शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:08 IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या जात असल्यातरी शासनाकडून तसे होताना दिसत नाही. कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

येवला : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या जात असल्यातरी शासनाकडून तसे होताना दिसत नाही. कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.येवला बाजार समितीत गेल्या तीन महिन्यांत दहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जाणारा कांदा आज सातशे रुपयांवर आला आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित उठवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य अंबादास बनकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यंदा अवकाळी व परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले.तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकाची लागवड केली. मात्र परतीच्या पावसाने उशिरापर्यंत मुक्काम केल्याने खरीपसह रब्बी पिकांची वाट लागली. शेतात पाणी साचल्याने चिखल झाला. कांद्यासह मका पीक पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्याचे उत्पादन २० ते २५ टक्क्यांपर्यंत घसरले. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने गेल्या दोन महिन्यात कांदा दर गगनाला भिडलेले दिसले. असे दिसत असले तरी उत्पादनात कमालीची घट झाल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या पदरात फारसा लाभ पडला नाही. नवीन कांदा निघालयला सुरु वात झाली आहे. त्यामुळे बाजारभाव दोन हजार रु पयांच्या खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसात कांद्याची आवक वाढून दर आणखी घसरण्याची भीती व्यक्त होत असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी बनकर यांनी निवेदनात केली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा