शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

यंत्रमागासाठी वीज दरवाढ रद्द करण्याची मागणी

By admin | Updated: November 17, 2015 23:07 IST

यंत्रमागासाठी वीज दरवाढ रद्द करण्याची मागणी

आझादनगर : राज्यातील यंत्रमागधारक दोन वर्षांपासून मंदीच्या सावटाखाली मार्गक्रमण करीत असून, शासनाने वीज दरात सवलत देण्याचे जाहीर करूनही आॅक्टोबर महिन्याच्या वीज देयकात चार रुपये २२ पैसे प्रमाणे दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ रद्द करण्यात येऊन सर्वसमान वीजदर दोन रुपये ६६ पैसे असे कायम ठेवावे, अशी मागणी मालेगाव मध्यचे आमदार आसीफ शेख यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.यंत्रमाग कारखान्यासाठी लागणारी वीज ही २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त अश्वशक्ती अशी दोन विभागणीत वीज दर आकारणी करण्यात येत होती. ही तफावत दूर करून सर्वांना समान वीजदर आकारणी करण्यात यावी, अशी मागणी यंत्रमाग व्यवसाय असलेल्या मतदारसंघाच्या आमदारांनी राज्य शासनाकडे लावून धरली होती. त्यानुसार एकीकडे ७ नोव्हेंबर २०१५ रोजी सर्वांना समान वीजदर करण्यात आला; तर दुसरीकडे आघाडी शासनाच्या काळापासून (१ आॅगस्ट २०१२) इंधन समायोजन आकारणीत दिली जाणारी ५० टक्के सवलत रद्द करण्यात आली. यामुळे यंत्रमागधारकांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. राज्यातील यंत्रमाग व्यवसाय सततच्या मंदीमुळे डबघाईत आला असून, राज्य शासनाने केलेली ही वीज दरवाढ रद्द करून सर्वांना समान बेसिक दर आकारावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक शेख रफीक शेख बशारत उपस्थित होते. (वार्ताहर)