शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 23:50 IST

देवगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या वाकद येथील अशोक पिराजी वाळुंज व मंगल अशोक वाळुंज यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मुलाबाळांसह इच्छामरणाचा अर्ज केला आहे.

ठळक मुद्देदेवगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या वाकद येथील अशोक पिराजी वाळुंज व मंगल अशोक वाळुंज यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मुलाबाळांसह इच्छामरणाचा अर्ज केला आहे.

बॅँकेच्या मनमानीचा आरोप : पालकमंत्र्यांनाही निवेदन; नापिकीमुळे आर्थिक अडचण

 

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या वाकद येथील अशोक पिराजी वाळुंज व मंगल अशोक वाळुंज यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मुलाबाळांसह इच्छामरणाचा अर्ज केला आहे.येवला तालुक्यातील मुखेड येथील महाराष्ट्र बँक शाखेच्या मनमानीचा त्यांनी आरोप केला आहे. मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना समक्ष दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतील पात्र शेतकरी असून, त्यासाठी आम्ही आॅनलाइन अर्जही केला आहे.संबंधित कर्जमाफीचा आपणास लाभ देण्यात आल्याचा संदेशही १ एप्रिल २०१८ रोजी प्राप्त झाला. मात्र मुखेड येथील महाराष्ट्र बँकेत चौकशीसाठी गेलो असता तेथील बँक व्यवस्थापकाने तुमच्या कर्जमाफीचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आला नसल्याचे सांगत तुम्हाला कर्ज भरावेच लागेल असे सुनावले. मी वारंवार बँक शाखेला भेट दिली मात्र प्रत्येक वेळेस मला बँकेकडून नकारघंटाच मिळाली. आम्ही अल्पभूधारक शेतकरी असून, माझ्या पत्नीच्या हृदयाची शस्रक्रि या व अर्धांगवायूचा आजार झाला असून, वेळोवेळी लागणारा औषधोपचाराचा खर्च, मुलीचे लग्न करणे आवश्यक आहे. मुलांचा शिक्षणाचा खर्च, दुष्काळ व अतिवृष्टी यामुळे नापिकीमुळे आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. त्यामुळे आम्ही कर्ज भरू शकत नाही. महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना सन २०१६ पासून जाहीर केलेली आहे व आमचे कर्ज सन २०१० मधील असल्याने याही कर्जमाफी योजनेत आम्ही बसत नाही. त्यामुळे आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आमच्या पश्चात मुलांची परवड होऊ नये म्हणून आम्हाला मुलाबाळांसह इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या संदर्भात बँक व्यवस्थापक शशांक श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता, बँकेमार्फत कर्ज मंजूर झाल्याचे संदेश बँकेने ज्यांचे खात्याशी भ्रमणध्वनी नंबर जोडलेले आहेत त्यांना गेले आहेत. शिरवाडे व कानळद ही गावे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वरिष्ठांनी काळ्या यादीत टाकली असून, याबाबत तुमची तक्र ार लेखी दिल्यास मी वरिष्ठांना कळवतो. अशोक वाळुंज यांच्या प्रकरणात सरकारी पोर्टलचा दोष असून, त्यात बँकेचा कुठलाही दोष नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :ministerमंत्रीFarmerशेतकरी