शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

घटनाबाह्य धोरणांमुळे लोकशाही भयाखाली : उत्तम कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:32 IST

हा देश नेमका कोण चालवतो? हे समजण्यापलीकडे आहे. कारण सातत्याने या सरकारकडून घटनेविरुद्ध धोरणे आखून धार्मिक भावना ज्वलंत ठेवत धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता लोकशाहीच्या नीतीमूल्यांचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे लोकशाही भयाखाली सापडली आहे, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.

नाशिक : हा देश नेमका कोण चालवतो? हे समजण्यापलीकडे आहे. कारण सातत्याने या सरकारकडून घटनेविरुद्ध धोरणे आखून धार्मिक भावना ज्वलंत ठेवत धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता लोकशाहीच्या नीतीमूल्यांचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे लोकशाही भयाखाली सापडली आहे, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले. गीताई फाउंडेशनच्या वतीने आयोजित शहीद गौरी लंकेश एल्गार पुरस्कार पत्रकार दीप्ती राऊत यांना बुधवारी (दि.२०) कांबळे व ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी कांबळे म्हणाले, आपल्या देशात भावना तीव्र अन् स्वस्त: केल्या जात असल्यामुळे माणसाचे जगणे मुश्कील होऊ लागले आहे. ज्या देशात ‘पवित्र’ गोष्टी अधिक वाढतात तो देश नेहमी मागासलेला राहतो, हे लक्षात घेता देशाच्या अशा बिकट आणि धर्मनिरपेक्षतेविरुद्ध तयार झालेल्या वातावरणात पत्रकारितेची जबाबदारी अधिक वाढल्याचे ते म्हणाले.  डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्या करून विचार मारण्याचे प्रयत्न एकीकडे होत असताना या विचारांंना जिवंत ठेवत बळ देण्याचे काम गौरी लंकेश एल्गार पुरस्काराच्या माध्यमातून गीताई फाउंडेशनद्वारे केले जात असल्याचे गौरवोद्गार किरण अग्रवाल यांनी यावेळी काढले.  सार्वजनिक क्षेत्रात महिलांचा टक्का वाढावा, यासाठी समाजाने पूरक व्यवस्था उभी करण्याची अपेक्षा पुरस्कारार्थी दीप्ती राऊत यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर आहिरे यांनी केले. सूत्रसंचालन अनिता पगारे तर आभार कल्याणी आहिरे यांनी मानले. पत्रकारिता कसोटीच्या वळणावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरी त्याची गळचेपी होत असल्याने पत्रकारिता कसोटीच्या वळणावर आली आहे. महिलांनी या क्षेत्रात काम करणे अधिक जोखमीचे ठरू पाहत आहे. अशी जोखीम पत्करणार्‍या गौरी लंकेशची स्मृती जपून तिच्याच पावलावर पाऊल टाकून पत्रकारिता करणाºया दीप्ती राऊत यांना सन्मानित करण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे किरण अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक