शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:08 IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या जात असल्यातरी शासनाकडून तसे होताना दिसत नाही. कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

येवला : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या जात असल्यातरी शासनाकडून तसे होताना दिसत नाही. कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.येवला बाजार समितीत गेल्या तीन महिन्यांत दहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जाणारा कांदा आज सातशे रुपयांवर आला आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित उठवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य अंबादास बनकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यंदा अवकाळी व परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले.तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकाची लागवड केली. मात्र परतीच्या पावसाने उशिरापर्यंत मुक्काम केल्याने खरीपसह रब्बी पिकांची वाट लागली. शेतात पाणी साचल्याने चिखल झाला. कांद्यासह मका पीक पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्याचे उत्पादन २० ते २५ टक्क्यांपर्यंत घसरले. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने गेल्या दोन महिन्यात कांदा दर गगनाला भिडलेले दिसले. असे दिसत असले तरी उत्पादनात कमालीची घट झाल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या पदरात फारसा लाभ पडला नाही. नवीन कांदा निघालयला सुरु वात झाली आहे. त्यामुळे बाजारभाव दोन हजार रु पयांच्या खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसात कांद्याची आवक वाढून दर आणखी घसरण्याची भीती व्यक्त होत असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी बनकर यांनी निवेदनात केली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा