शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

भाकपकडून आघाडीकडे दोन जागांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:12 IST

नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन जागांसह राज्यात एकूण १५ जागांची मागणी केली आहे. त्याबाबत बुधवारी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि आघाडीतील अन्य पक्षांसमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे भाकपचे केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र कांगो यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसमविचारी पक्षांशी आघाडी करूनच लढण्याचा पक्षाचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन जागांसह राज्यात एकूण १५ जागांची मागणी केली आहे. त्याबाबत बुधवारी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि आघाडीतील अन्य पक्षांसमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे भाकपचे केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र कांगो यांनी पत्रकार परिषदेत दिली.आयटक कामगार केंद्रात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. कांगो यांनी समविचारी पक्षांशी आघाडी करूनच लढण्याचा पक्षाचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. बुधवारी होणाºया राज्यस्तरीय बैठकीत त्याबाबत वाटाघाटी करून अंतिम निर्णय होणार आहे. त्यात पक्षाला किती जागा मिळतात, सन्माननीय तडजोड होते का? त्याबाबतचा निर्णयदेखील पक्षाचे राज्यनेतृत्व घेणार आहे. त्यातदेखील भाजप-शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांचा कोणताही फायदा होऊ नये, असेच आमचे प्रयत्न राहणार असल्याचे डॉ. कांगो यांनी नमूद केले.महाराष्टÑाच्या राजकारणाची वाटचालदेखील केरळ, तामिळनाडूप्रमाणे दोन आघाड्यांतील संघर्षाकडे होत असल्याचे दिसत आहे. जनता केंद्र आणि राज्यातील भाजपच्या कारभाराने त्रस्त झाली असून, मंदीमुळे कामगार आणि चुकीच्या धोरणांमुळे कृषिक्षेत्र संकटात सापडले आहे. त्यामुळे हे दोन्ही वर्ग आता भाजप आणि युतीच्या विरोधात मतदान करणार असल्याचा दावादेखील कांगो यांनी केला.दरम्यान, भाकपने जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याने या मतदारसंघातील इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारी आरंभली आहे. नांदगावमध्ये एकदा यश भाकपने आजवर जिल्ह्यात अनेकदा विधानसभा निवडणूक लढविलेली आहे. यापूर्वी भाकपला नांदगाव मतदारसंघातून यश मिळालेले आहे. या मतदारसंघातून माधवराव गायकवाड यांनी विजय संपादन केलेला होता. जिल्ह्यात माकपचे अस्तित्व दिसून येत असताना भाकपची ताकद घटलेली दिसून येते. आमचे ज्या ठिकाणी भक्कम उमेदवार आहेत, त्याच जागा आम्ही लढवणार आहोत. कॉँग्रेस आघाडीत स्थान मिळाले तर अशा जागी आम्ही वंचित बहुजन आघाडीकडूनही पाठिंबा घेणार आहोत. मात्र, कॉँग्रेस आघाडीत स्थान मिळाले नाही तर आमच्या जागांवर वंचितकडून पाठिंबा तर ज्या जागी वंचितचे दमदार उमेदवार असतील, अशा ठिकाणी वंचितच्या उमेदवारांना खुला पाठिंबा देण्यात येणार असल्याचेही डॉ. कांगो यांनी नमूद केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेस