शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कडवा कॅनॉलला आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:10 IST

निफाड व सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील अनेक गावांना दुष्काळाच्या झळा बसू लागल्या असून, परिसरातील विहिरी, कूपनलिका यांनी तळ गाठला असून, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चाऱ्यापाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, परिसरातील जीवनदायिनी असलेल्या कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सायखेडा : निफाड व सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील अनेक गावांना दुष्काळाच्या झळा बसू लागल्या असून, परिसरातील विहिरी, कूपनलिका यांनी तळ गाठला असून, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चाऱ्यापाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, परिसरातील जीवनदायिनी असलेल्या कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निफाड तालुक्यात वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाºया भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, पिंपळगाव निपाणी, तळवाडे, महाजनपूर या गावात मार्च महिन्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, विहिरींनी तळ गाठला असून, त्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे, तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा धरणातील पाणी दारणा नदीपात्रात सोडले जाते; मात्र दारणा नदीला मुबलक पाणी आहे, शिवाय नदीच्या पाण्यात पाणी सोडून ज्या भागात पाणी मुबलक प्रमाणात असते त्याच भागाला पाणी मिळते त्यामुळे प्रशासनाने असे न करता कॅनल परिसरातील नागरिकांना पाणी मिळावे, उन्हाळ्याच्या झळा बसू नये, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची होत असलेली भटकंती थांबवावी यासाठी कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.शेतातील उभी पिके पाण्याअभावी सुकू लागले आहे. यंदा चांगला पाऊस पडला होता, त्यामुळे पाण्याने मार्च महिना तग धरला असला तरी आज मात्र झळा बसू लागल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. या परिसरासाठी जीवनदायिनी असणाºया कडवा कॅनॉलमध्ये धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने धरणात उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण