शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 10:16 PM

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या जात असल्यातरी शासनाकडून तसे होताना दिसत नाही. कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

येवला : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या जात असल्यातरी शासनाकडून तसे होताना दिसत नाही. कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.येवला बाजार समितीत गेल्या तीन महिन्यांत दहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जाणारा कांदा आज सातशे रुपयांवर आला आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित उठवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य अंबादास बनकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यंदा अवकाळी व परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले.तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकाची लागवड केली. मात्र परतीच्या पावसाने उशिरापर्यंत मुक्काम केल्याने खरीपसह रब्बी पिकांची वाट लागली. शेतात पाणी साचल्याने चिखल झाला. कांद्यासह मका पीक पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्याचे उत्पादन २० ते २५ टक्क्यांपर्यंत घसरले. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने गेल्या दोन महिन्यात कांदा दर गगनाला भिडलेले दिसले. असे दिसत असले तरी उत्पादनात कमालीची घट झाल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या पदरात फारसा लाभ पडला नाही. नवीन कांदा निघालयला सुरु वात झाली आहे. त्यामुळे बाजारभाव दोन हजार रु पयांच्या खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसात कांद्याची आवक वाढून दर आणखी घसरण्याची भीती व्यक्त होत असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी बनकर यांनी निवेदनात केली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा