शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेतकरी मारहाण प्रकरणी कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 17:35 IST

पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारसमिती म्हणून नाव लौकीक असणाऱ्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये शुक्रवारी (दि. २३) टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांस येथील आडतदाराकडून मारहाण झाली त्या अडती वर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी बाजार समितीचे सचिव बाळासाहेब बाजारे यांना निवेदन देऊन केली आहे .

ठळक मुद्देशेतकऱ्यांसह, सामाजिक कार्यकर्त्यांचे बाजार समितीला निवेदन

पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारसमिती म्हणून नाव लौकीक असणाऱ्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये शुक्रवारी (दि. २३) टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांस येथील आडतदाराकडून मारहाण झाली त्या अडती वर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी बाजार समितीचे सचिव बाळासाहेब बाजारे यांना निवेदन देऊन केली आहे .त्यावर दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन सचिव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या टोमॅटो मालाचे पैसे घेण्यासाठी कारसूळ येथील शेतकरी जितेंद्र बाळासाहेब जाधव हे गेल्यावर संत सावता माळी आडतमधील दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत असून सोमवारी (दि.२६) उंबरखेडचे माजी सरपंच भाऊ घुमरे, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे, प्रकाश वाटपाडे, बेहेडचे माजी सरपंच अशोक घुटे, दावचवाडीचे माजी सरपंच योगेश कुयटे, पीडित शेतकरी जितेंद्र जाधव आदीसह शेतकऱ्यांनी बाजार समिती सचिव बाळासाहेब बाजारे यांना निवेदन दिले.या मारहाण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली. दरम्यान, या प्रकरणी मंगळवारी (दि. २७) सभापती दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे बाजारे यांनी सांगितले.दरम्यान, बाजार समिती परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे अशोक घुटे यांनी लक्ष वेधले. त्यावर असे प्रकार आढळल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे बाजारे यांनी सांगितले.शेतकरी दारू पिला नसल्याचा खुलासामारहाण झालेल्या शेतकर्याने मद्यपान केले असल्याचा आरोप आडत मालकाने केला होता. मात्र, संबंधित शेतकऱ्याने मद्यपान केले नसल्याचा खुलासा बाजार समिती कर्मचारी दीपक गवळी यांनी केला.कारवाई होणारच...!कारसूळ येथील शेतकरी जितेंद्र बाळासाहेब जाधव यांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे. त्यामुळे संबंधितांवरकारवाई होणार असल्याचे बाजार समिती सचिव बाळासाहेब बाजारे यांनी सांगितले.टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यास मारहाण करणाऱ्यांवर बाजार समितीने कारवाई करावी. तसे न झाल्यास आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल.- प्रकाश वाटपाडे, सामाजिक कार्यकर्ते, पाचोरे वणीशुक्रवारी टोमॅटो मालाचे पैसे घेण्यासाठी गेल्यानंतर मला आडतदारांकडून मारहाण करण्यात आली. मात्र, तीन दिवस उलटूनही अद्याप त्या आडतदाराने पैसे दिलेले नाहीत. उलट माझी बदनामी करण्याचे षडयंत्र त्यांनी सुरू केले आहे- जितेंद्र जाधव, पीडित शेतकरी, कारसूळ.(फोटो २६ पिंपळगाव १)मारहाण करणार्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सचिव बाळासाहेब बाजारे यांना देताना भाऊ घुमरे, देवेंद्र काजळे, योगेश कुयटे, अशोक घुटे, प्रकाश वाटपाडे, जितेंद्र जाधव आदी.

 

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी