शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ग्रामपंचायत विभाजनाच्या अटी शिथिल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:35 IST

ग्रामपंचायत विभाजनाच्या अटी शिथिल करण्याची मागणी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंचायतराज ही ग्रामीण विकासाची पायाभूत व्यवस्था उभी करण्यात तत्कालीन सरकारला यश आले. अनेक गावांना जोडलेल्या वाड्यावस्त्यांचा समावेश त्या गावच्या ग्रामपंचायतींमध्येच करण्यात आला. मात्र या जोडलेल्या वाड्यावस्त्याचा विकास अद्याप झालेला बघावयास मिळत नाही. त्याचप्रमाणे येथील सदस्यांना राजकीय संधीदेखील उपलब्ध होत नाही.

सिन्नर : ग्रामपंचायत विभाजनाच्या अटी शिथिल करण्याची मागणी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंचायतराज ही ग्रामीण विकासाची पायाभूत व्यवस्था उभी करण्यात तत्कालीन सरकारला यश आले. अनेक गावांना जोडलेल्या वाड्यावस्त्यांचा समावेश त्या गावच्या ग्रामपंचायतींमध्येच करण्यात आला. मात्र या जोडलेल्या वाड्यावस्त्याचा विकास अद्याप झालेला बघावयास मिळत नाही. त्याचप्रमाणे येथील सदस्यांना राजकीय संधीदेखील उपलब्ध होत नाही.राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये अनेक ग्रामपंचायत विभाजनाचे प्रस्ताव त्यासंदर्भातील अटी व शर्तीमुळे धूळ खात पडून आहेत. या सर्व वंचित भागाचा विकास होण्यासाठी त्यासंदर्भातील अटी व शर्ती शिथिल करून विभाजनाचा मार्ग सोयीस्कर करावा, अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.आजही प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामसेवक नाही. एका ग्रामसेवकाकडे साधारण ३ ते ४ ग्रामपंचायत आहेत. त्यामुळे ग्रामसेवकाकडे अजून एखादी ग्रामपंचायत वाढल्याने विशेष फरक पडणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायत विभाजनामुळे शासनाच्या आस्थापनेवरील ग्रामसेवक पगाराचा विचार करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ग्रामसेवकांची संख्या वाढेल तेव्हा वाढेल मात्र ग्रामपंचायत विभाजनामुळे छोट्या गावांची, वाड्या वस्त्यांची स्वायत्ता अबाधित राहील असेही निवेदनात म्हटले आहे.मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम ४ अन्वये ग्रामपंचायत विभाजन- एकत्रीकरण किंवा त्रिशंकू भागासाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना करणेकामी शासन निर्णय १२ फेब्रुवारी २००४ मध्ये सर्व समावेशक सूचनावजा अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत. १६ वर्षांपूर्वी हे निकष तत्कालीन परिस्थितीनुरूप घालण्यात आले होते; मात्र आजची वास्तविक परिस्थिती बघता यात बदल होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत