शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

कडवा कॅनॉलला आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:10 IST

निफाड व सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील अनेक गावांना दुष्काळाच्या झळा बसू लागल्या असून, परिसरातील विहिरी, कूपनलिका यांनी तळ गाठला असून, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चाऱ्यापाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, परिसरातील जीवनदायिनी असलेल्या कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सायखेडा : निफाड व सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील अनेक गावांना दुष्काळाच्या झळा बसू लागल्या असून, परिसरातील विहिरी, कूपनलिका यांनी तळ गाठला असून, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चाऱ्यापाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, परिसरातील जीवनदायिनी असलेल्या कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निफाड तालुक्यात वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाºया भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, पिंपळगाव निपाणी, तळवाडे, महाजनपूर या गावात मार्च महिन्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, विहिरींनी तळ गाठला असून, त्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे, तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा धरणातील पाणी दारणा नदीपात्रात सोडले जाते; मात्र दारणा नदीला मुबलक पाणी आहे, शिवाय नदीच्या पाण्यात पाणी सोडून ज्या भागात पाणी मुबलक प्रमाणात असते त्याच भागाला पाणी मिळते त्यामुळे प्रशासनाने असे न करता कॅनल परिसरातील नागरिकांना पाणी मिळावे, उन्हाळ्याच्या झळा बसू नये, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची होत असलेली भटकंती थांबवावी यासाठी कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.शेतातील उभी पिके पाण्याअभावी सुकू लागले आहे. यंदा चांगला पाऊस पडला होता, त्यामुळे पाण्याने मार्च महिना तग धरला असला तरी आज मात्र झळा बसू लागल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. या परिसरासाठी जीवनदायिनी असणाºया कडवा कॅनॉलमध्ये धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने धरणात उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण