शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

भाकपकडून आघाडीकडे दोन जागांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:12 IST

नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन जागांसह राज्यात एकूण १५ जागांची मागणी केली आहे. त्याबाबत बुधवारी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि आघाडीतील अन्य पक्षांसमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे भाकपचे केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र कांगो यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसमविचारी पक्षांशी आघाडी करूनच लढण्याचा पक्षाचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन जागांसह राज्यात एकूण १५ जागांची मागणी केली आहे. त्याबाबत बुधवारी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि आघाडीतील अन्य पक्षांसमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे भाकपचे केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र कांगो यांनी पत्रकार परिषदेत दिली.आयटक कामगार केंद्रात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. कांगो यांनी समविचारी पक्षांशी आघाडी करूनच लढण्याचा पक्षाचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. बुधवारी होणाºया राज्यस्तरीय बैठकीत त्याबाबत वाटाघाटी करून अंतिम निर्णय होणार आहे. त्यात पक्षाला किती जागा मिळतात, सन्माननीय तडजोड होते का? त्याबाबतचा निर्णयदेखील पक्षाचे राज्यनेतृत्व घेणार आहे. त्यातदेखील भाजप-शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांचा कोणताही फायदा होऊ नये, असेच आमचे प्रयत्न राहणार असल्याचे डॉ. कांगो यांनी नमूद केले.महाराष्टÑाच्या राजकारणाची वाटचालदेखील केरळ, तामिळनाडूप्रमाणे दोन आघाड्यांतील संघर्षाकडे होत असल्याचे दिसत आहे. जनता केंद्र आणि राज्यातील भाजपच्या कारभाराने त्रस्त झाली असून, मंदीमुळे कामगार आणि चुकीच्या धोरणांमुळे कृषिक्षेत्र संकटात सापडले आहे. त्यामुळे हे दोन्ही वर्ग आता भाजप आणि युतीच्या विरोधात मतदान करणार असल्याचा दावादेखील कांगो यांनी केला.दरम्यान, भाकपने जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याने या मतदारसंघातील इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारी आरंभली आहे. नांदगावमध्ये एकदा यश भाकपने आजवर जिल्ह्यात अनेकदा विधानसभा निवडणूक लढविलेली आहे. यापूर्वी भाकपला नांदगाव मतदारसंघातून यश मिळालेले आहे. या मतदारसंघातून माधवराव गायकवाड यांनी विजय संपादन केलेला होता. जिल्ह्यात माकपचे अस्तित्व दिसून येत असताना भाकपची ताकद घटलेली दिसून येते. आमचे ज्या ठिकाणी भक्कम उमेदवार आहेत, त्याच जागा आम्ही लढवणार आहोत. कॉँग्रेस आघाडीत स्थान मिळाले तर अशा जागी आम्ही वंचित बहुजन आघाडीकडूनही पाठिंबा घेणार आहोत. मात्र, कॉँग्रेस आघाडीत स्थान मिळाले नाही तर आमच्या जागांवर वंचितकडून पाठिंबा तर ज्या जागी वंचितचे दमदार उमेदवार असतील, अशा ठिकाणी वंचितच्या उमेदवारांना खुला पाठिंबा देण्यात येणार असल्याचेही डॉ. कांगो यांनी नमूद केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेस