शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

भाकपकडून आघाडीकडे दोन जागांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:12 IST

नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन जागांसह राज्यात एकूण १५ जागांची मागणी केली आहे. त्याबाबत बुधवारी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि आघाडीतील अन्य पक्षांसमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे भाकपचे केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र कांगो यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसमविचारी पक्षांशी आघाडी करूनच लढण्याचा पक्षाचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन जागांसह राज्यात एकूण १५ जागांची मागणी केली आहे. त्याबाबत बुधवारी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि आघाडीतील अन्य पक्षांसमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे भाकपचे केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र कांगो यांनी पत्रकार परिषदेत दिली.आयटक कामगार केंद्रात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. कांगो यांनी समविचारी पक्षांशी आघाडी करूनच लढण्याचा पक्षाचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. बुधवारी होणाºया राज्यस्तरीय बैठकीत त्याबाबत वाटाघाटी करून अंतिम निर्णय होणार आहे. त्यात पक्षाला किती जागा मिळतात, सन्माननीय तडजोड होते का? त्याबाबतचा निर्णयदेखील पक्षाचे राज्यनेतृत्व घेणार आहे. त्यातदेखील भाजप-शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांचा कोणताही फायदा होऊ नये, असेच आमचे प्रयत्न राहणार असल्याचे डॉ. कांगो यांनी नमूद केले.महाराष्टÑाच्या राजकारणाची वाटचालदेखील केरळ, तामिळनाडूप्रमाणे दोन आघाड्यांतील संघर्षाकडे होत असल्याचे दिसत आहे. जनता केंद्र आणि राज्यातील भाजपच्या कारभाराने त्रस्त झाली असून, मंदीमुळे कामगार आणि चुकीच्या धोरणांमुळे कृषिक्षेत्र संकटात सापडले आहे. त्यामुळे हे दोन्ही वर्ग आता भाजप आणि युतीच्या विरोधात मतदान करणार असल्याचा दावादेखील कांगो यांनी केला.दरम्यान, भाकपने जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याने या मतदारसंघातील इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारी आरंभली आहे. नांदगावमध्ये एकदा यश भाकपने आजवर जिल्ह्यात अनेकदा विधानसभा निवडणूक लढविलेली आहे. यापूर्वी भाकपला नांदगाव मतदारसंघातून यश मिळालेले आहे. या मतदारसंघातून माधवराव गायकवाड यांनी विजय संपादन केलेला होता. जिल्ह्यात माकपचे अस्तित्व दिसून येत असताना भाकपची ताकद घटलेली दिसून येते. आमचे ज्या ठिकाणी भक्कम उमेदवार आहेत, त्याच जागा आम्ही लढवणार आहोत. कॉँग्रेस आघाडीत स्थान मिळाले तर अशा जागी आम्ही वंचित बहुजन आघाडीकडूनही पाठिंबा घेणार आहोत. मात्र, कॉँग्रेस आघाडीत स्थान मिळाले नाही तर आमच्या जागांवर वंचितकडून पाठिंबा तर ज्या जागी वंचितचे दमदार उमेदवार असतील, अशा ठिकाणी वंचितच्या उमेदवारांना खुला पाठिंबा देण्यात येणार असल्याचेही डॉ. कांगो यांनी नमूद केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेस