शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

कडवा कॅनॉलला आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:10 IST

निफाड व सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील अनेक गावांना दुष्काळाच्या झळा बसू लागल्या असून, परिसरातील विहिरी, कूपनलिका यांनी तळ गाठला असून, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चाऱ्यापाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, परिसरातील जीवनदायिनी असलेल्या कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सायखेडा : निफाड व सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील अनेक गावांना दुष्काळाच्या झळा बसू लागल्या असून, परिसरातील विहिरी, कूपनलिका यांनी तळ गाठला असून, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चाऱ्यापाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, परिसरातील जीवनदायिनी असलेल्या कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निफाड तालुक्यात वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाºया भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, पिंपळगाव निपाणी, तळवाडे, महाजनपूर या गावात मार्च महिन्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, विहिरींनी तळ गाठला असून, त्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे, तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा धरणातील पाणी दारणा नदीपात्रात सोडले जाते; मात्र दारणा नदीला मुबलक पाणी आहे, शिवाय नदीच्या पाण्यात पाणी सोडून ज्या भागात पाणी मुबलक प्रमाणात असते त्याच भागाला पाणी मिळते त्यामुळे प्रशासनाने असे न करता कॅनल परिसरातील नागरिकांना पाणी मिळावे, उन्हाळ्याच्या झळा बसू नये, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची होत असलेली भटकंती थांबवावी यासाठी कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.शेतातील उभी पिके पाण्याअभावी सुकू लागले आहे. यंदा चांगला पाऊस पडला होता, त्यामुळे पाण्याने मार्च महिना तग धरला असला तरी आज मात्र झळा बसू लागल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. या परिसरासाठी जीवनदायिनी असणाºया कडवा कॅनॉलमध्ये धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने धरणात उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण