शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

ग्रामपंचायत विभाजनाच्या अटी शिथिल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:35 IST

ग्रामपंचायत विभाजनाच्या अटी शिथिल करण्याची मागणी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंचायतराज ही ग्रामीण विकासाची पायाभूत व्यवस्था उभी करण्यात तत्कालीन सरकारला यश आले. अनेक गावांना जोडलेल्या वाड्यावस्त्यांचा समावेश त्या गावच्या ग्रामपंचायतींमध्येच करण्यात आला. मात्र या जोडलेल्या वाड्यावस्त्याचा विकास अद्याप झालेला बघावयास मिळत नाही. त्याचप्रमाणे येथील सदस्यांना राजकीय संधीदेखील उपलब्ध होत नाही.

सिन्नर : ग्रामपंचायत विभाजनाच्या अटी शिथिल करण्याची मागणी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंचायतराज ही ग्रामीण विकासाची पायाभूत व्यवस्था उभी करण्यात तत्कालीन सरकारला यश आले. अनेक गावांना जोडलेल्या वाड्यावस्त्यांचा समावेश त्या गावच्या ग्रामपंचायतींमध्येच करण्यात आला. मात्र या जोडलेल्या वाड्यावस्त्याचा विकास अद्याप झालेला बघावयास मिळत नाही. त्याचप्रमाणे येथील सदस्यांना राजकीय संधीदेखील उपलब्ध होत नाही.राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये अनेक ग्रामपंचायत विभाजनाचे प्रस्ताव त्यासंदर्भातील अटी व शर्तीमुळे धूळ खात पडून आहेत. या सर्व वंचित भागाचा विकास होण्यासाठी त्यासंदर्भातील अटी व शर्ती शिथिल करून विभाजनाचा मार्ग सोयीस्कर करावा, अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.आजही प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामसेवक नाही. एका ग्रामसेवकाकडे साधारण ३ ते ४ ग्रामपंचायत आहेत. त्यामुळे ग्रामसेवकाकडे अजून एखादी ग्रामपंचायत वाढल्याने विशेष फरक पडणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायत विभाजनामुळे शासनाच्या आस्थापनेवरील ग्रामसेवक पगाराचा विचार करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ग्रामसेवकांची संख्या वाढेल तेव्हा वाढेल मात्र ग्रामपंचायत विभाजनामुळे छोट्या गावांची, वाड्या वस्त्यांची स्वायत्ता अबाधित राहील असेही निवेदनात म्हटले आहे.मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम ४ अन्वये ग्रामपंचायत विभाजन- एकत्रीकरण किंवा त्रिशंकू भागासाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना करणेकामी शासन निर्णय १२ फेब्रुवारी २००४ मध्ये सर्व समावेशक सूचनावजा अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत. १६ वर्षांपूर्वी हे निकष तत्कालीन परिस्थितीनुरूप घालण्यात आले होते; मात्र आजची वास्तविक परिस्थिती बघता यात बदल होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत