शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कळवण तालुक्यात बससेवा पूर्ववत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 17:50 IST

कळवण : तालुक्यातील आदिवासीबहुल भागात अनेक वर्षांपासून बंद असलेली बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानच्या कार्यकर्त्यांनी कळवण आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे आदिवासी बचाव अभियानचे निवेदन

तालुक्यातील रस्त्याची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी रस्त्यावरील मोठमोठे खड्डे व अरुंद रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने, तालुक्यातील काही मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली असून काही बसेस अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. तसेच नऊ महिन्यापासून जगभरात सुरू असलेल्या कोविड-१९ च्या संसर्गामुळे संपूर्ण देश व राज्यात बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र सध्या कोविडच्या विळख्यातून देशातील परिस्थिती सुधारत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शासनाने आठवडी बाजार, शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये चालू केली, मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी, प्रवासी यांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यातील खराब रस्ते एसटी वाहतुकीसाठी काही प्रमाणात सुयोग्य झाले असून, या मार्गावरील बंद असलेली बससेवा सुरू करून तालुक्यातील ग्रामीण जनतेला दिलासा द्यावा, या आशयाचे निवेदन आदिवासी बचाव अभियानचे कार्यकर्ते मनोहर गायकवाड, सुशील कुंवर, कौतिक कुंवर, योगेश बागुल आदूंनी कळवण आगार व्यवस्थापक हेमंत पगार यांना दिले.

टॅग्स :Nashikनाशिकpassengerप्रवासी