शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

करंजवणचे आवर्तन बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 23:15 IST

दिंडोरी : तालुक्यातील सर्वांत मोठे व येवला, निफाड व मनमाड तालुक्यांतील शेती व शहरांना कडक उन्हाळ्यात तहान भागविणाऱ्या करंजवण धरणातून सलग एक महिन्यापासून पालखेड जलाशयामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील स्थानिक जनतेकडून करंजवण धरणातून सोडलेले आवर्तन बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्दे३६ टक्के पाणीसाठा : स्थानिक जनतेत नाराजीचा सूर

दिंडोरी : तालुक्यातील सर्वांत मोठे व येवला, निफाड व मनमाड तालुक्यांतील शेती व शहरांना कडक उन्हाळ्यात तहान भागविणाऱ्या करंजवण धरणातून सलग एक महिन्यापासून पालखेड जलाशयामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील स्थानिक जनतेकडून करंजवण धरणातून सोडलेले आवर्तन बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

करंजवण धरणात चालू वर्षी शंभर टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र, सलग एक महिन्यापासून आवर्तन चालू असल्यामुळे सध्या धरणात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. भविष्यातील कडळ उन्हाळ्याचा विचार करता तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये करंजवण धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून पालखेड धरणात पाणीसाठा केला जातो. याचा परिणाम म्हणून कादवा नदीचे पात्र संपूर्णपणे कोरडे पडते. कादवा नदीकाठावरील पाणीपुरवठा योजना त्याचप्रमाणे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे करंजवण धरणातून एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी वांरवार होत आहे.धरणातील पाणीसाठाकरंजवण - ३६ टक्केवाघाड - २४ टक्केपुणेगाव - ३५ टक्केओझरखेड - ५७ टक्केपालखेड - ६४ टक्केतिसगाव - ४८ टक्केभविष्यात स्थानिक जनतेचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. धरणातून कादवा नदीपात्रात एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडण्यात आले पाहिजे. स्थानिक जनतेला पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही याची दखल पालकमंत्री छगन भुजबळ व महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी घ्यावी.- जयदीप देशमुख, करंजवण.

टॅग्स :water transportजलवाहतूकFarmerशेतकरी