शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कळवण तालुक्यात बससेवा पूर्ववत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 17:50 IST

कळवण : तालुक्यातील आदिवासीबहुल भागात अनेक वर्षांपासून बंद असलेली बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानच्या कार्यकर्त्यांनी कळवण आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे आदिवासी बचाव अभियानचे निवेदन

तालुक्यातील रस्त्याची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी रस्त्यावरील मोठमोठे खड्डे व अरुंद रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने, तालुक्यातील काही मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली असून काही बसेस अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. तसेच नऊ महिन्यापासून जगभरात सुरू असलेल्या कोविड-१९ च्या संसर्गामुळे संपूर्ण देश व राज्यात बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र सध्या कोविडच्या विळख्यातून देशातील परिस्थिती सुधारत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शासनाने आठवडी बाजार, शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये चालू केली, मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी, प्रवासी यांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यातील खराब रस्ते एसटी वाहतुकीसाठी काही प्रमाणात सुयोग्य झाले असून, या मार्गावरील बंद असलेली बससेवा सुरू करून तालुक्यातील ग्रामीण जनतेला दिलासा द्यावा, या आशयाचे निवेदन आदिवासी बचाव अभियानचे कार्यकर्ते मनोहर गायकवाड, सुशील कुंवर, कौतिक कुंवर, योगेश बागुल आदूंनी कळवण आगार व्यवस्थापक हेमंत पगार यांना दिले.

टॅग्स :Nashikनाशिकpassengerप्रवासी