शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

पुनंदचे आरक्षित पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:16 PM

मालेगाव तालुक्यातील व परिसरातील ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने पुनंदचे पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

दाभाडी : मालेगाव तालुक्यातील व परिसरातील ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने पुनंदचे पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.मालेगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याची सोय गिरणा नदी काठावरील विहिरींद्वारे केली जाते. मात्र सध्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला असल्याने ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे. अनेक गावांतील शेतकरी कुटुंब हे कोरोनाच्या प्रादुर्भावाने संरक्षणासाठी स्वत:च्या शेतात राहण्यासाठी गेले आहेत. तसेच सदर शेतकऱ्यांना जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. विहिरींनी तळ गाठला असल्याने टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील मौजे टेहरे, चंदनपुरी, कौळाणे, मुंगसे दाभाडी, आघार बु, आघार खु, चिंचावड, वाके, नांदगाव बु येथील पिण्याच्या पाण्यासाठी, गुरांसाठी व सिंचनासाठी गिरणा नदी काठालगत विहिरी आहेत मात्र सदर विहिरींनी तळ गाठल्याने अडचण निर्माण झाली आहे. संबंधित ग्रामपंचायत पाणीपट्टी भरण्यास तयार आहेत म्हणून पालकमंत्री यांनी आपल्या अधिकाराचे आरक्षित असलेले पुनंद बंधाºयातील पाणी मालेगावपर्यंत त्वरित सोडल्यास सदर प्रश्न निकाली लागेल व परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर होईल, अशी मागणी करण्यात आली आहे. यास्तव जिल्हाधिकारी नाशिक यांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातChagan Bhujbalछगन भुजबळ