच्या शाश्वत विकासाचा चेहरा, जनतेचं प्रेम-माया-विश्वास हीच खरी सावली, मायबाप जनता हीच माऊली यासह वेगवेगळे फलक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या हातात होते. ते रॅलीच्या अग्रभागी होते, त्यामुळे ते लक्ष वेधून घेत होते. महिला कार्यकत्यांचे फोटोसेशनरॅलीत सहभागी झालेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या महिलांनी रॅलीच्या अगोदर फोटोसेशन केले. उद्धवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भगवी साडी परिधान केली होती. तर पुरूष अन महिलांनी डोक्यावर भगव्याच रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. तप्त उन्हात पायी वारी...सकाळी नऊ वाजेची वेळ दिली असतांना रॅली १२ वाजून ९ मिनिटांनी सुरू झाली. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना बरीच वाट पहावी लागली. नाशिकचा पारा ४० अंशांच्यावर गेला असतांना भर उन्हात पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पायी वारी करीत असतांना रॅलीच्या शेवटच्या टप्पयापर्यंत पाेहोचले. शालिमार कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येण्यास सुमारे दाेन तासांचा कालावधी लागला. नेते म्हणाले...१) संजय राऊत (उद्धव सेनेचे नेते तथा खासदार)-महाराष्ट्रातील सर्वात मोठी रॅली बघून आज आनंद होतो आहे. हे आपल्या विजयाचेच चिन्ह आहे. उत्तर महाराष्ट्रातून महायुतीच विजयी होईल. आपल्याला हुकुमशाही नष्ट करायची आहे, हे लक्षात ठेवा.२) जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी)-आजपासून लढाई सुरू झाली आहे. भगरे, वाजे यांनी लढाई सुरू होण्यापूर्वीच जिंकली आहे. शेतकऱ्यांच्याप्रश्नी केंद्र व राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. कांदाप्रश्नी शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पूसली आहेत.३) बाळासाहेब थोरात (काँग्रेस विधिमंडळ नेते)-येथे जमलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा उत्साह चांगला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागा महाविकास आघाडीलाच राहतील याचा विश्वास आहे.

टॅग्स :NashikनाशिकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी