शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

केळझर धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 15:58 IST

शेतीसिंचन : राष्ट्रवादीचे जिल्हाधिका-यांना निवेदन

ठळक मुद्देकमी पर्जन्यमानामुळे पाणी, जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

कंधाणे - बागलाण तालुका सध्या दुष्काळाच्या छायेत असून यंदा कमी पावसामुळे चारा-पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. प्रशासनाकडून शेतीसिंचनासाठी अदयाप आरम नदीत पाण्याचे आवर्तन न सोडल्याने या भागातील फळ बागायती क्षेत्राच्या रब्बी हंगामाचे नियोजन चुकत आहे. त्यामुळे केळझर धरणातुन शेतीसिंचनासाठी पाण्याचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची मागणी राष्ट्रवादी कांग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.बागलाण तालुक्यावर यंदा पावसाने वक्र दृष्टि केल्याने खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. त्यामुळे बळीराजावर आर्थिक संकट कोसळले आहे. कमी पर्जन्यमानामुळे पाणी, जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. आजही ब-याच गावांना एक दिवसाआड अपु-या स्वरूपात पाणी पुरवठा केला जात असल्याने स्थानिक प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. केळझर धरणाच्या लाभाक्षेत्रातील गावातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून धरणातील पाण्यावर कंधाणे, निकवेल, चौंधाणे, मुंजवाड, सटाणा, आराई गावातील फळबागायती शेतीक्षेत्राचे रब्बी हंगामाचे भवितव्य अवलंबून असते. दरवर्षी आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस शेतीसाठी पाण्याचे ठरणारे नियोजन यंदाच्या वर्षी उशिराने होत असल्याने बळीराजाच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून अदयाप कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने लाभ क्षेत्रातील शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सूर पसरला आहे . शेतीसिंचनासाठी सोडण्यात येणा-या पाण्यामुळे शेतीसिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामुळे पूर्ण क्षमतेने भरलेल्या केळझर धरणातून शेतीसिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सोडून दुष्काळाने होरपळणाºया बळीराजाला दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादी कांग्रेस च्या पदधिका-यांनी केली आहे राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, विद्यार्थी कांग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल बच्छाव, राजेंद्र सावकार उपस्थित होते

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी