शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नाशकात वनवासी कल्याण आश्रमाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 14:30 IST

राज्य सरकारने जनजाती समाजाच्या विकासासाठी प्रशासकीय रचना व अर्थसंकल्पात तरतूद केली असली तरी, जनजाती समाजाचा अपेक्षित विकास झाला नाही.

नाशिक : जनजाती समाजाच्या विविध मागण्यांसाठी वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.गोल्फ क्लब मैदानावर दिवसभर धरणे धरल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, राज्य सरकारने जनजाती समाजाच्या विकासासाठी प्रशासकीय रचना व अर्थसंकल्पात तरतूद केली असली तरी, जनजाती समाजाचा अपेक्षित विकास झाला नाही. या समाजाच्या विकासाची गती वाढविण्यासाठी राज्यातील बोगस आदिवासींची चौकशी करणे, वनहक्क कायद्यानुसार सामूहिक वनाधिकार बहाल करण्याच्या प्रक्रियेस गती देणे, आदिम जमातीचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने हालचाली करणे, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, जनजाती समाजाच्या विविध परंपरांचे डॉक्युमेंटेशन करणे, जनजाती क्रांतिकारकांची स्मारके उभारणे, जनजातींचे विस्थापन रोखणे, आदिवासींच्या योजना राबविण्यात दिरंगाई करणाºयांवर कारवाई करणे, जनजाती विद्यार्थ्यांचे भत्ते, शिष्यवृत्ती शुल्काचे प्रश्न तातडीने निकाली काढणे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. या मागण्या मान्य न झाल्यास राज्यपातळीवर मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशााराही देण्यात आला आहे. वनवासी कल्याण आश्रम या संस्थेच्या माध्यमातून जनजाती समाजाच्या विकासासंदर्भातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. सरकारचे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून नाशिकमध्येही धरणे धरण्यात आले. या आंदोलनात भा. का. खांडवी, जयराम चौधरी, रमेश गायकवाड, रामदास गावित आदी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :SocialसामाजिकNashikनाशिक