शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नाशकात वनवासी कल्याण आश्रमाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 14:30 IST

राज्य सरकारने जनजाती समाजाच्या विकासासाठी प्रशासकीय रचना व अर्थसंकल्पात तरतूद केली असली तरी, जनजाती समाजाचा अपेक्षित विकास झाला नाही.

नाशिक : जनजाती समाजाच्या विविध मागण्यांसाठी वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.गोल्फ क्लब मैदानावर दिवसभर धरणे धरल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, राज्य सरकारने जनजाती समाजाच्या विकासासाठी प्रशासकीय रचना व अर्थसंकल्पात तरतूद केली असली तरी, जनजाती समाजाचा अपेक्षित विकास झाला नाही. या समाजाच्या विकासाची गती वाढविण्यासाठी राज्यातील बोगस आदिवासींची चौकशी करणे, वनहक्क कायद्यानुसार सामूहिक वनाधिकार बहाल करण्याच्या प्रक्रियेस गती देणे, आदिम जमातीचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने हालचाली करणे, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, जनजाती समाजाच्या विविध परंपरांचे डॉक्युमेंटेशन करणे, जनजाती क्रांतिकारकांची स्मारके उभारणे, जनजातींचे विस्थापन रोखणे, आदिवासींच्या योजना राबविण्यात दिरंगाई करणाºयांवर कारवाई करणे, जनजाती विद्यार्थ्यांचे भत्ते, शिष्यवृत्ती शुल्काचे प्रश्न तातडीने निकाली काढणे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. या मागण्या मान्य न झाल्यास राज्यपातळीवर मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशााराही देण्यात आला आहे. वनवासी कल्याण आश्रम या संस्थेच्या माध्यमातून जनजाती समाजाच्या विकासासंदर्भातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. सरकारचे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून नाशिकमध्येही धरणे धरण्यात आले. या आंदोलनात भा. का. खांडवी, जयराम चौधरी, रमेश गायकवाड, रामदास गावित आदी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :SocialसामाजिकNashikनाशिक