शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ग्रामपंचायत विभाजनाच्या अटी शिथिल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:35 IST

ग्रामपंचायत विभाजनाच्या अटी शिथिल करण्याची मागणी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंचायतराज ही ग्रामीण विकासाची पायाभूत व्यवस्था उभी करण्यात तत्कालीन सरकारला यश आले. अनेक गावांना जोडलेल्या वाड्यावस्त्यांचा समावेश त्या गावच्या ग्रामपंचायतींमध्येच करण्यात आला. मात्र या जोडलेल्या वाड्यावस्त्याचा विकास अद्याप झालेला बघावयास मिळत नाही. त्याचप्रमाणे येथील सदस्यांना राजकीय संधीदेखील उपलब्ध होत नाही.

सिन्नर : ग्रामपंचायत विभाजनाच्या अटी शिथिल करण्याची मागणी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंचायतराज ही ग्रामीण विकासाची पायाभूत व्यवस्था उभी करण्यात तत्कालीन सरकारला यश आले. अनेक गावांना जोडलेल्या वाड्यावस्त्यांचा समावेश त्या गावच्या ग्रामपंचायतींमध्येच करण्यात आला. मात्र या जोडलेल्या वाड्यावस्त्याचा विकास अद्याप झालेला बघावयास मिळत नाही. त्याचप्रमाणे येथील सदस्यांना राजकीय संधीदेखील उपलब्ध होत नाही.राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये अनेक ग्रामपंचायत विभाजनाचे प्रस्ताव त्यासंदर्भातील अटी व शर्तीमुळे धूळ खात पडून आहेत. या सर्व वंचित भागाचा विकास होण्यासाठी त्यासंदर्भातील अटी व शर्ती शिथिल करून विभाजनाचा मार्ग सोयीस्कर करावा, अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.आजही प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामसेवक नाही. एका ग्रामसेवकाकडे साधारण ३ ते ४ ग्रामपंचायत आहेत. त्यामुळे ग्रामसेवकाकडे अजून एखादी ग्रामपंचायत वाढल्याने विशेष फरक पडणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायत विभाजनामुळे शासनाच्या आस्थापनेवरील ग्रामसेवक पगाराचा विचार करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ग्रामसेवकांची संख्या वाढेल तेव्हा वाढेल मात्र ग्रामपंचायत विभाजनामुळे छोट्या गावांची, वाड्या वस्त्यांची स्वायत्ता अबाधित राहील असेही निवेदनात म्हटले आहे.मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम ४ अन्वये ग्रामपंचायत विभाजन- एकत्रीकरण किंवा त्रिशंकू भागासाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना करणेकामी शासन निर्णय १२ फेब्रुवारी २००४ मध्ये सर्व समावेशक सूचनावजा अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत. १६ वर्षांपूर्वी हे निकष तत्कालीन परिस्थितीनुरूप घालण्यात आले होते; मात्र आजची वास्तविक परिस्थिती बघता यात बदल होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत